शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

दौलताबाद किल्ल्यामागचे १३ व्या शतकातील केवडाबन मोजतय अंतिम घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 16:08 IST

राजाने मारले, निसर्गाने फटकारले

ठळक मुद्देकेवड्याचा उसना गंध घेण्याची येणार वेळ...केवडा मोजतोय अंतिम घटका 

- प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : केवडा... नाव घेतले तरी सुगंध आपल्या आजूबाजूला दरवळत असल्याचा भास न होणारा व्यक्ती निरळाच. म्हणूनच या केवड्याने पार देवापासून सर्वसामान्यांच्या मनाची एक कुप्पी आपल्यासाठी राखूनच ठेवली आहे. महाराष्ट्रीयन मनातील सुगंधाची ही कुप्पी भरली जायची माळीवाड्यातील (ता. जि. औरंगाबाद) केवड्याने. परंतु राजाने मारले व निसर्गाने फटकारल्याने माळीवाड्यातील या केवड्याचा सुगंध लोप पावतो आहे. यंदा तर श्रावण सुरू होऊन आठवडा उलटला पण अजूनही झाडावर केवडा दिसत नसल्याने घोर आणखीनच वाढला आहे.गणेशोत्सवाला सुरुवात होताच बाजारात काटेरी हिरव्या पातीमध्ये पिवळाधमक केवडा दिसायला लागतो. गणराया व महालक्ष्मी यांना केवडा प्रिय. नेमका याच काळात केवडा बाजारात येतो. मात्र, यंदा केवड्याच्या घमघमाटाला मुकण्याची वेळ आली आहे.  

दौलताबाद किल्ल्यामागे माळीवाडा गाव केवड्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. १३ व्या शतकापासून आपल्या सुवासाची किमया राखून असलेले हे केवडाबन आता हळूहळू इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. गावातील नागझरी नदीकाठावरील ७ एकर जमिनीवर केवड्याची झाडे आहेत. पूर्वी येथे १५ ते २० हजार केवड्यांची झाडे होती. १९७२ च्या दुष्काळाने या बनावर पहिला घाव घातला. त्यात अनेक झाडे वाळली. पुढे नदीतील रसायनयुक्त पाण्यानेही गळचेपी सुरू केली.  शेतकरी रमेश आसवार सांगतात की, ‘‘आजघडीला नागझरी नदीच्या केवळ ४ कि.मी.च्या काठावरच ५ ते ७ हजार झाडे उरली आहेत. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गामुळे या पुलाचा विस्तार झाला व रुंदीकरणात केवडाबनातील १०० पेक्षा अधिक झाडे तोडावी लागली. जी झाडे शिल्लक आहेत ती पाणी कमी पडल्याने वाळत आहेत. केवड्यास उसापेक्षाही जास्त पाणी लागते. पाणी कमी पडले तर झाडांची पाने पिवळी पडायला लागतात. दरवर्षी श्रावण महिन्यात केवडा येण्यास सुरुवात होते, पण अजूनही झाडावर केवडा दिसत नाही.’’ 

देवगिरीत १३ व्या शतकात यादवांचे राज्य होते. त्यावेळी माळीवाड्यातील बनातील केवड्यापासून सुवासिक अत्तर तयार केले जात असे. महाराष्ट्रात तीन जिल्ह्यांतच केवड्याचे तुरळक बन शिल्लक राहिले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा, उस्मानाबाद जिल्ह्यातील पापनसबन, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील वाकरी येथे व ठाण्याजवळील डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे केवडाबन आहे.

दुसऱ्या ठिकाणी आलाच नाही केवडा मागील वर्षी चालू विद्युत तार पडल्याने आमच्या शेतातील २५ पेक्षा अधिक केवड्यांची झाडे जळून नष्ट झाली. आम्ही केवडा दुसऱ्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला, पण तेथे झाडे आलीच नाही. ज्या ठिकाणची झाडे जळाली त्याच ठिकाणी पुन्हा केवडा लावला, पण झाड मोठे होण्यास व केवडा येण्यास १० वर्षे लागतील.-अमोल मुळे, शेतकरी, माळीवाडा 

टॅग्स :Doulatabad Fortदौलताबाद किल्लाAurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गNatureनिसर्ग