शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

दौलताबाद किल्ल्यामागचे १३ व्या शतकातील केवडाबन मोजतय अंतिम घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 16:08 IST

राजाने मारले, निसर्गाने फटकारले

ठळक मुद्देकेवड्याचा उसना गंध घेण्याची येणार वेळ...केवडा मोजतोय अंतिम घटका 

- प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : केवडा... नाव घेतले तरी सुगंध आपल्या आजूबाजूला दरवळत असल्याचा भास न होणारा व्यक्ती निरळाच. म्हणूनच या केवड्याने पार देवापासून सर्वसामान्यांच्या मनाची एक कुप्पी आपल्यासाठी राखूनच ठेवली आहे. महाराष्ट्रीयन मनातील सुगंधाची ही कुप्पी भरली जायची माळीवाड्यातील (ता. जि. औरंगाबाद) केवड्याने. परंतु राजाने मारले व निसर्गाने फटकारल्याने माळीवाड्यातील या केवड्याचा सुगंध लोप पावतो आहे. यंदा तर श्रावण सुरू होऊन आठवडा उलटला पण अजूनही झाडावर केवडा दिसत नसल्याने घोर आणखीनच वाढला आहे.गणेशोत्सवाला सुरुवात होताच बाजारात काटेरी हिरव्या पातीमध्ये पिवळाधमक केवडा दिसायला लागतो. गणराया व महालक्ष्मी यांना केवडा प्रिय. नेमका याच काळात केवडा बाजारात येतो. मात्र, यंदा केवड्याच्या घमघमाटाला मुकण्याची वेळ आली आहे.  

दौलताबाद किल्ल्यामागे माळीवाडा गाव केवड्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. १३ व्या शतकापासून आपल्या सुवासाची किमया राखून असलेले हे केवडाबन आता हळूहळू इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. गावातील नागझरी नदीकाठावरील ७ एकर जमिनीवर केवड्याची झाडे आहेत. पूर्वी येथे १५ ते २० हजार केवड्यांची झाडे होती. १९७२ च्या दुष्काळाने या बनावर पहिला घाव घातला. त्यात अनेक झाडे वाळली. पुढे नदीतील रसायनयुक्त पाण्यानेही गळचेपी सुरू केली.  शेतकरी रमेश आसवार सांगतात की, ‘‘आजघडीला नागझरी नदीच्या केवळ ४ कि.मी.च्या काठावरच ५ ते ७ हजार झाडे उरली आहेत. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गामुळे या पुलाचा विस्तार झाला व रुंदीकरणात केवडाबनातील १०० पेक्षा अधिक झाडे तोडावी लागली. जी झाडे शिल्लक आहेत ती पाणी कमी पडल्याने वाळत आहेत. केवड्यास उसापेक्षाही जास्त पाणी लागते. पाणी कमी पडले तर झाडांची पाने पिवळी पडायला लागतात. दरवर्षी श्रावण महिन्यात केवडा येण्यास सुरुवात होते, पण अजूनही झाडावर केवडा दिसत नाही.’’ 

देवगिरीत १३ व्या शतकात यादवांचे राज्य होते. त्यावेळी माळीवाड्यातील बनातील केवड्यापासून सुवासिक अत्तर तयार केले जात असे. महाराष्ट्रात तीन जिल्ह्यांतच केवड्याचे तुरळक बन शिल्लक राहिले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा, उस्मानाबाद जिल्ह्यातील पापनसबन, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील वाकरी येथे व ठाण्याजवळील डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे केवडाबन आहे.

दुसऱ्या ठिकाणी आलाच नाही केवडा मागील वर्षी चालू विद्युत तार पडल्याने आमच्या शेतातील २५ पेक्षा अधिक केवड्यांची झाडे जळून नष्ट झाली. आम्ही केवडा दुसऱ्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला, पण तेथे झाडे आलीच नाही. ज्या ठिकाणची झाडे जळाली त्याच ठिकाणी पुन्हा केवडा लावला, पण झाड मोठे होण्यास व केवडा येण्यास १० वर्षे लागतील.-अमोल मुळे, शेतकरी, माळीवाडा 

टॅग्स :Doulatabad Fortदौलताबाद किल्लाAurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गNatureनिसर्ग