शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी पोकळी; नाराजांसह संधी न मिळालेल्यांच्या आशा पल्लवित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 13:09 IST

मध्य, पश्चिमसह वैजापूर, पैठण, सिल्लोडमधील दुसऱ्या फळीला संधी

- विकास राऊतऔरंगाबाद : जिल्ह्यात मागील ३० वर्षांतील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले. मात्र, तो आनंद अडीच वर्षेच टिकला. त्यामुळे आता जिल्ह्यातील ही सगळी पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने प्रयत्न सुरू केले आहेत, तर या सगळ्या बंडखोरीमुळे शिवसेनेतील नाराजांच्या, संधी न मिळालेल्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यातील काही मतदारसंघांत दुसरी फळी विकसित होऊच दिली गेली नाही. त्यामुळे शिवसेनेसमोर पक्षबांधणीचे मोठे आव्हानदेखील आहे.

पश्चिम मतदारसंघ- २००९ साली पहिल्यांदा संजय शिरसाट यांना पक्षाने संधी दिली होती. त्यावर्षी बन्सीलाल गांगवे यांनीदेखील उमेदवारीवर दावा केला होता; परंतु पक्षाने शिरसाट यांना संधी दिली. त्यांना आता पुन्हा पक्षाकडून अपेक्षा आहेत. तसेच ऋषी खैरे, बाळू गायकवाड यांचीदेखील नावे आता पक्ष वर्तुळात समोर येऊ लागली आहेत.

मध्य मतदारसंघ- मध्य मतदारसंघात किशनचंद तनवाणी यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच शहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनाही उमेदवारीची अपेक्षा आहे. आ. जैस्वाल यांची बंडखोरी या दोघांपैकी कुणाच्या पथ्यावर पडते, हे आगामी काळात कळेल. सगळी गणितं २०२४ पूर्वी स्पष्ट होतील.

वैजापूर मतदारसंघ- या मतदारसंघातून आ. रमेश बोरणारे यांनी शिवसेनेशी नाते तोडून शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. माजी आ. आर. एम. वाणी यांचे चिरंजीव सचिन वाणी किंवा ऐनवेळी भाजपतून आयात होणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. बोरणारे यांच्या विरोधात शिवसेनेचा गेल्या आठवड्यात मोठा मेळावा झाल्यामुळे तालुक्यातील मोठा जनाधार अजून तरी सेनेसोबत असल्याचे दिसते.

पैठण मतदारसंघ- या मतदारसंघातून रोहयो मंत्री राहिलेले आ. संदीपान भुमरे यांनी बंडखोरी केल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भुमरे यांनी तालुक्यात दुसरी फळी ताकदवर होऊच दिली नाही. इच्छा व्यक्त करणाऱ्यांचा ते पत्ता कट करायचे, अशी तक्रार गेल्या आठवड्यात संतप्त शिवसैनिकांनी मांडली. पक्षानेदेखील चूक मान्य केली. मनोज पेरे हे सध्या तालुकाप्रमुख असून, त्यांना संधी मिळू शकते. तर ऐनवेळी आयात उमेदवारावर शिवसेनेला पैठण लढवावे लागेल.

सिल्लोड मतदारसंघ- आ. अब्दुल सत्तार यांच्या बंडखोरीमुळे सिल्लोडमध्ये शिवसेनेला नवीन चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे. आजवर शिवसेनेने त्या मतदारसंघात उमेदवार देता येईल, असे संघटनच केलेले नाही. युतीमध्ये भाजपच्या वाट्याला तो मतदारसंघ दिला गेला. २०१४ साली युती तुटल्याने मिरकर यांना संधी मिळाली होती. आता त्या मतदारसंघात सत्तार सेनेविरोधात शिवसेना काय नियोजन करते, याकडे लक्ष आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका