शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मराठवाड्यात मिश्र खतांमध्ये भेसळ करणारे मोठे रॅकेट कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 7:09 PM

शेती, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

ठळक मुद्देविभागीय प्रशासनाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश जालना, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत बोगस खतविक्री प्रकरणात कारवाया करण्यात आल्या.

औरंगाबाद : मराठवाड्यात मिश्र खतांमध्ये भेसळ करून शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे. त्यास प्रतिबंध करून कारवाई करण्यासाठी आता जिल्हा प्रशासनालाही सहभागी करून घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जालन्यात सुमारे १ कोटी रुपयांचा बोगस खतांचा अवैध साठा पकडण्यात आला. या कारवाईमुळे अनेक खतांच्या कंपन्यांना कुलूप लागले असून, मालक मराठवाडा सोडून पसार झाले आहेत. खतांचा अवैध साठा, तसेच बनावट खत उत्पादन व विक्रीत मोठ्या महाभागांचा सहभाग आहे. विभागीय प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित खत कंपनीमालकांवरच थेट गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

बोगस खत प्रकरणात अहवाल आल्यानंतर एकेकावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. खतांमध्ये राख मिसळली जात आहे. लॅबमध्ये नमुने तपासणीसाठी पाठविले, तर लॅबही मॅनेज करण्याचा प्रकार केला जात आहे. नांदेडमध्ये खत उत्पादक कंपनीचे मालक हे राजकारणाशी निगडित आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल होण्यातच अडथळे येत आहेत. खतांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून, यामध्ये शेती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने आजवर १५ ते १७ कंपन्या बंद केल्या असून, सदरील खत उत्पादक पळून गेले आहेत.

जालना, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत बोगस खतविक्री प्रकरणात कारवाया करण्यात आल्या. औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूरपाठोपाठ फुलंब्री, कन्नड आणि शेंद्रा येथे कारवाई करण्यात आली. गुजरात येथून माल भरून आणल्यानंतर स्थानिक पातळीवर प्लास्टिक बकेटमध्ये रॅपरिंग करून खतविक्री करण्याचा धंदा चव्हाट्यावर आला. खतांच्या बॅगांवर खतातील मूळ व खऱ्या घटकांचा उल्लेखही केला जात नाही. अन्नद्रव्यांचा वाटेल तितक्या प्रमाणात उल्लेख करून शेतकऱ्यांना तो माल विक्री केला जात होता. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष घालून कारवाईचे आदेश विभागीय प्रशासनाने दिले आहेत.  

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय