शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

कंदील, चिमण्या, गॅसबत्ती झाल्या इतिहास जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:05 AM

लासूरगाव : ज्यावेळी ग्रामीण भागात वीज पोहोचली नव्हती, तेव्हा रात्रीच्या वेळी अंधार घालविण्यासाठी घराघरांमध्ये कंदील, चिमण्या तसेच रॉकेलबत्तींचा वापर ...

लासूरगाव : ज्यावेळी ग्रामीण भागात वीज पोहोचली नव्हती, तेव्हा रात्रीच्या वेळी अंधार घालविण्यासाठी घराघरांमध्ये कंदील, चिमण्या तसेच रॉकेलबत्तींचा वापर केला जात होता. त्यावेळी रॉकेल हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. मात्र, कालौघात गावागावात आता वीज पोहोचली असून कंदील, चिमण्या, दिवे आता इतिहास जमा झाली असून, रॉकेलही मिळेनासे झाले आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ९० च्या दशकापर्यंतही अनेक गावे विजेविना होती. त्यावेळी अंधार घालविण्यासाठी गोड्या तेलासह रॉकेलवरील दिव्यांना विशेष महत्त्व होते. विविध आकारातील रंगबेरंगी दिवे त्यावेळी विक्रीला येत होती. गरिबाच्या घरी छोटी चिमणी प्रकाशाचे काम करी, अनेक घरी काचेच्या बाटलीच्या झाकणाला छिद्र पाडून त्यात कपड्याची वात घालून दिवा तयार केला जात असे. तर परिस्थितीने श्रीमंत असलेल्या कुटुंबाकडे वेगवेगळे दिवे किंवा रॉकेलबत्तीचा वापर केला जात होता. यासाठी ग्रामीण भागात इंधन म्हणून सर्रास रॉकेलचा वापर केला जात होता. मात्र, आता रॉकेलचा पुरवठा पूर्णपणे थांबला आहे. लाइट आल्यानंतरही भारनियमनामुळे अनेक घरांत दिवे वापरले जात होते, मात्र इन्व्हर्टर, चार्जिंग लाइट, मेणबत्तीमुळे त्यांचा वापर बंद झाला आहे.

चौकट

चौकातला कंदील

पूर्वीच्या काळी गावाला प्रकाशमय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने चौकाचौकात मोठमोठे कंदील लावण्यात येत असे. संध्याकाळ झाली की, ग्रामपंचायतीचा कर्मचारी रॉकेलची कॅन घेऊन कंदिलाची साफसफाई करीत त्यात रॉकेल भरून तो प्रज्वलित करीत असे. या प्रकाशात काही शाळकरी मुले अभ्यास करीत असत. आता ही जागा स्ट्रीट लाइटने घेतल्यानंतर चौकातला कंदील काळाच्या पडद्याआड गेला आहे.

चौकट

श्रीमंतांच्या घरी असायची रॉकेलबत्ती

गावातील श्रीमंत घरांमध्ये, दुकाने, बाजार तसेच यात्रेमध्ये जास्त प्रकाशासाठी रॉकेलबत्ती वापरली जात असते. लग्नाच्या वरातीमध्येही प्रकाशासाठी रॉकेल बत्ती डोक्यावर घेऊन काही जण वरातीपुढे चालत असे. जास्त प्रकाश देत असल्याने या बत्तीचे ग्रामस्थांना विशेष आकर्षण होते.

कोट

आमच्या काळात लाइट नव्हती तरी जास्त समस्या निर्माण होत नव्हत्या. रॉकेलही मुबलक मिळायचे. लग्नाच्या वरातीमध्ये गॅसबत्तीचा वापर व्हायचा. कंदील, चिमण्यांमुळे संध्याकाळी लवकर आवरून लवकर झोपत असू व पहाटेच सर्व गाव जागे होत असे. आता सुविधा जरी वाढल्या तरी समस्याही वाढल्या आहेत.

- दत्तू पाटील काळुंके, लासूरगाव.

कोट

सायंकाळचे चार वाजले की, घरात कंदील, चिमण्या स्वच्छ करून त्यात रॉकेल भरावे लागत होते. या प्रकाशातच आम्ही स्वयंपाक करून एकत्र सर्व जण जेवायचो. आता टीव्ही पाहत जेवतात. तेव्हा डोळ्यांचीही दृष्टी चांगली होती. आता लहान वयातच चष्मा लागतो. लाइट आली, जीवन सुकर झाले, मात्र मनुष्य आळशीही झाला आहे.

-शकुंतलाबाई कारभारी आढाव, लासूरगाव

170621\img_20210610_180643.jpg

दत्तू पाटील काळुंके