शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शेंद्रा, वाळूज ‘इंडस्ट्रियल रोड’च्या भूसंपादनाचा गुंता आणखी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 20:11 IST

भूसंपादनासाठी रक्कम नसल्यामुळे डीएमआयसी आणि राज्य सरकारकडे जबाबदारी सोपविली आहे; पण राज्य शासनाकडे सध्या पैसा नसल्यामुळे त्या रोडचे काम अधांतरी आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या यादीत एनएच ७६३ म्हणून नोंद पैठण रोडबाबत काहीही निर्णय नाही 

- विकास राऊत

औरंगाबाद : केंद्रीय दळणवळण खात्याने २०१५ मध्ये जाहीर केलेल्या बीड बायपास आणि जालना रोड हे दोन्ही प्रकल्प नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने रद्द केल्यानंतर शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज या इंडस्ट्रियल रोडच्या भूसंपादनाचा गुंता निर्माण केला आहे. डीएमआयसी आणि राज्य शासनाने भूसंपादन करण्याच्या नवीन तरतुदींमुळे अजून तरी याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. मात्र, केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या यादीत एनएच-७५३ म्हणून त्या रोडची नोंद झाली आहे. या रोडबाबत आठ महिन्यांपासून काहीही निर्णय न झाल्याने सदरील रोडचा प्रस्ताव अधांतरी आहे. 

भूसंपादनासाठी रक्कम नसल्यामुळे डीएमआयसी आणि राज्य सरकारकडे जबाबदारी सोपविली आहे; पण राज्य शासनाकडे सध्या पैसा नसल्यामुळे त्या रोडचे काम अधांतरी आहे.जालना रोडसाठी फक्त ७४ कोटी मंजूर झाले आहेत, तर बीड बायपासचे काम पीडब्ल्यूडीकडे वर्ग करून प्रकरण संपविण्यात आले आहे. डीएमआयसीअंतर्गत शेंद्रा ते बिडकीन इंडस्ट्रियल पार्क ते वाळूज औद्योगिक वसाहत या इंडस्ट्री ट्रँगलसाठी स्वतंत्र मार्ग बांधण्याचा ९०० कोटींचा प्रस्ताव नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे सुपूर्द करण्यात आला होता. औरंगाबाद ते पैठणमार्गे शेवगाव या रस्त्यासह १९०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा त्यांचा अंदाज होता. त्याचा डीपीआर होण्यापूर्वीच दुसऱ्या टप्प्यात या कामांचे पाहू असे स्पष्ट केल्याने त्या रोडचे काम अधांतरी पडले आहे. 

पैठण रोडबाबत काहीही निर्णय नाही शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज हा आठ पदरी मार्ग करण्याचा प्रस्ताव आहे. त्यात औरंगाबाद ते पैठण या चौपदरी मार्गाचेदेखील समायोजन होते. औरंगाबाद ते पैठण हा रोड भारतमाला या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. त्या रस्त्याचे काम करावे लागेल, असे गडकरी यांनी १२ जानेवारी २०२० रोजी स्पष्ट केले होते; परंतु आठ महिन्यांत या रस्त्याबाबत काहीही नवीन निर्णय झालेला नाही. 

दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले अलायमेंटशेंद्रा, बिडकीन, वाळूज ते करोडीमार्गे हा रस्ता नॅशनल हायवेच्या यादीत आला आहे. औद्योगिक वाहतुकीसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. ७६३ ए आणि बी अशी रस्त्याची नोंद दळणवळण खात्याकडे झाली आहे. नॅशनल हायवेचे अलायमेंट दोन महिन्यांपूर्वी जाहीर झाले आहे. नॅशनल हायवे अ­ॅथॉरिटी आॅफ इंडियाने त्यांच्या यादीत हा रस्ता डीएमआयसीसाठी मंजूर करून घेतला आहे. डीएमआयसीकडून भूसंपादनासाठी तरतूद करावी लागणार आहे. आता अलायमेंटमध्ये बदल होणार नाही, असे दळणवळण खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

काय म्हणाले होते गडकरी जानेवारी २०२० मध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज या रोडचा दुसऱ्या टप्प्यात विचार करू, सध्या काहीही सांगू नका, असे एनएचएआय, पीडब्ल्यूडीच्या बैठकीत स्पष्ट केले होते, तसेच औरंगाबाद ते पैठण हा  रोड भारतमाला या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. त्या रस्त्याचे काम करावे लागेल, असेही गडकरी म्हणाले होते, परंतु आठ महिन्यांपासून काहीही निर्णय झालेला नाही. 

टॅग्स :highwayमहामार्गfundsनिधीAurangabadऔरंगाबाद