शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

जिल्हा परिषदेत कोरोनाकाळात लाखोंची उधळपट्टी; अधिकाऱ्यांमध्ये दालनांच्या सुशोभीकरणाची स्पर्धा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 17:14 IST

जुन्या इमारती जीर्ण झाल्याच्या नावाखाली दरवर्षी दोन चार दालनांची दुरुस्तीची कामे प्रस्तावित केली जात असून, त्यावर ४० ते ५० लाखांची दुरुस्ती केली जात आहे.

ठळक मुद्देदरवर्षी नूतनीकरणाच्या नावाखाली लाखोंची उधळपट्टी

- योगेश पायघन 

औरंगाबाद : एकीकडे विकासकामांच्या ६७ टक्के निधीला कोरोनामुळे कात्री लागली. तर आलिशान दालनांचा हेवा वाटावा अशा नूतनीकरणाची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. वर्षभरात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तिसऱ्या दालनात स्थलांतरित व्हावे लागले. मात्र, कोरोना काळात दालनांवर लाखोंची उधळपट्टी गरजेची आहे का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या रस्ते, पुलांची दुरवस्था झाली. मात्र, त्यासाठी निधीची अडचण सांगून दुरुस्त्या रेंगाळल्या आहेत. त्यात जुन्या इमारती जीर्ण झाल्याच्या नावाखाली दरवर्षी दोन चार दालनांची दुरुस्तीची कामे प्रस्तावित केली जात असून, त्यावर ४० ते ५० लाखांची दुरुस्ती केली जात आहे.उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शिरीष बनसोडे पूर्वी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शेजारील सुस्थितीतील दालनातून कार्यभार हाकत होते. त्यानंतर त्यांनी महिला अधिकारी व पदाधिकारी विश्रांतीगृह म्हणून वापरत असलेल्या दालनाची दुरुस्ती करुन तिथे स्थलांतरित झाले. पूर्वीच्या दालनाचा वापर वाॅर रुम म्हणून आरोग्य विभाग करत आहे. सदस्यांच्या आक्षेपानंतर सोमवारपासून सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुख्य इमारतीतील सामान्य प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत बसायला सुरुवात केली आहे.

अधिकारी माघारी, पण मूळ प्रश्न अनुत्तरितचगेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या दालनाच्या सुशोभिकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या प्रकरणाच्या चाैकशीची मागणी सदस्य केशवराव तायडे यांनी केली. त्यानंतर महिला व बालकल्याण सभापतींनीही हे नूतनीकरण झालेले दालन महिला पदाधिकाऱ्यांना परत द्यावे अन्यथा कुलूप तोडून ताब्यात घेऊ असे स्पष्ट केले. मात्र, दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी दालनांवर खर्च किती करावा हा मूळ प्रश्न पुन्हा अनुत्तरितच असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदAurangabadऔरंगाबादfundsनिधी