शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘बोलो प्यार से धन निरंकार’, संत समागमात लाखो भाविकांनी घडविले मानवतेचे विराट दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 13:31 IST

वार्षिक निरंकारी संत समागम : शोभायात्रेत विविध राज्यांतील लोकसंस्कृतीचा संगम

औरंगाबाद : कोणी वाहतूक व्यवस्थेच्या कामात होते... कोणी लंगरमध्ये सेवा देत होते... कोणी स्वच्छतागृहात स्वच्छतेचे काम करीत होते. काम दिले, तिथेच स्वयंसेवक थांबून सेवा देत होते. कोणी कोणाची जात-धर्म विचारत नव्हते. ‘मानवता हाच धर्म’ हाच संदेश सर्वांच्या हृदयात कोरला होता.

‘बोलो प्यार से धन निरंकार’ असा जयघोष करीत हजारो भाविक येत होते. कोणी वाट चुकले, तर त्यांना सेवेकरी ‘महात्मा’ म्हणून हात जोडून पुढील मार्ग दाखवत होते... तन मन धनाने सेवादलाचे १५ हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक नि:स्वार्थपणे काम करीत होते. वार्षिक संत समागमच्या पहिल्या दिवशी लाखभर भाविकांनी हजेरी लावून श्रद्धा, सेवा, शिस्त, समर्पण, आणि मानवतेचे विराट दर्शन घडविले.

बिडकीन डीएमआयसीमध्ये ३०० एकरांवर ५६ व्या वार्षिक संत समागमाला शुक्रवारी लाखो भाविकांच्या साक्षीने सुरुवात झाली. ३ लाख चौरस फुटांच्या भव्य सभामंडपाच्या पूर्व बाजूने दुपारी १२ वाजता शोभायात्रेला सुरुवात झाली. सजविलेल्या पांढऱ्या शुभ्र वाहनाला रथाचे स्वरूप देण्यात आले होते. वाहनाला जरबेरा फुलांच्या गुच्छांनी सजविले होते. सद्गुरू माता सुदीक्षाजी आणि निरंकारी राजपिता रमित महाराज विराजमान झाले होते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लाखो लोकांची झुंबड उडाली होती. एवढी गर्दी असतानाही कुठेही गोंधळ नव्हता. भाविकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन याद्वारे घडविले. शोभायात्रेत लेझीम पथकापासून, आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य, कोळीनृत्य, ढोल नृत्य, विठ्ठल, विठ्ठल नामात पाऊली खेळण्यात रमलेले वारकरी, भांगडा ते गरबापर्यंत देशभरातील विविध राज्यांच्या लोकसंस्कृतीचा संगम शोभायात्रेत बघण्यास मिळाला. मुख्य प्रवेशद्वारावर सद्गुरूचे रथातून आगमन झाले, तेव्हा पृष्पवृष्टी करण्यात आली. मुख्य मंडपात जमलेल्या हजारो भाविकांनी ‘धन निरंकर’ असा जयघोष केला. त्यानंतर, भक्तिगीत, आध्यात्मिक प्रवचनात सर्वजण रमून गेले होते.

धरतीला स्वर्ग बनवासद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी सांगितले की, माणसाला माणसासारखी वागणूक द्या, कोणी उच्च नाही, कोणी निच्च नाही, सर्व समान आहेत. पहिले परमात्मा कोण आहे, हे जाणून घ्या, परमात्मा प्रत्येकात आहे. सर्व अहंकार सोडून मानव सेवेत स्वताला अर्पण करा. परमात्मा जाणल्यावर आत्मीयता निर्माण होते व नंतर माणुसकीचा भाव निर्माण होतो. एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होते. याच प्रेमातून आपण धरतीला स्वर्ग बनवू या.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद