शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

‘बोलो प्यार से धन निरंकार’, संत समागमात लाखो भाविकांनी घडविले मानवतेचे विराट दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 13:31 IST

वार्षिक निरंकारी संत समागम : शोभायात्रेत विविध राज्यांतील लोकसंस्कृतीचा संगम

औरंगाबाद : कोणी वाहतूक व्यवस्थेच्या कामात होते... कोणी लंगरमध्ये सेवा देत होते... कोणी स्वच्छतागृहात स्वच्छतेचे काम करीत होते. काम दिले, तिथेच स्वयंसेवक थांबून सेवा देत होते. कोणी कोणाची जात-धर्म विचारत नव्हते. ‘मानवता हाच धर्म’ हाच संदेश सर्वांच्या हृदयात कोरला होता.

‘बोलो प्यार से धन निरंकार’ असा जयघोष करीत हजारो भाविक येत होते. कोणी वाट चुकले, तर त्यांना सेवेकरी ‘महात्मा’ म्हणून हात जोडून पुढील मार्ग दाखवत होते... तन मन धनाने सेवादलाचे १५ हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक नि:स्वार्थपणे काम करीत होते. वार्षिक संत समागमच्या पहिल्या दिवशी लाखभर भाविकांनी हजेरी लावून श्रद्धा, सेवा, शिस्त, समर्पण, आणि मानवतेचे विराट दर्शन घडविले.

बिडकीन डीएमआयसीमध्ये ३०० एकरांवर ५६ व्या वार्षिक संत समागमाला शुक्रवारी लाखो भाविकांच्या साक्षीने सुरुवात झाली. ३ लाख चौरस फुटांच्या भव्य सभामंडपाच्या पूर्व बाजूने दुपारी १२ वाजता शोभायात्रेला सुरुवात झाली. सजविलेल्या पांढऱ्या शुभ्र वाहनाला रथाचे स्वरूप देण्यात आले होते. वाहनाला जरबेरा फुलांच्या गुच्छांनी सजविले होते. सद्गुरू माता सुदीक्षाजी आणि निरंकारी राजपिता रमित महाराज विराजमान झाले होते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लाखो लोकांची झुंबड उडाली होती. एवढी गर्दी असतानाही कुठेही गोंधळ नव्हता. भाविकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन याद्वारे घडविले. शोभायात्रेत लेझीम पथकापासून, आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य, कोळीनृत्य, ढोल नृत्य, विठ्ठल, विठ्ठल नामात पाऊली खेळण्यात रमलेले वारकरी, भांगडा ते गरबापर्यंत देशभरातील विविध राज्यांच्या लोकसंस्कृतीचा संगम शोभायात्रेत बघण्यास मिळाला. मुख्य प्रवेशद्वारावर सद्गुरूचे रथातून आगमन झाले, तेव्हा पृष्पवृष्टी करण्यात आली. मुख्य मंडपात जमलेल्या हजारो भाविकांनी ‘धन निरंकर’ असा जयघोष केला. त्यानंतर, भक्तिगीत, आध्यात्मिक प्रवचनात सर्वजण रमून गेले होते.

धरतीला स्वर्ग बनवासद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी सांगितले की, माणसाला माणसासारखी वागणूक द्या, कोणी उच्च नाही, कोणी निच्च नाही, सर्व समान आहेत. पहिले परमात्मा कोण आहे, हे जाणून घ्या, परमात्मा प्रत्येकात आहे. सर्व अहंकार सोडून मानव सेवेत स्वताला अर्पण करा. परमात्मा जाणल्यावर आत्मीयता निर्माण होते व नंतर माणुसकीचा भाव निर्माण होतो. एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होते. याच प्रेमातून आपण धरतीला स्वर्ग बनवू या.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद