शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘बोलो प्यार से धन निरंकार’, संत समागमात लाखो भाविकांनी घडविले मानवतेचे विराट दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 13:31 IST

वार्षिक निरंकारी संत समागम : शोभायात्रेत विविध राज्यांतील लोकसंस्कृतीचा संगम

औरंगाबाद : कोणी वाहतूक व्यवस्थेच्या कामात होते... कोणी लंगरमध्ये सेवा देत होते... कोणी स्वच्छतागृहात स्वच्छतेचे काम करीत होते. काम दिले, तिथेच स्वयंसेवक थांबून सेवा देत होते. कोणी कोणाची जात-धर्म विचारत नव्हते. ‘मानवता हाच धर्म’ हाच संदेश सर्वांच्या हृदयात कोरला होता.

‘बोलो प्यार से धन निरंकार’ असा जयघोष करीत हजारो भाविक येत होते. कोणी वाट चुकले, तर त्यांना सेवेकरी ‘महात्मा’ म्हणून हात जोडून पुढील मार्ग दाखवत होते... तन मन धनाने सेवादलाचे १५ हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक नि:स्वार्थपणे काम करीत होते. वार्षिक संत समागमच्या पहिल्या दिवशी लाखभर भाविकांनी हजेरी लावून श्रद्धा, सेवा, शिस्त, समर्पण, आणि मानवतेचे विराट दर्शन घडविले.

बिडकीन डीएमआयसीमध्ये ३०० एकरांवर ५६ व्या वार्षिक संत समागमाला शुक्रवारी लाखो भाविकांच्या साक्षीने सुरुवात झाली. ३ लाख चौरस फुटांच्या भव्य सभामंडपाच्या पूर्व बाजूने दुपारी १२ वाजता शोभायात्रेला सुरुवात झाली. सजविलेल्या पांढऱ्या शुभ्र वाहनाला रथाचे स्वरूप देण्यात आले होते. वाहनाला जरबेरा फुलांच्या गुच्छांनी सजविले होते. सद्गुरू माता सुदीक्षाजी आणि निरंकारी राजपिता रमित महाराज विराजमान झाले होते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लाखो लोकांची झुंबड उडाली होती. एवढी गर्दी असतानाही कुठेही गोंधळ नव्हता. भाविकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन याद्वारे घडविले. शोभायात्रेत लेझीम पथकापासून, आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य, कोळीनृत्य, ढोल नृत्य, विठ्ठल, विठ्ठल नामात पाऊली खेळण्यात रमलेले वारकरी, भांगडा ते गरबापर्यंत देशभरातील विविध राज्यांच्या लोकसंस्कृतीचा संगम शोभायात्रेत बघण्यास मिळाला. मुख्य प्रवेशद्वारावर सद्गुरूचे रथातून आगमन झाले, तेव्हा पृष्पवृष्टी करण्यात आली. मुख्य मंडपात जमलेल्या हजारो भाविकांनी ‘धन निरंकर’ असा जयघोष केला. त्यानंतर, भक्तिगीत, आध्यात्मिक प्रवचनात सर्वजण रमून गेले होते.

धरतीला स्वर्ग बनवासद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी सांगितले की, माणसाला माणसासारखी वागणूक द्या, कोणी उच्च नाही, कोणी निच्च नाही, सर्व समान आहेत. पहिले परमात्मा कोण आहे, हे जाणून घ्या, परमात्मा प्रत्येकात आहे. सर्व अहंकार सोडून मानव सेवेत स्वताला अर्पण करा. परमात्मा जाणल्यावर आत्मीयता निर्माण होते व नंतर माणुसकीचा भाव निर्माण होतो. एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होते. याच प्रेमातून आपण धरतीला स्वर्ग बनवू या.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद