शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

ऑनलाईनसाठी साधनांचा अभाव, अभ्यासाविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष; यावर्षीही परिस्थिती तशीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 16:38 IST

Lack of tools for online, years of poor students gone without study ऑनलाईन शिक्षणाच्या साधनांपासून अनेक पालक वंचित

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी  ‘आरटीई’ अंतर्गत जिल्ह्यात ६०३ शाळांची नोंद११, ८६१ जणांचे प्रवेशासाठी आले होते अर्जयंदा ३,६२४ विद्यार्थ्यांना प्रवेश

औरंगाबाद : ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गेले वर्ष ऑनलाईन शिक्षणाविना घरातच गेले. यंदाही तीच परिस्थिती दिसत आहे. दुसरीकडे, या विद्यार्थ्यांच्या बहुतांशी पालकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्यांच्याकडे तशी साधनेही उपलब्ध नव्हती. त्यामुळे ते विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. या विद्यार्थ्यांचा पायाच जर कच्चा राहिला, तर त्यांच्या भवितव्याची कोण हमी देणार, हा प्रश्न पालकांना सतावत आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे जूनपासून शाळा उघडल्याच नाहीत. त्यानंतर शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सहावीच्या पुढील वर्गासाठी ऑनलाईन तासिका सुरु करण्यात आल्या. सुरुवातीला पूर्वप्राथमिक, प्राथमिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे की नाही, या वादात चार- पाच महिने निघून गेले. त्यानंतर पहिलीपासूनच्या वर्गांनाही ऑनलाईन शिक्षण सुरु झाले; पण ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या बहुतांशी पालकांकडे ‘स्मार्ट मोबाईल’ अथवा लॅपटॉप, संगणक या साधनांचा अभाव असल्यामुळे ही मुले ऑनलाईन शिक्षणापासून दूरच राहिली. जिल्ह्यात ‘आरटीई’ अंतर्गत ६०३ शाळांनी नोंदणी केलेली आहे. यामध्ये राज्य मंडळासोबत काही ‘सीबीएसई’ शाळांचाही समावेश आहे. यंदा वंचित घटकांतील ११ हजार ८६१ पालकांनी मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज केले होते. यापैकी एप्रिल महिन्यात ३ हजार ६२४ विद्यार्थी सोडत पद्धतीने प्रवेशासाठी पात्र ठरले. ११ जूनपासून या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन त्यांना संबंधित शाळा प्रवेश देणार आहेत.

गेले वर्ष वाया गेलेगेल्या वर्षी माझ्या मुलीचा ‘आरटीई’ अंतर्गत पहिल्या वर्गासाठी नंबर लागला. शाळेत रीतसर कागदपत्रे सादर केली. मात्र, लॉकडाऊनमुळे शाळा उघडलीच नाही. काही दिवसांनंतर ऑनलाईन तासिका सुरु होतील, तुम्ही ‘स्मार्टफोन’वर त्याला तासिका करु द्या, असा शाळेकडून निरोप आला; पण मोबाईल घेण्यासारखी माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे गेले वर्ष तसेच वाया गेले.- पवन जाधव, पालक

शाळेकडून सूचना मिळालीच नाहीमी अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करते. गेल्या वर्षी माझ्या मुलाला ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेश मिळाला. मात्र, लॉकडाऊनमध्ये संपूर्ण वर्षभर शाळा बंदच होती. कामातून वेळ मिळेल, तेव्हा मी मुलाला घरीच शिकवते. ऑनलाईन शिक्षणाबाबत शाळेकडून आम्हाला कसलीही सूचना मिळाली नाही. तशी सूचना मिळाली असती, तरी आर्थिक परिस्थितीमुळे त्याबाबतची साधने घेऊ शकत नाही.- नीता कीर्तिशाही, पालक

ऑनलाईन शिक्षणासाठी शासनाने साधने द्यावीत‘आरटीई’ अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती स्मार्टफोन, आयपॉड, लॅपटॉप किंवा संगणक खरेदी करण्यासारखी नाही. आर्थिक परिस्थिती चांगली असती, तर त्यांना ‘आरटीई’चा आधार घ्यावाच लागला नसता. कोविडमुळे गेल्या वर्षी ऑनलाईन शिक्षण पद्धत राबविण्यात आली. यंदाही शाळा उघडण्याबाबत अनिश्चितताच आहे. त्यामुळे या मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी शासनाने साधने उपलब्ध करुन दिली पाहिजेत.- प्रशांत साठे, अध्यक्ष, आरटीई पालक संघ.

शासनाच्या सूचनांनुसार ऑनलाईन शिक्षणगेल्या वर्षी ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली; पण लॉकडाऊनमुळे शाळा उघडल्याच नाहीत. यंदाही सोडत पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली. ११ जूनपासून पालकांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा. गत वर्षी शासनाच्या सूचनेनुसार शाळांना ‘ऑनलाईन’ तासिका सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. यंदा शाळा उघडणे किंवा ऑनलाईन तासिकांबाबत अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.- सूरज जैस्वाल, शिक्षणाधिकारी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण