शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:53 IST

घाटी रुग्णालयातील विभागीय रक्तपेढीला रक्ताच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळी सुट्या, लग्नसराईमुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील विभागीय रक्तपेढीला रक्ताच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळी सुट्या, लग्नसराईमुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा फटका गोरगरीब रुग्णांना बसत आहे. रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन विभागीय रक्तपेढीतर्फे करण्यात आले आहे.

घाटीतील विभागीय रक्तपेढीमध्ये दररोज जवळपास सुमारे ६० ते ७० बॅग रक्त आणि रक्तघटकांची मागणी असते; परंतु उन्हाळी सुट्यांमुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शहरातील शिबिरांचे आयोजन थंडावले आहे. त्यामुळे घाटीतील विभागीय रक्तपेढीला तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे.

घाटीत थॅलेसीमियाचे दररोज किमान आठ ते दहा रुग्ण येतात. अपघातग्रस्त रुग्णांची संख्याही अधिक आहे. उपचारासाठी अनेकदा रुग्णांना रक्त देणे आवश्यक असते. अशावेळी रुग्ण रक्तपेढीकडे धाव घेतात. मात्र, रक्ताच्या टंचाईमुळे त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. रुग्णांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने काळजी घेतली जाते. तुटवडा दूर करण्यासाठी रक्तदानाचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBlood Bankरक्तपेढी