शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
2
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
6
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
7
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
9
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
10
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
11
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
12
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
13
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
14
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
15
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
16
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
17
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
18
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
19
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
20
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

वंचित बहुजन आघाडीच्या यादीतून कोळसे पाटील यांचे नाव अचानक बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 13:22 IST

बाळासाहेबांनी परभणीत वंचित बहुजन आघाडीच्या २२ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यात माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील यांचे नाव होते.  

ठळक मुद्दे कोळसे पाटील आता जनता दल सेक्युलरचे उमेदवारकाँग्रेसने मला पाठिंबा द्यावा

- स. सो. खंडाळकर  

औरंगाबाद  : माजी न्या. बी. जी.  कोळसे पाटील यांचे औरंगाबाद लोकसभेसाठीचे नाव वंचित बहुजन आघाडीच्या आज जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीतून बाद झाले. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज मुंबईत ३७ उमेदवारांची नावे जाहीर केली. उर्वरित नावे लवकरच जाहीर होणार आहेत. 

काही दिवसांपूर्वीच स्वत: बाळासाहेबांनी परभणीत वंचित बहुजन आघाडीच्या २२ उमेदवारांची नावे जाहीर के ली होती. त्यात माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील यांचे नाव होते.  आम्ही जाहीर केलेल्या २२ जागा आम्हाला सोडा, असा प्रस्तावच नंतर बाळासाहेबांनी काँग्रेसला दिला होता. आधी बारा जागा मागितल्या होत्या. नंतर त्या अशा पद्धतीने २२ झाल्या होत्या. त्यात कोळसे पाटील हे नाव होते. दुसरीकडे स्वत: कोळसे पाटील हे मला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यास मी निवडणूक लढण्यास तयार आहे, असे सांगत होते. आता या नावावरून वंचित बहुजन आघाडीतच नाराजी पसरल्याचे व या आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या एमआयएममध्ये तर प्रचंड नाराजी असल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या ताज्या यादीत कोळसे पाटील यांचे नाव नसणे हे आश्चर्यकारक मानले जात आहे. 

काँग्रेसने मला पाठिंबा द्यावादरम्यान, कोळसे पाटील हे  देवेगौडा यांच्या अध्यक्षतेखालील जनता दल सेक्युलरचे औरंगाबादचे उमेदवार असतील, असे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात या प्रतिनिधीने कोळसे पाटील यांना संपर्क साधला असता, ते म्हणाले, होय. मी जनता दल सेक्युलरचाच उमेदवार आहे. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही आमचे काही म्हणणे नाही. काँग्रेसने मला पाठिंबा द्यावा, असा माझा आग्रह आहे. पाच महिन्यांपूर्वीच कोळसे पाटील यांची जनता दलाच्या सेक्युलरच्या अ. भा. सरचिटणीसपदी स्वत: देवेगौडा यांनी नियुक्ती केली आहे. काँग्रेस-जनता दल आघाडीत औरंगाबादची जागा जनता दलाला सुटावी, असे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात देवेगौडा आणि सोनिया गांधी यांची बोलणी झालेली आहे. कोळसे पाटील यांना शहरातील डावे, समाजवादी व परिवर्तनवादी पक्षही पाठिंबा देतील, असे जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजमल  खान यांनी सांगितले.

‘त्याला’ पाठिंबा... नांदेड येथे मी, असदुद्दीन ओवेसी, आ. इम्तियाज जलील अशी बैठक झाली होती. त्यावेळी आम्ही लोकसभा लढणार नाही. विधानसभेत आम्हाला अधिक रुची आहे, असे एमआयएमतर्फे सांगितले गेले. आता एमआयएमतर्फे इम्तियाज जलील यांना औरंगाबादची जागा लढवायची आहे. यासंदर्भात स्वत: ओवेसी, देवेगौडा आणि इम्तियाज जलील यांनी काय ते ठरवावे. त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा राहील. वेगळा उमेदवार राहणार नाही, असे स्वत: बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर करून बॉल ओवेसींच्याच कोर्टात टाकून दिला आहे. 

जलील यांची कडक भूमिकाऔरंगाबाद लोकसभेची निवडणूक एमआयएमने लढविली नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे पूर्णत: विस्कळीत होईल. लोकसभेनंतर विधानसभेला सामोरे जायचे आहे. तेव्हा काय करायचे? आणि एकही जागा लढवायची नसेल तर आपण राजकीय पक्ष कसे, असा सवाल जलील यांनी एमआयएमचे सुप्रिमो असदुद्दीन ओवेसी यांनाच विचारला. कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढविण्याबाबतचा रेटा असल्याची माहिती जलील यांनी ओवेसी यांना दिली व लवकरच त्यांना निर्णय अभिप्रेत आहे. त्यांनी सांगितले, वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेले उमेदवार कोण,  असा प्रश्न जेव्हा एमआयएममधील कार्यकर्ता विचारतो, तेव्हा त्याला उत्तर देणे अवघड जाते. ते केवळ माजी न्यायमूर्ती आहेत म्हणून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे हा कसला निकष, असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे. आता वंचित बहुजन आघाडी बाजूला सरकली असून, देवेगौडा आणि ओवेसी यांनी काय ते ठरवावे, असे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAurangabadऔरंगाबादVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी