शहरं
Join us  
Trending Stories
1
Ghatkopar Hording Collapse: चौघांचा मृत्यू, ५१ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
2
KKRचा संघ QUALIFIER 1 साठी पात्र, LSG चे आव्हानं संपल्यात जमा! अहमदाबादहून Live Updates 
3
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
4
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
5
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
6
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
7
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
8
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
9
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
11
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
12
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
13
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
14
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
15
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
16
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
17
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
18
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
19
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
20
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला

Killari Earthquake : आठवण अन् साठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 7:48 PM

. पाच ते दहा मिनिटांनी पुन्हा जमीन थरथरली आणि काळजाचा थरकाप होणारा आवाज झाला. बीड शहरात त्या काळात नवीनच टीव्हीचे जाळे सुरू झाले होते. तरीही किल्लारी परिसरात भूकंप झाल्याची बातमी धडकली ती रेडिओवरूनच.

- जगदीश पिंगळे

साखरझोपेत असतानाच एकदम जमिनीला हादरे बसत भिंती थरथरल्यासारखी जाणीव झाली आणि आम्ही संपूर्ण कुटुंबीय एका अनामिक भीतीने घराबाहेर आलो. पाच ते दहा मिनिटांनी पुन्हा जमीन थरथरली आणि काळजाचा थरकाप होणारा आवाज झाला. बीड शहरात त्या काळात नवीनच टीव्हीचे जाळे सुरू झाले होते. तरीही किल्लारी परिसरात भूकंप झाल्याची बातमी धडकली ती रेडिओवरूनच. त्याकाळी ‘लोकमत’साठी सकाळी ५ वाजता उठून बातम्यांचे टपाल पार्सल नेणाऱ्या टॅक्सी चालकाजवळ द्यावे लागत असे. बसस्टॅण्डला आल्यानंतर अंबाजोगाईच्या एका टॅक्सीचालकाने अंबाजोगाईतील माडी पडल्याचा निरोप दिला. अंबाजोगाईचे आमचे घर तीन मजली चिरेबंदी आहे. मी तातडीने घरी आलो. अंबाजोगाईला जायचे; पण कसे? मित्रांची कार किल्लारीकडे निघाल्याची कुणकुण लागली. सोबत मीही निघालो.

आमचा अ‍ॅम्बेसिडरमधून प्रवास सुरू झाला. लोखंडी सावरगाव येताच समोरून अचानक त्या काळातील नगराध्यक्ष बाळू तात्या लोमटे हे भेटले आणि त्यांनी ‘माडी पडली; पण दुसऱ्याची’ असे सांगितले. त्यामुळे अंबाजोगाईऐवजी त्यांच्यासोबत किल्लारीला गेलो. साधारण ११.००-११.३० ची वेळ असेल. गावात येताच कार थांबवून फोटोग्राफर शक्तीकुमार केंडे यांनी समोरच एका ओट्यावर ठेवलेल्या, मातीने माखलेल्या प्रेताचा फोटो काढला. थोडे पुढे जाताच जयप्रकाश दगडे यांची भेट झाली. त्यांनी गावचे सरपंच डॉ. शंकरराव यांची ओळख करून दिली. सरपंच बोलण्याच्या मन:स्थितीतच नव्हते. एक फोटो काय काढता, पुढे चवडच्या चवड आहे... दु:खाने त्यांचा स्वर रडवेला झाला होता... ‘लोकमत’चे तत्कालीन प्रादेशिकप्रमुख राम अग्रवाल नांदेडवरून तातडीने जीप घेऊन किल्लारीत दाखल झाले. 

दिवसभर माहिती गोळा करून संध्याकाळी लातूरला गंजगोलाई येथील लोकमत कार्यालयातून तो सर्व वृत्तान्त एससीआर फाईलने औरंगाबादला पाठवला. लातूर शहरात लाईट गेली होती. भूकंपामुळे लोकांनी दुकाने बंद ठेवली होती. एव्हाना मुख्यमंत्री दाखल झाले होते. राम अग्रवाल यांनी आणलेल्या जीपमधून मी आणि चालक औरंगाबादकडे  निघालो. शहराच्या बाहेर पडतो न् पडतो तोच जीपचा पाटा तुटला. लातुरात एक-दोन ठिकाणच्या गॅरेजवाल्यांना हाता-पाया पडल्यानंतर एकाने तो दुरुस्त केला. 

जीपचा पाटा बसविल्याचा आनंद फार काळ राहिला नाही. रेणापूर फाटा येत असतानाच हेडलाईट डीम असल्याचे लक्षात आले. त्यामुळे गाडी लोखंडी सावरगावहून औरंगाबादकडे नेण्याऐवजी पुन्हा अंबाजोगाईत आणली, नवीन हेडलाईट लावले आणि मग सुसाट वेगात आम्ही औरंगाबादकडे निघालो. गाडी ‘लोकमत’च्या गेटजवळ येताच आश्चर्याचा धक्का बसला. तत्कालीन संपादक राजेंद्र दर्डा स्वत: फोटोची वाट पाहत उभे होते. मला पाहताच ते म्हणाले की, कॅमेरा घेऊन सरळ डार्करूममध्ये जा. फोटो डेव्हलप करण्यासाठी दिले. कॅमेऱ्यातून रोल बाहेर काढला. निगेटिव्ह डेव्हलप केली, वाळविली. तो काळ उलट्या फिल्म लावण्याचा होता. फिल्म धुणे, ट्रेमधून काढणे, त्या हिटरवर वाळविणे अन्् कात्रीने कापून पेजला लावणे, असे संपूर्ण ट्रेस झाल्यानंतर प्लेटिंग, प्रिंटिंग अशी वेगवेगळी बाळंतपणे होत असत. अखेर तासाभरानंतर पहिला ट्रायल पेपर आला. 

दुसऱ्या दिवशी प्रत्येकाची पान १ वर बायलाईन झळकली होती. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील अनेक गावांना क्षती पोहोचली होती. प्रत्येक ठिकाणच्या दु:खाला एक वेगळी लकेर होती. मी वारंवार तो पेपर वाचत होतो; पण समाधान होत नव्हते. त्याला किल्लारीच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आठवणींची एक काजळी होती. मन काळवंडलेले होते, दु:खाची एक लकीर कायमस्वरूपी कोरली गेली होती. नातवाचे निस्तेज कलेवर घेऊन फिरणारे भावनाशून्य डोळ्याचे आजोबा मी किल्लारीत पाहिले होते. आजोबांच्या सुकलेल्या पाठीवर घोडाघोडा करून त्यांना पिकलेल्या वयात आनंद देणारा नातू त्यांच्याच हातावर निस्तेज पडलेला होता. किल्लारीतील त्या घराचे माळवद माझ्या डोळ्यांदेखत पडले. जमिनीत गाडल्या गेलेल्या कुटुंबाने नंतर अनेक दिवस माझी झोप उडवली होती. आज पंचवीस वर्षांनंतर पुन्हा ते फ्लॅशबॅक डोळ्यासमोर तरळताना आपण आताही तिथेच उभे आहोत, असे जाणवते. 

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूरAurangabadऔरंगाबाद