शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

Killari Earthquake : जाणीव जबाबदारीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:46 IST

प्रेतरूप झालेल्या या माणसांच्या आतील माणूस जिवंत करणे हे महाकठीण काम सर्वांवर येऊन पडले होते. एकट्या प्रशासनाला ही जबाबदारी पेलणे शक्य नव्हते. येथेही लोकमतने आपले योगदान दिले.

- चक्रधर दळवी, संपादक, लोकमत, औरंगाबाद

ती सकाळ माझ्या मनावर शिलालेखासारखी कोरली गेली आहे. ती सकाळ नव्हतीच. महाभयंकर काळरात्रीची ती सुरुवात होती. सकाळी ६.०० वाजेच्या सुमारास लोकमतच्या सुरक्षारक्षकाचा फोन आला. ‘साहेब (लोकमतचे तत्कालीन संपादक राजेंद्र दर्डा) आॅफिसला येऊन बसले आहेत अर्जंट या. भूकंप झाला आहे.’ तेव्हा आताच्यासारखी माहितीची साधने नव्हती. त्यामुळे तपशील कळायला मार्ग नव्हता. मी लोकमत अपार्टमेंटलाच राहत होतो. दोन मिनिटांत आॅफिसला पोहोचलो. थोड्या वेळातच सर्व सहकारी आॅफिसला पोहोचले. जीवित हानी किती झाली, याची माहिती घेण्याचे काम तातडीने सुरू झाले. साहेब स्वत: सूत्रे हलवित होते, चित्र भयानक आहे. हे कळायला फार वेळ लागला नाही.

रिपोर्टिंगबरोबरच प्रत्यक्ष मदत कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे याची जाणीव झाली. साहेबांनी सहकाऱ्यांची छोटीशी बैठक घेऊन स्थितीचे गांभीर्य विशद केले. लोकमतवर असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. कामाची विभागणी करून दिली आणि लोकमत आपली ऐतिहासिक जबाबदारी पार पाडण्यास सज्ज झाला. ‘आॅन द स्पॉट’ माहिती मिळावी यासाठी वार्ताहरांना घटनास्थळी पाठविण्याची व्यवस्था केल्यानंतर साहेबांनी मदतकार्याच्या मोहिमेकडे मोर्चा वळविला.

२ आॅक्टोबरच्या शांतता रॅलीच्या तयारीसाठी आदल्या दिवशीच बैठक झाली होती. बैठकीला जे मान्यवर उपस्थित होते, त्या सगळ्यांना फोन करण्यात आले. मदत पाठविण्याची विनंती त्याला करण्यात आली. लोकमतच्या या पुढाकाराला उत्तम प्रतिसाद मिळाला. खाद्याची पाकिटे आणि कपडे गोळा झाले. ही सर्व मदत दुपारच्या आत चिकलठाणा लायन्स क्लबच्या ट्रकमधून भूकंपग्रस्तांसाठी रवाना झाली.

या भूकंपात सुमारे पावणेदहा हजार माणसे काही क्षणांत मेली. जिवंत राहिलेली माणसे मात्र नंतर कित्येक वर्षे रोजचे मरण मरत राहिले. मृत्यूचे तांडव बघून माणसांची मने मेली. केवळ हालतात, चालतात म्हणून त्यांना जिवंत म्हणायचे, अशी स्थिती होती. प्रेतरूप झालेल्या या माणसांच्या आतील माणूस जिवंत करणे हे महाकठीण काम सर्वांवर येऊन पडले होते. एकट्या प्रशासनाला ही जबाबदारी पेलणे शक्य नव्हते. येथेही लोकमतने आपले योगदान दिले. लोकमतचे वार्ताहर भूकंपग्रस्त भागात समर्पित भावनेने वावरत होते. 

भूकंपग्रस्तांच्या प्रत्येक समस्येला वृत्तपत्रातून वाचा फोडूनच आम्ही थांबलो नाही, तर समस्या सोडविणे ज्या यंत्रणांच्या अखत्यारीत होते, त्या यंत्रणेशी थेट संपर्क साधून समस्या मार्गी लावल्या. या महान कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य मला लाभले याचा मला आनंद आहे. लोकमतच्या पुढाकाराचा आपण एक भाग होतो, ही भावना मनाला कृतकृत्य करते.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूरAurangabadऔरंगाबाद