शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Killari Earthquake : जाणीव जबाबदारीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:46 IST

प्रेतरूप झालेल्या या माणसांच्या आतील माणूस जिवंत करणे हे महाकठीण काम सर्वांवर येऊन पडले होते. एकट्या प्रशासनाला ही जबाबदारी पेलणे शक्य नव्हते. येथेही लोकमतने आपले योगदान दिले.

- चक्रधर दळवी, संपादक, लोकमत, औरंगाबाद

ती सकाळ माझ्या मनावर शिलालेखासारखी कोरली गेली आहे. ती सकाळ नव्हतीच. महाभयंकर काळरात्रीची ती सुरुवात होती. सकाळी ६.०० वाजेच्या सुमारास लोकमतच्या सुरक्षारक्षकाचा फोन आला. ‘साहेब (लोकमतचे तत्कालीन संपादक राजेंद्र दर्डा) आॅफिसला येऊन बसले आहेत अर्जंट या. भूकंप झाला आहे.’ तेव्हा आताच्यासारखी माहितीची साधने नव्हती. त्यामुळे तपशील कळायला मार्ग नव्हता. मी लोकमत अपार्टमेंटलाच राहत होतो. दोन मिनिटांत आॅफिसला पोहोचलो. थोड्या वेळातच सर्व सहकारी आॅफिसला पोहोचले. जीवित हानी किती झाली, याची माहिती घेण्याचे काम तातडीने सुरू झाले. साहेब स्वत: सूत्रे हलवित होते, चित्र भयानक आहे. हे कळायला फार वेळ लागला नाही.

रिपोर्टिंगबरोबरच प्रत्यक्ष मदत कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे याची जाणीव झाली. साहेबांनी सहकाऱ्यांची छोटीशी बैठक घेऊन स्थितीचे गांभीर्य विशद केले. लोकमतवर असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. कामाची विभागणी करून दिली आणि लोकमत आपली ऐतिहासिक जबाबदारी पार पाडण्यास सज्ज झाला. ‘आॅन द स्पॉट’ माहिती मिळावी यासाठी वार्ताहरांना घटनास्थळी पाठविण्याची व्यवस्था केल्यानंतर साहेबांनी मदतकार्याच्या मोहिमेकडे मोर्चा वळविला.

२ आॅक्टोबरच्या शांतता रॅलीच्या तयारीसाठी आदल्या दिवशीच बैठक झाली होती. बैठकीला जे मान्यवर उपस्थित होते, त्या सगळ्यांना फोन करण्यात आले. मदत पाठविण्याची विनंती त्याला करण्यात आली. लोकमतच्या या पुढाकाराला उत्तम प्रतिसाद मिळाला. खाद्याची पाकिटे आणि कपडे गोळा झाले. ही सर्व मदत दुपारच्या आत चिकलठाणा लायन्स क्लबच्या ट्रकमधून भूकंपग्रस्तांसाठी रवाना झाली.

या भूकंपात सुमारे पावणेदहा हजार माणसे काही क्षणांत मेली. जिवंत राहिलेली माणसे मात्र नंतर कित्येक वर्षे रोजचे मरण मरत राहिले. मृत्यूचे तांडव बघून माणसांची मने मेली. केवळ हालतात, चालतात म्हणून त्यांना जिवंत म्हणायचे, अशी स्थिती होती. प्रेतरूप झालेल्या या माणसांच्या आतील माणूस जिवंत करणे हे महाकठीण काम सर्वांवर येऊन पडले होते. एकट्या प्रशासनाला ही जबाबदारी पेलणे शक्य नव्हते. येथेही लोकमतने आपले योगदान दिले. लोकमतचे वार्ताहर भूकंपग्रस्त भागात समर्पित भावनेने वावरत होते. 

भूकंपग्रस्तांच्या प्रत्येक समस्येला वृत्तपत्रातून वाचा फोडूनच आम्ही थांबलो नाही, तर समस्या सोडविणे ज्या यंत्रणांच्या अखत्यारीत होते, त्या यंत्रणेशी थेट संपर्क साधून समस्या मार्गी लावल्या. या महान कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य मला लाभले याचा मला आनंद आहे. लोकमतच्या पुढाकाराचा आपण एक भाग होतो, ही भावना मनाला कृतकृत्य करते.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूरAurangabadऔरंगाबाद