शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Killari Earthquake : जाणीव जबाबदारीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:46 IST

प्रेतरूप झालेल्या या माणसांच्या आतील माणूस जिवंत करणे हे महाकठीण काम सर्वांवर येऊन पडले होते. एकट्या प्रशासनाला ही जबाबदारी पेलणे शक्य नव्हते. येथेही लोकमतने आपले योगदान दिले.

- चक्रधर दळवी, संपादक, लोकमत, औरंगाबाद

ती सकाळ माझ्या मनावर शिलालेखासारखी कोरली गेली आहे. ती सकाळ नव्हतीच. महाभयंकर काळरात्रीची ती सुरुवात होती. सकाळी ६.०० वाजेच्या सुमारास लोकमतच्या सुरक्षारक्षकाचा फोन आला. ‘साहेब (लोकमतचे तत्कालीन संपादक राजेंद्र दर्डा) आॅफिसला येऊन बसले आहेत अर्जंट या. भूकंप झाला आहे.’ तेव्हा आताच्यासारखी माहितीची साधने नव्हती. त्यामुळे तपशील कळायला मार्ग नव्हता. मी लोकमत अपार्टमेंटलाच राहत होतो. दोन मिनिटांत आॅफिसला पोहोचलो. थोड्या वेळातच सर्व सहकारी आॅफिसला पोहोचले. जीवित हानी किती झाली, याची माहिती घेण्याचे काम तातडीने सुरू झाले. साहेब स्वत: सूत्रे हलवित होते, चित्र भयानक आहे. हे कळायला फार वेळ लागला नाही.

रिपोर्टिंगबरोबरच प्रत्यक्ष मदत कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे याची जाणीव झाली. साहेबांनी सहकाऱ्यांची छोटीशी बैठक घेऊन स्थितीचे गांभीर्य विशद केले. लोकमतवर असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. कामाची विभागणी करून दिली आणि लोकमत आपली ऐतिहासिक जबाबदारी पार पाडण्यास सज्ज झाला. ‘आॅन द स्पॉट’ माहिती मिळावी यासाठी वार्ताहरांना घटनास्थळी पाठविण्याची व्यवस्था केल्यानंतर साहेबांनी मदतकार्याच्या मोहिमेकडे मोर्चा वळविला.

२ आॅक्टोबरच्या शांतता रॅलीच्या तयारीसाठी आदल्या दिवशीच बैठक झाली होती. बैठकीला जे मान्यवर उपस्थित होते, त्या सगळ्यांना फोन करण्यात आले. मदत पाठविण्याची विनंती त्याला करण्यात आली. लोकमतच्या या पुढाकाराला उत्तम प्रतिसाद मिळाला. खाद्याची पाकिटे आणि कपडे गोळा झाले. ही सर्व मदत दुपारच्या आत चिकलठाणा लायन्स क्लबच्या ट्रकमधून भूकंपग्रस्तांसाठी रवाना झाली.

या भूकंपात सुमारे पावणेदहा हजार माणसे काही क्षणांत मेली. जिवंत राहिलेली माणसे मात्र नंतर कित्येक वर्षे रोजचे मरण मरत राहिले. मृत्यूचे तांडव बघून माणसांची मने मेली. केवळ हालतात, चालतात म्हणून त्यांना जिवंत म्हणायचे, अशी स्थिती होती. प्रेतरूप झालेल्या या माणसांच्या आतील माणूस जिवंत करणे हे महाकठीण काम सर्वांवर येऊन पडले होते. एकट्या प्रशासनाला ही जबाबदारी पेलणे शक्य नव्हते. येथेही लोकमतने आपले योगदान दिले. लोकमतचे वार्ताहर भूकंपग्रस्त भागात समर्पित भावनेने वावरत होते. 

भूकंपग्रस्तांच्या प्रत्येक समस्येला वृत्तपत्रातून वाचा फोडूनच आम्ही थांबलो नाही, तर समस्या सोडविणे ज्या यंत्रणांच्या अखत्यारीत होते, त्या यंत्रणेशी थेट संपर्क साधून समस्या मार्गी लावल्या. या महान कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य मला लाभले याचा मला आनंद आहे. लोकमतच्या पुढाकाराचा आपण एक भाग होतो, ही भावना मनाला कृतकृत्य करते.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूरAurangabadऔरंगाबाद