शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

मुले गुटगुटीत, पण लठ्ठ तर नाहीत ना ? लहान वयातील लठ्ठपणा ठरू शकतो धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 19:05 IST

जागतिक स्थूलता दिन : ४० टक्के मुले लठ्ठ, मोबाईलचा सतत वापर, जंकफूड आणि मैदानी खेळ बंद झाल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीला हातभार लागत आहे.

औरंगाबाद : लहान मुलांमधील स्थूलता ही आता दिवसागणिक वाढत जाणारी गंभीर समस्या बनली आहे. शहरी भागांमधूनच नव्हे तर ग्रामीण भाग व तुलनेने गरीब कुटुंबातही आता स्थूल मुलांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ओपीडीत येणारी ४० टक्के किशोरवयीन मुले लठ्ठ असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञ संघटनेने नोंदविले आहे.

दरवर्षी ४ मार्च हा दिवस जागतिक स्थूलता दिन म्हणून पाळला जातो. बैठी जीवनशैली, मैदानी खेळांचा अभाव, मोबाईल इंटरनेटचे वेड, घरगुती पदार्थांविषयी कमी झालेली मुलांची आवड, पालकांची व्यस्तता या सगळ्यांमुळे दिवसेंदिवस ही समस्या अक्राळविक्राळ रूप धारण करत आहे.

काय आहे धोका ?मुलांचे स्थूलत्व जितके जास्त वर्षे राहील तितके प्रौढ वयात स्थूल राहण्याचे प्रमाण अधिक. यावर लवकर उपाय न केल्यास प्रौढावस्थेमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसनाचे आजार व तरुण वयातच हृदयरोग, पक्षाघात, सांध्याचे आजार, काही प्रकारचे कॅन्सर इ. आजारांचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

स्थूलत्वाची प्रमुख कारणे १) अति उष्मांक सेवनामुळे येणारे स्थूलत्व २) जनुकीय दोषांमुळे येणारे स्थूलत्व. यामध्ये स्थूलतेबरोबरच मतिमंदत्व, चेहऱ्याची विशिष्ट ठेवण, सदोष जननक्षमता इ.३) आंतरग्रंथींमधील दोष. काही विशिष्ट हार्मोन्सच्या कमतरतेमुळे (उदा. थायरॉईड हार्मोन, ग्रोथ हार्मोन) किंवा अतिप्रमाणात.४) इतर कारणांमध्ये मेंदूच्या काही आजारानंतर येणारे स्थूलत्व, काही औषधांमुळे येणारे स्थूलत्व.

स्थूलत्व हा आजारसर्वप्रथम स्थूलत्व हा आजार आहे, हे सर्वांनी मान्य केले पाहिजे. लठ्ठ किंवा गुटगुटीत बाळ म्हणजे सुदृढ ही संकल्पना चुकीची आहे, हे समजून घ्यायला हवे.- डॉ. संध्या कोंडपल्ले, सचिव, औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटना

एकत्रित प्रयत्न व्हावालहान मुलांमधील वाढत चाललेल्या स्थूलत्वाकडे कौटुंबिक, सामाजिक व शासकीय अशा सर्व पातळ्यांवर एकत्रित प्रयत्न झाल्यास उद्याची पिढी आरोग्यसंपन्न, सुदृढ व उत्साही होण्याकडे आपला प्रवास सुरू होईल.- डॉ. राजश्री रत्नपारखी, अध्यक्ष, औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटना

जंकफूडपासून मुलांना ठेवा दूरमोबाईलचा सतत वापर, जंकफूड आणि मैदानी खेळ बंद झाल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीला हातभार लागत आहे.पालकांनी कोरोनाची भीती न बाळगता मुलांना खेळण्यासाठी पाठविले पाहिजे.- डाॅ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य