शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

पैठणच्या अपहृत तरुणाची २५ दिवसांनानंतर पोलिसांनी केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 13:21 IST

२५ दिवसांपूर्वी पैठण शहरातून अपहरण केलेल्या १९ वर्षीय तरुणाची पैठण पोलिसांनी भिवरी सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील एका बंद घराच्या लाकडी कपाटातून मोठ्या शिताफीने सुटका केली.

ठळक मुद्दे या तरुणाच्या वडिलाने आरोपीकडून वीटभट्टीच्या व्यवसायासाठी पाच लाख रुपये हात उसने घेतले होते. पैठण पोलिसांनी याप्रकरणी तीन महिलांसह चार आरोपींना अटक केली

पैठण ( औरंगाबाद ) : २५ दिवसांपूर्वी पैठण शहरातून अपहरण केलेल्या १९ वर्षीय तरुणाची पैठण पोलिसांनी भिवरी सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील एका बंद घराच्या लाकडी कपाटातून मोठ्या शिताफीने सुटका केली. या तरुणाच्या वडिलाने आरोपीकडून वीटभट्टीच्या व्यवसायासाठी पाच लाख रुपये हात उसने घेतले होते. दरम्यान, वीटभट्टी व्यवसायात सध्या मंदीचे वातावरण असल्याने घेतलेले उसने पैसे परत करणे शक्य न झाल्याने ४ एप्रिल रोजी या तरुणाचे पैठण येथून अपहरण करण्यात आले होते. गेले २५ दिवस या तरुणास लाकडी कपाटात बंद करून मोठा छळ करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. पैठण पोलिसांनी याप्रकरणी तीन महिलांसह चार आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात केली आहे.

पैठण येथील वीटभट्टी व्यावसायिक अशोक उमाजी पराड (रा. नवीन कावसान) यांनी विलास गायकवाड (रा. भिवरी सासवड, जि. पुणे) यांच्याकडून वीटभट्टीच्या व्यवसायासाठी पाच लाख रुपये उसनवारीवर घेतले होते. हे पैसे टप्प्याटप्प्याने परत देणार, असे पराड यांनी गायकवाड याला लिहून दिले होते. यापैकी ६० हजार रुपये परतफेड करण्यात आले होते. उसनवारी घेतलेल्या पाच लाखांपैकी चार लाख चाळीस हजार रुपये पराड यांना वेळेवर परत करणे शक्य न झाल्याने गायकवाड यांनी पैठण गाठून पराड यांच्याकडे पैशाची मागणी केली व रक्कम परत मिळत नाही हे लक्षात येताच गायकवाडने अशोक पराड यांचा मुलगा विश्वनाथ पराड (१९) याचे ४ एप्रिल रोजी जीपगाडीत बळजबरीने कोंबून अपहरण केले होते. 

याप्रकरणी अशोक उमाजी पराड यांनी ५ एप्रिल रोजी पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवरून पैठण पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी संशयित आरोपींना पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. के. वारे यांनी २५ एप्रिल रोजी अटक केली होती. यात आरोपी विलास गायकवाड, दिव्या विलास गायकवाड, प्रमिला विलास गायकवाड, संगीता राजेंद्र गायकवाड (सर्व रा. भिवरी, जि. पुणे) यांचा समावेश होता. मुख्य आरोपी प्रतीक विलास गायकवाड फरार झाला होता. या सर्व आरोपींची पोलीस कोठडी घेण्यात आली. पोनि. इमले यांनी हवालदार सिराज पठाण व पोलीस नाईक राजू बर्डे यांना २९ रोजी रात्री भिवरी येथे रवाना केले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या घरावर छापा टाकून कपाटात दडवून ठेवलेल्या विश्वनाथची सुटका करून त्यास सोमवारी पैठण येथे आणले. त्याला बघून  आईने हंबरडा फोडला.

असा लावला पोलिसांनी तपासमुलाच्या वडिलाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी आरोपीचे मोबाईल क्रमांक घेऊन त्यांचे लोकेशन तपासले तसेच कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) वरून संशयित आरोपी गुन्हा घडला त्यावेळेस त्याच ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सुदाम वारे, हवालदार सिराज पठाण, पोलीस नाईक राजू बर्डे यांनी आरोपीचे भिवरी सासवड येथील घर गाठून घरातील तीन महिलांसह एक जणास अटक केली. पोलीस कोठडीत इमले यांनी चारही आरोपींची वेगवेगळी चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीत मोठी तफावत आढळून आल्याने अपहरण केलेला मुलगा त्यांच्या घरातच असल्याची खात्री झाली. तातडीने हवालदार पठाण व बर्डे यांना मुलाच्या शोधासाठी रवाना केले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या घराची झडती घेत असताना एका कपाटात विश्वनाथ पोलिसांना आढळून आला व त्याची सुटका केली.

खूप छळ केला -विश्वनाथ पराडपैठण येथील गोलनाका परिसरातून सफारी गाडीतून आलेल्या तीन महिला व दोघांनी माझ्या गळ्याला चाकू लावून गाडीत बसविले. आवाज केला तर मारून टाकू, अशी धमकी दिली. भिवरी येथील एका बंद खोलीत डांबून मला खूप मारहाण करण्यात आली. मला गुडघ्यावर चालावे लागत होते. दोन शस्त्रधारी पहारेदार होते. चार वेळा पोलीस झडतीसाठी आले तेव्हा मला कपाटात डांबून ठेवायचे. मी प्रचंड दहशतीत असल्याने आवाज करण्याची हिंमत झाली नाही. परंतु काल जेव्हा पोलीस आले तेव्हा आरोपींनी मला कपाटात टाकले. पोलीस घराची झडती घेत असताना मी हळूच दरवाजा उघडून बाहेर पाहिले तेव्हा मी हे पैठणचे पोलीस असल्याचे ओळखले. तोपर्यंत राजू बर्डे यांनी कपाट उघडून मला बाहेर काढले. मी त्यांना घट्ट मिठी मारली. त्यांनी माझी सुटका केली, अशी आपबिती विश्वनाथ पराड याने सांगितली.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसhersulहर्सूलjailतुरुंग