शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

नात्यातील मुलीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या रागातून तरुणाचे अपहरण करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 20:01 IST

नातेवाईक तरूणीसोबत अनैतिक संबंधाच्या रागातून दोन आरोपींनी एका तरूणाचे अपहरण करून खुन केल्याची घटना उघडकीस आली.

औरंगाबाद : नातेवाईक तरूणीसोबत अनैतिक संबंधाच्या रागातून दोन आरोपींनी एका तरूणाचे अपहरण करून खुन केल्याची घटना नानेगाव (ता. पैठण) येथे आज (दि.२९) उघडकीस आली. याप्रकरणी पाचोड पोलिसांनी दोन्ही आरोपींनी अटक करून खूनाचा गुन्हा दाखल केला.

तुकाराम बाळासाहेब माने वय (२२) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहेत. तर अजिनाथ मोरे (रा. नानेगाव ता. पैठण), गोरख रामदास माळी (रा. बोरगाव ता.पैठण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोमवारी (दि.२२) रात्री ९ वाजता नऊ वाजता घरातून तुकाराम घरातून बाहेर पडला होता. तो बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने कुटुंबियांनी तुकारामचा गावात शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. दरम्यान, तुकाराम घरी असताना ज्या तरूणाने त्याला बोलावून नेले तो गायब असल्याचे कुटूंबियाच्या लक्षात आले. यावरून कुटूंबियांनी तुकाराम याचे अपहरण झाल्याची तक्रार बुधवारी (दि.२४) पाचोड पोलीस ठाण्यात दिली होती.

यावरून पाचोड पोलिसांनी अपहरण झाल्याची नोंद करून तपास सुरू केला व संशयीत आरोपी अजिनाथ मोरे व गोरख माळी यांना सोमवारी (दि.२९) ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता नातेवाईक मुलीसोबत अनैतिक संबध असल्याच्या कारणावरून तुकाराम याचा रॉडने मारहाण करून त्याचा खून केला व प्रेत विहिरीत फेकल्याचे आरोपींनी कबुल केले. 

आरोपींनी नानेगाव शिवारातील एका पडीक विहीरीत प्रेत फेकल्याचे सांगितले. मंगळवारी (दि.३०) पाचोड पोलिसांनी फौजफाट्यासह घटना स्थळ गाठले. विहिरीत बघितले असता एका तरूणाचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसून आले. पाचोड ठाण्याचे सपोनि. अभिजित मोरे, फौजदार गोरक्षनाथ खरड, प्रदिप ऐकशिंगे, शिंदे, जमादार सुधाकर मोहीते, संजय चव्हाण, रामदास राख, पोलीस पाटील संतोष बोधने यांनी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रेत विहिरी बाहेर काढण्यात आले. यावेळी मृतदेहाला मोठ मोठे दगड बांधल्याचे दिसून आले. बालानगर आरोग्य केंद्राचे वैद्यकिय आधिकारी डॉ. मनियार यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. त्याच्या खिशात सापडलेल्या आधार व एटीमए कार्डवरून त्याची ओळख पटविण्यात आली. दुपारी उशीरा मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, यावेळी घटनास्थळी मोठा जमाव जमल्याने दंगा काबु पथकाला पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी बाळासाहेब माने यांच्या फिर्यादीवरून अजिनाथ मोरे, गोरख माळी यांच्याविरूद्ध पाचोड ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्ूपर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास सपोनि. मोरे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस