शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकांना मिळाले जीवदान; अनेक दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाची पुन्हा एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 12:22 IST

Rain in Marathwada : गेल्या २४ तासांत परभणी, नांदेड, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

ठळक मुद्देअधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती.भिज पावसामुळे कोमेजून जाणाऱ्या खरीप पिकांना जीवदान मिळाले

औरंगाबाद : अनेक दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दुबारपेरणीचे संकट आ वासून उभे होते. मात्र, वरुणराजाने पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या २४ तासांत परभणी, नांदेड, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. ( Kharif crops get life saving as rain re-renter in Marathwada ) 

परभणी जिल्ह्यात १५ दिवसांच्या खंडानंतर बुधवारी रात्री झालेल्या भिज पावसामुळे कोमेजून जाणाऱ्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. परभणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. तालुक्याच्या ग्रामीण भागात ४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्हाभरात सरासरी १३.१ मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान, गुरुवारीदेखील जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती.

१६ व्या दिवशी बरसलाकौठा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील कौठा व परिसरात पेरणीनंतर पाऊस गायबच झाला होता. तब्बल १६ व्या दिवशी पाऊस बरसला. पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, कापूस, हळद इत्यादी पिके अक्षरशः वाळत होती. अगोदरच मागील वर्षापासून सतत कोरोना, टाळेबंदी, पिकांना भाव नाही अशा संकटांनी शेतकरी व सर्वसामान्य माणूस वैतागून गेला आहे. त्यातच आता पुन्हा पाऊस वेळेवर नसल्याने नवेच संकट उभे राहिले होते.

नांदेड जिल्ह्यात ३६.२ मि.मी. पाऊसनांदेड जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३६.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ५९ मि.मी. पावसाची नोंद भोकर तालुक्यात झाली आहे. जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा केली जात होती. बुधवारी रात्री उशिरा पावसाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात आतापर्यंत २७३ मि.मी. पाऊस झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा