शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात; सहा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:22 IST

अडीच महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १५ प्रकारची पिके खरीप हंगामात घेण्यात आली आहेत यंदाच्या हंगामात ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.

औरंगाबाद : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अडीच महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. १६ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात १५ प्रकारची पिके खरीप हंगामात घेण्यात आली असून, यंदाच्या हंगामात ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. ज्वारी, बाजरी, मका, तृणधान्ये, तूर, मूग, उडीद, कडधान्य, भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन, गळीत धान्य, कापूस, ऊस आदीची लागवड करण्यात आली आहे. साडेपाच लाख हेक्टरवर या पिकांची पेरणी झालेली आहे. फुलंब्री, पैठण, सिल्लोड, कन्नड, गंगापूर, खुलताबाद या तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, तर उर्वरित औरंगाबाद, सोयगाव आणि वैजापूर तालुक्यांत ५० टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच्या डीपीसीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील दुष्काळसदृश स्थितीकडे लक्ष वेधले होते. वैजापूर, गंगापूर, पैठण, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड तालुक्यांतील खरीप हंगामाच्या परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाली. दरमहा पिकांच्या आढाव्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत शासनाकडे दुष्काळासंदर्भात अहवाल पाठविण्यात येणार आहे. 

३० आॅक्टोबरपर्यंत शासन खरीप हंगामाबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. शासनाने याबाबत एक अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार तालुकानिहाय पिकपाण्याची माहिती शासनाकडे पाठवावी लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अहवाल ३० सप्टेंबरपूर्वी शासनाकडे पाठविण्यात येईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. 

३४० गावांत ३७८ टँकरजिल्ह्यातील ३४० गावांत ३७८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर जालना जिल्ह्यातील ३२ गावांत ४७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या दोन्ही जिल्ह्यांत ४४४ टँकर सुरू आहेत. यावरून पिण्याच्या पाण्याची अवस्था किती बिकट आहे, याचा अंदाज येतो. पावसाचा टक्का वाढला असला तरी भूजल पातळीत वाढ झाली नसल्यामुळे पाण्याचे संकट कायमच आहे. गतवर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला होता. यंदाही तीच परिस्थिती आहे. सध्या होत असलेल्या पावसाचा खरीप हंमागाला फारसा लाभ होणार नाही, असेच चित्र आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती