शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात; सहा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:22 IST

अडीच महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १५ प्रकारची पिके खरीप हंगामात घेण्यात आली आहेत यंदाच्या हंगामात ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.

औरंगाबाद : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अडीच महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. १६ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात १५ प्रकारची पिके खरीप हंगामात घेण्यात आली असून, यंदाच्या हंगामात ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. ज्वारी, बाजरी, मका, तृणधान्ये, तूर, मूग, उडीद, कडधान्य, भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन, गळीत धान्य, कापूस, ऊस आदीची लागवड करण्यात आली आहे. साडेपाच लाख हेक्टरवर या पिकांची पेरणी झालेली आहे. फुलंब्री, पैठण, सिल्लोड, कन्नड, गंगापूर, खुलताबाद या तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, तर उर्वरित औरंगाबाद, सोयगाव आणि वैजापूर तालुक्यांत ५० टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच्या डीपीसीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील दुष्काळसदृश स्थितीकडे लक्ष वेधले होते. वैजापूर, गंगापूर, पैठण, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड तालुक्यांतील खरीप हंगामाच्या परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाली. दरमहा पिकांच्या आढाव्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत शासनाकडे दुष्काळासंदर्भात अहवाल पाठविण्यात येणार आहे. 

३० आॅक्टोबरपर्यंत शासन खरीप हंगामाबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. शासनाने याबाबत एक अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार तालुकानिहाय पिकपाण्याची माहिती शासनाकडे पाठवावी लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अहवाल ३० सप्टेंबरपूर्वी शासनाकडे पाठविण्यात येईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. 

३४० गावांत ३७८ टँकरजिल्ह्यातील ३४० गावांत ३७८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर जालना जिल्ह्यातील ३२ गावांत ४७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या दोन्ही जिल्ह्यांत ४४४ टँकर सुरू आहेत. यावरून पिण्याच्या पाण्याची अवस्था किती बिकट आहे, याचा अंदाज येतो. पावसाचा टक्का वाढला असला तरी भूजल पातळीत वाढ झाली नसल्यामुळे पाण्याचे संकट कायमच आहे. गतवर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला होता. यंदाही तीच परिस्थिती आहे. सध्या होत असलेल्या पावसाचा खरीप हंमागाला फारसा लाभ होणार नाही, असेच चित्र आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती