शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात; सहा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:22 IST

अडीच महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १५ प्रकारची पिके खरीप हंगामात घेण्यात आली आहेत यंदाच्या हंगामात ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.

औरंगाबाद : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अडीच महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. १६ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात १५ प्रकारची पिके खरीप हंगामात घेण्यात आली असून, यंदाच्या हंगामात ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. ज्वारी, बाजरी, मका, तृणधान्ये, तूर, मूग, उडीद, कडधान्य, भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन, गळीत धान्य, कापूस, ऊस आदीची लागवड करण्यात आली आहे. साडेपाच लाख हेक्टरवर या पिकांची पेरणी झालेली आहे. फुलंब्री, पैठण, सिल्लोड, कन्नड, गंगापूर, खुलताबाद या तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, तर उर्वरित औरंगाबाद, सोयगाव आणि वैजापूर तालुक्यांत ५० टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच्या डीपीसीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील दुष्काळसदृश स्थितीकडे लक्ष वेधले होते. वैजापूर, गंगापूर, पैठण, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड तालुक्यांतील खरीप हंगामाच्या परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाली. दरमहा पिकांच्या आढाव्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत शासनाकडे दुष्काळासंदर्भात अहवाल पाठविण्यात येणार आहे. 

३० आॅक्टोबरपर्यंत शासन खरीप हंगामाबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. शासनाने याबाबत एक अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार तालुकानिहाय पिकपाण्याची माहिती शासनाकडे पाठवावी लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अहवाल ३० सप्टेंबरपूर्वी शासनाकडे पाठविण्यात येईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. 

३४० गावांत ३७८ टँकरजिल्ह्यातील ३४० गावांत ३७८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर जालना जिल्ह्यातील ३२ गावांत ४७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या दोन्ही जिल्ह्यांत ४४४ टँकर सुरू आहेत. यावरून पिण्याच्या पाण्याची अवस्था किती बिकट आहे, याचा अंदाज येतो. पावसाचा टक्का वाढला असला तरी भूजल पातळीत वाढ झाली नसल्यामुळे पाण्याचे संकट कायमच आहे. गतवर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला होता. यंदाही तीच परिस्थिती आहे. सध्या होत असलेल्या पावसाचा खरीप हंमागाला फारसा लाभ होणार नाही, असेच चित्र आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती