शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘काश्मिरियत व भारतीयत वेगवेगळ्या नाहीत, त्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:57 IST

काश्मिरियत व भारतीयत वेगवेगळ्या नाहीत. त्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, काश्मिरियत ही एक जीवनशैली आहे. ती जोपासण्यातूनच काश्मीरचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास आज येथे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत देशमुख : जीवन विकास ग्रंथालयाचा वर्धापन दिन

औरंगाबाद : काश्मिरियत व भारतीयत वेगवेगळ्या नाहीत. त्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, काश्मिरियत ही एक जीवनशैली आहे. ती जोपासण्यातूनच काश्मीरचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास आज येथे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केला.जीवन विकास ग्रंथालयाच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘काश्मिरियत व भारतीयत : एकाच नाण्याच्या दोन बाजू’ या विषयावर ते सायंकाळी जीवन विकास ग्रंथालयाच्या सभागृहात व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी होते.लक्ष्मीकांत देशमुख यांची नजीकच्या काळात काश्मीर प्रश्नावर कादंबरी येणार आहे. अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काश्मीर प्रश्नाचा अभ्यास गांभीर्याने सुरू केला आहे. काश्मीरवर घरी एक कपाटभर पुस्तके असल्याची माहिती त्यांनी दिली.त्यांनी सांगितले की, भारत धर्मनिरपेक्ष राहिला, तरच काश्मीर धर्मनिरपेक्ष राहील. काश्मिरात काश्मिरियत जोपासली गेली पाहिजे. भारतमातेचा मुकुटमणी असलेल्या काश्मीरची प्रतीके पुढे आणली पाहिजेत. हरी पर्वत हे काश्मीरचे जिते जागते प्रतीक होय. हिंदू, बौद्ध, शीख आणि इस्लाम धर्माचा सुंदर मिलाफ काश्मिरात बघायला मिळतो. काश्मिरी भारतीयच आहेत, असे साऱ्या भारतीयांनी मानले पाहिजे. स्वतंत्र काश्मीरची कल्पना मुळीच शक्य नाही. भारताच्या संरक्षणासाठीही स्वतंत्र काश्मीर परवडणार नाही. धर्मनिरपेक्ष भारत... धर्मरिपेक्ष काश्मीर हेच खरे उत्तर होय.काश्मीर प्रश्न एका दिवसात सुटणारा नाही. त्यासाठी खूप मोठा त्याग करण्याचीही तयारी ठेवावी लागेल. काश्मिरी लोकांशी संवाद वाढवला गेला पाहिजे व काश्मिरी माणसाचा राग करणे सोडून दिले पाहिजे. काश्मिरी लोकांना भारतासोबत राहावे असेच वाटत असते. त्यामुळे तुम्ही आमचेच आहात, असा विश्वास त्यांना देत राहिले पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी केले.काश्मीरची स्थापना कशी झाली. तिथे १४ व्या शतकानंतर इस्लाग कसा वाढत गेला. तिथली संत परंपरा व साहित्य परंपरा कशी होती, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.प्रारंभी, देशमुख यांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले. त्यानंतर रा.श. वालेकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले, तर नितीन कंधारकर यांनी आभार मानले. माहिती आयुक्त दिलीप धारूरकर, जीवन विकास ग्रंथालयाचे कार्यवाह भा.बा. आर्वीकर, अनेक प्रकाशक व जाणकारांची यावेळी मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlibraryवाचनालय