शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

‘काश्मिरियत व भारतीयत वेगवेगळ्या नाहीत, त्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:57 IST

काश्मिरियत व भारतीयत वेगवेगळ्या नाहीत. त्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, काश्मिरियत ही एक जीवनशैली आहे. ती जोपासण्यातूनच काश्मीरचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास आज येथे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत देशमुख : जीवन विकास ग्रंथालयाचा वर्धापन दिन

औरंगाबाद : काश्मिरियत व भारतीयत वेगवेगळ्या नाहीत. त्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, काश्मिरियत ही एक जीवनशैली आहे. ती जोपासण्यातूनच काश्मीरचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास आज येथे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केला.जीवन विकास ग्रंथालयाच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘काश्मिरियत व भारतीयत : एकाच नाण्याच्या दोन बाजू’ या विषयावर ते सायंकाळी जीवन विकास ग्रंथालयाच्या सभागृहात व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी होते.लक्ष्मीकांत देशमुख यांची नजीकच्या काळात काश्मीर प्रश्नावर कादंबरी येणार आहे. अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काश्मीर प्रश्नाचा अभ्यास गांभीर्याने सुरू केला आहे. काश्मीरवर घरी एक कपाटभर पुस्तके असल्याची माहिती त्यांनी दिली.त्यांनी सांगितले की, भारत धर्मनिरपेक्ष राहिला, तरच काश्मीर धर्मनिरपेक्ष राहील. काश्मिरात काश्मिरियत जोपासली गेली पाहिजे. भारतमातेचा मुकुटमणी असलेल्या काश्मीरची प्रतीके पुढे आणली पाहिजेत. हरी पर्वत हे काश्मीरचे जिते जागते प्रतीक होय. हिंदू, बौद्ध, शीख आणि इस्लाम धर्माचा सुंदर मिलाफ काश्मिरात बघायला मिळतो. काश्मिरी भारतीयच आहेत, असे साऱ्या भारतीयांनी मानले पाहिजे. स्वतंत्र काश्मीरची कल्पना मुळीच शक्य नाही. भारताच्या संरक्षणासाठीही स्वतंत्र काश्मीर परवडणार नाही. धर्मनिरपेक्ष भारत... धर्मरिपेक्ष काश्मीर हेच खरे उत्तर होय.काश्मीर प्रश्न एका दिवसात सुटणारा नाही. त्यासाठी खूप मोठा त्याग करण्याचीही तयारी ठेवावी लागेल. काश्मिरी लोकांशी संवाद वाढवला गेला पाहिजे व काश्मिरी माणसाचा राग करणे सोडून दिले पाहिजे. काश्मिरी लोकांना भारतासोबत राहावे असेच वाटत असते. त्यामुळे तुम्ही आमचेच आहात, असा विश्वास त्यांना देत राहिले पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी केले.काश्मीरची स्थापना कशी झाली. तिथे १४ व्या शतकानंतर इस्लाग कसा वाढत गेला. तिथली संत परंपरा व साहित्य परंपरा कशी होती, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.प्रारंभी, देशमुख यांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले. त्यानंतर रा.श. वालेकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले, तर नितीन कंधारकर यांनी आभार मानले. माहिती आयुक्त दिलीप धारूरकर, जीवन विकास ग्रंथालयाचे कार्यवाह भा.बा. आर्वीकर, अनेक प्रकाशक व जाणकारांची यावेळी मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlibraryवाचनालय