शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा UNGA मध्ये मोठा आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
6
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
7
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
8
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
9
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
10
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
11
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
12
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
13
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
14
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
15
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
16
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
17
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
18
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
20
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका

‘काश्मिरियत व भारतीयत वेगवेगळ्या नाहीत, त्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:57 IST

काश्मिरियत व भारतीयत वेगवेगळ्या नाहीत. त्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, काश्मिरियत ही एक जीवनशैली आहे. ती जोपासण्यातूनच काश्मीरचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास आज येथे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत देशमुख : जीवन विकास ग्रंथालयाचा वर्धापन दिन

औरंगाबाद : काश्मिरियत व भारतीयत वेगवेगळ्या नाहीत. त्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, काश्मिरियत ही एक जीवनशैली आहे. ती जोपासण्यातूनच काश्मीरचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास आज येथे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केला.जीवन विकास ग्रंथालयाच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘काश्मिरियत व भारतीयत : एकाच नाण्याच्या दोन बाजू’ या विषयावर ते सायंकाळी जीवन विकास ग्रंथालयाच्या सभागृहात व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी होते.लक्ष्मीकांत देशमुख यांची नजीकच्या काळात काश्मीर प्रश्नावर कादंबरी येणार आहे. अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काश्मीर प्रश्नाचा अभ्यास गांभीर्याने सुरू केला आहे. काश्मीरवर घरी एक कपाटभर पुस्तके असल्याची माहिती त्यांनी दिली.त्यांनी सांगितले की, भारत धर्मनिरपेक्ष राहिला, तरच काश्मीर धर्मनिरपेक्ष राहील. काश्मिरात काश्मिरियत जोपासली गेली पाहिजे. भारतमातेचा मुकुटमणी असलेल्या काश्मीरची प्रतीके पुढे आणली पाहिजेत. हरी पर्वत हे काश्मीरचे जिते जागते प्रतीक होय. हिंदू, बौद्ध, शीख आणि इस्लाम धर्माचा सुंदर मिलाफ काश्मिरात बघायला मिळतो. काश्मिरी भारतीयच आहेत, असे साऱ्या भारतीयांनी मानले पाहिजे. स्वतंत्र काश्मीरची कल्पना मुळीच शक्य नाही. भारताच्या संरक्षणासाठीही स्वतंत्र काश्मीर परवडणार नाही. धर्मनिरपेक्ष भारत... धर्मरिपेक्ष काश्मीर हेच खरे उत्तर होय.काश्मीर प्रश्न एका दिवसात सुटणारा नाही. त्यासाठी खूप मोठा त्याग करण्याचीही तयारी ठेवावी लागेल. काश्मिरी लोकांशी संवाद वाढवला गेला पाहिजे व काश्मिरी माणसाचा राग करणे सोडून दिले पाहिजे. काश्मिरी लोकांना भारतासोबत राहावे असेच वाटत असते. त्यामुळे तुम्ही आमचेच आहात, असा विश्वास त्यांना देत राहिले पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी केले.काश्मीरची स्थापना कशी झाली. तिथे १४ व्या शतकानंतर इस्लाग कसा वाढत गेला. तिथली संत परंपरा व साहित्य परंपरा कशी होती, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.प्रारंभी, देशमुख यांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले. त्यानंतर रा.श. वालेकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले, तर नितीन कंधारकर यांनी आभार मानले. माहिती आयुक्त दिलीप धारूरकर, जीवन विकास ग्रंथालयाचे कार्यवाह भा.बा. आर्वीकर, अनेक प्रकाशक व जाणकारांची यावेळी मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlibraryवाचनालय