शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

के-हाळ्यात विठ्ठलनामाची ‘शाळा’ भरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:29 IST

अनोख्या भक्तीतून ५० लाखावर रक्कम जमा : मंदिर जीर्णोद्धारासाठी एक कोटी विठ्ठलनामाचे लिखाण, मोबाईलचे वेडही मागे पडले के-हाळा (ता. सिल्लोड) : आपल्याला शाळा म्हटले, की गुरुजी शिकवतात ती शाळा आठवते; परंतु के-हाळावासीयांनी आगळीवेगळी भक्तीची शाळा भरविली आहे. वारकरी संप्रदायाशी निगडित विठ्ठलनामाची शाळा सध्या या भागात चर्चेत आहे. गावातील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी अख्खे गाव एक कोटी विठ्ठलनामाचे लिखाण करण्यात तल्लीन झाले आहे.

- कैलास पांढरे

के-हाळा (ता. सिल्लोड) : आपल्याला शाळा म्हटले, की गुरुजी शिकवतात ती शाळा आठवते; परंतु के-हाळावासीयांनी आगळीवेगळी भक्तीची शाळा भरविली आहे. वारकरी संप्रदायाशी निगडित विठ्ठलनामाची शाळा सध्या या भागात चर्चेत आहे. गावातील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी अख्खे गाव एक कोटी विठ्ठलनामाचे लिखाण करण्यात तल्लीन झाले आहे. यात लहान मुले, तरुणाईसह वृद्ध महिला, पुरुष मंडळीही दिवसभर नामलिखाण करताना दिसतात. सर्व जण भक्तीत रमल्याने मोबाईल व सोशल मीडिया जरा गावापासून दूर गेला आहे.

के-हाळा येथे १०० वर्षे पुरातन महादेव मंदिर असून, त्याची दुरवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वी या मंदिराची पडझड सुरू झाली. गावकऱ्यांनी ही गोष्ट मनावर घेतली आणि बघता-बघता आठ महिन्यांतच तब्बल जवळपास ५० लाख रुपयांवर रक्कम जमा झाली. काही ग्रामस्थांनी श्रमदानाची तयारीही दाखविली. जमलेली रक्कम व श्रमदान करण्याची इच्छा दाखविल्यामुळे ग्रामस्थांच्या पुढाकाराने या मंदिराचा कायापालटच झाला.

मंदिरच नव्हे, पर्यटनस्थळाचाही भासनुसते मंदिरच नव्हे, तर एक पर्यटनस्थळच यातून तयार झाले. पन्नास फूट उंच मंदिर, ग्रामस्थांना बसण्यासाठी भव्य सभामंडप, महिलांसह लहान मुलांना प्ले ग्राऊंड, सुसज्ज गार्डन, चकाचक रस्ता, पार्किंग, शांतता, अशा सगळ्या गोष्टी येथे बघायला मिळत आहेत.गावाच्या एकीतून एवढी क्रांती घडेल, असा ग्रामस्थांनी कधी विचारही केला नव्हता. त्यांच्यासाठी ही नवलाईच ठरली आहे. विशेष म्हणजे मोबाईलचे वेडही गावात कमी झाले आहे.

रामभाऊ महाराजांचे आव्हान स्वीकारलेया मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ह.भ.प. रामभाऊ महाराज राऊत (गंगापूर) यांनी यावे म्हणून ग्रामस्थांनी त्यांना आग्रह केला; परंतु महाराजांनी नकार दिला. पुन्हा ग्रामस्थांनी विनंती केली. यावर महाराजांनी एक कोटी विठ्ठलनामाचा जप करून तो लिहिण्याची अट गावकºयांना घातली. हे लिखाण पूर्ण झाल्यावरच मी गावात येईन, असे महाराजांनी सांगितल्याने गावकºयांनीही हे आव्हान स्वीकारून विठ्ठलनामाची शाळा भरवली आहे.

मे महिन्यात तीनदिवसीय कार्यक्रमगावात ९० टक्के नामलिखाण पूर्ण झाले आहे. दि. ८, ९ व १० मे रोजी गावात तीनदिवसीय जीर्णोद्धार सोहळा राऊत महाराजांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यावेळी संपूर्ण १ कोटी नामलिखाणाच्या वह्या जमा करण्यात येणार आहेत. गावकºयांच्या या भक्तीला ‘सलाम!’

टॅग्स :TempleमंदिरAurangabadऔरंगाबाद