शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

तब्बल ३५० वर्षांची यात्रेची परंपरा, देवीच्या भक्तांसाठी सजतोय कर्णपुरा

By प्रशांत तेलवाडकर | Updated: September 17, 2022 18:32 IST

निर्बंधमुक्त वातावरणात लुटता येणार यात्रेचा आनंद

औरंगाबाद : तब्बल ३५० वर्षांची परंपरा असेलेले कर्णपुरा येथील देवीचे मंदिर भाविकांच्या स्वागतासाठी सजत आहे. मंदिरात रंगरंगोटी, मंडप टाकण्यास सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे मैदानावर राज्य-परराज्यांतून यात्रेचे साहित्य येण्यास आरंभ झाला आहे.

कर्णपुरा यात्रेत देवीचे दर्शन व नंतर यात्रेचा आनंद लुटल्याशिवाय औरंगाबादकरांना नवरात्रोत्सव साजरा केल्यासारखे वाटतच नाही. कोरोना संसर्गाच्या संकटामुळे मागील दोन वर्षे देवीचे दर्शन व यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र, यंदा शासनाने निर्बंधमुक्त वातावरणात सण साजरे करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे २६ सप्टेंबरपासून कर्णपुरा यात्रा सुरू होईल व त्याचा आनंद भाविकांना घेता येणार आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

श्रद्धास्थान असलेली कर्णपुरातील देवीचे मंदिर भाविकांच्या स्वागतासाठी सजत आहे. येथे मंदिराबाहेर कम्पाऊंड वॉल उभारण्यात आली आहे. मंदिरात विद्युत व्यवस्थेची दुरुस्ती व रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मंदिरासमोर मंडप उभारण्यात आला आहे. दररोज येणारा पाऊस लक्षात घेता मंदिराच्या पाठीमागेही पत्र्याचे शेड उभारण्यात येत आहे. अशीच रंगरंगोटी येथील बालाजी मंदिरातही केली जात आहे. कर्णपुरा यात्रेला आठ दिवस शिल्लक राहिले असताना मैदानात खेळणीचे साहित्य येण्यास सुरुवात झाली आहे. यात रहाटपाळणा, ब्रेकडान्स झुलाचे सामान येऊ लागले आहे. शनिवारच्या आधी यात्रेत संपूर्ण स्टॉल उभे राहतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNavratriनवरात्री