शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

...म्हणून शिक्षण व्यवस्थेवर हल्ले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:43 IST

सामान्यांनी शिकूच नये, अशी व्यवस्था केली जात आहे. या विरोधात देशाला लढावे लागेल असे प्रतिपादन विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला शिकण्याचा सल्ला दिला होता. कारण शिक्षण घेतले तर आम्ही प्रश्न विचारायला शिकू. आमचे शोषण होत आहे. हे आम्हाला कळेल; मात्र या सरकारला हेच नको आहे. शोषित वर्ग शिकला तर तो प्रश्न विचारेल. म्हणून शिक्षण व्यवस्थेवरच हल्ले केले जात आहेत. सामान्यांनी शिकूच नये, अशी व्यवस्था केली जात आहे. या विरोधात देशाला लढावे लागेल असे प्रतिपादन विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने केले.कन्हैया कुमारच्या बीड दौºयात ‘कॉफी विथ कन्हैया’ या कार्यक्रमात त्याने उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. प्रा.डॉ. हेमराज वुईके यांनी प्रकट मुलाखत घेतली. यात कन्हैया कुमारने अनेक विषयांवरील आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.महाराष्ट्राला क्रांतीचा इतिहास आहे. आणि आझादीचा नारा हा काही आपण पहिल्यांदा दिला नाही. आज वर्णवाद, भांडवलशाही, सरंजामशाही यांच्या विरोधात आम्ही आझादी मागत आहोत. मोदी जसे या देशाचे नागरिक आहेत, तसाच मीही या देशाचा नागरिक आहे. प्रत्येक माणूस या देशावर प्रेम करतो, तितकेच प्रेम मी देखील करतो. एका गरीब कुटुंबातून आलेला मी विद्यार्थी आहे. मात्र या देशात गरीब असणे हाच गुन्हा आहे. तुम्ही गरीब असाल तर तुम्हाला चोर, बेईमान, दंगाई, देशद्रोही काहीही ठरवता येते. गरीब असून तुम्ही शिकता हा तर फार मोठा गुन्हा आहे. कारण तुम्ही शिकून प्रश्न विचारता आणि सत्तेला प्रश्न नको आहेत. जर नरेंद्र मोदी पस्तीसाव्या वर्षी एम.ए. करू शकतात. तर तिसाव्या वर्षी मी पीएचडी केली तर माझ्यावर प्रश्न का उपस्थित होतात? आम्ही शिकलो तर यांची गुलामी कोणी करणार नाही. त्यामुळे त्यांनी सामान्यांचे शिक्षण बंद केले आहे. मोदींच्या विदेश दौºयावर जेवढा पैसा खर्च होतो. त्याच्या निम्यामध्ये विद्यापीठातील फेलोशिप सुरू होऊ शकते. मात्र सरकारला हे करायचे नाही. विचार करणारे लोक सरकारला नको असून विद्यापीठामधून केवळ मशिन तयार व्हाव्यात, अशी या सरकारची धारणा आहे. आणि हेच बदलण्यासाठी विद्यार्थी चळवळी महत्त्वाच्या आहेत, असे कन्हैया कुमार म्हणाला.