शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

कालिदासाच्या तोडीचा कवी पुन्हा जन्माला आला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:16 IST

‘मला कवी कालिदास पांडुरंगाच्या वारीच्या वाटेवर दिसतात. कालिदासाची सौंदर्यदृष्टी आजच्या कवींना लाजवणारी आहे. कालिदासाच्या तोडीचा कवी पुन्हा जन्माला आला नाही’ असे उद्गार आज येथे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे (पुणे) यांनी गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी, स. भु. परिसर येथे काढले.

ठळक मुद्देरामचंद्र देखणे : वेद प्रतिष्ठानला वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘मला कवी कालिदास पांडुरंगाच्या वारीच्या वाटेवर दिसतात. कालिदासाची सौंदर्यदृष्टी आजच्या कवींना लाजवणारी आहे. कालिदासाच्या तोडीचा कवी पुन्हा जन्माला आला नाही’ असे उद्गार आज येथे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे (पुणे) यांनी गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी, स. भु. परिसर येथे काढले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, औरंगाबादच्या वतीने देण्यात आलेल्या स्वा. सै. कै. वि. वा. देसाई ( देशपांडे) स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ‘कवी कालिदास आणि परंपरा’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. बी. वराडे हे अध्यक्षस्थानी होते. यंदाचा हा पुरस्कार वेद प्रतिष्ठान, औरंगाबादला देण्यात आला. तो डॉ. अशोक देव यांनी स्वीकारला. ११ हजार रु. रोख व स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. गतवर्षी प्रा. डॉ. सुहास पाठक व त्यांच्या सहकाºयांनी‘शिक्षण हक्क कायदा आणि मराठवाडा’ हा संशोधन प्रकल्प डॉ. अश्विनी वैष्णव व त्यांच्या सहकाºयांनी ‘औरंगाबाद जिल्ह्यातील शालेय ग्रंथालय’ हा संशोधन प्रकल्प स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेस सादर केला. यानिमित्त या सर्वांचा आजच्या या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. प्रारंभी, संस्थेचे सचिव डॉ. शरद अदवंत व वृंदा देशपांडे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. मोहन फुले यांनी सूत्रसंचालन केले तर जगदीश जोशी यांनी शेवटी आभार मानले.वेद घरोघरी जावा, अशी अपेक्षा पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. देव यांनी व्यक्त केली.आपल्या भाषणात डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, आपल्यासाठी ज्ञानेश्वरीच वेद होय. संतसाहित्य हाच महाराष्ट्राचा पाचवा वेद असून, वेदांवरच भारतीय संस्कृती अवलंबून आहे. अव्यक्त ज्ञानाचा व्यक्त आविष्कार म्हणजे वेद होय. वेद वाङ्मय पुरोगामी विचारांवर व विज्ञानावर आधारित आहे. त्यात अंधश्रद्धा नाही.भाषा टिकविण्यासाठी संस्कृती टिकविण्याची गरज आहे. ९० टक्के साहित्य हे काव्यांनी व्यापलेले असते. कविता हा संवेदनांचा उत्सव होय. कवी या शब्दाचा अर्थ द्रष्टा, सर्वज्ञ, ज्ञाता, प्रतिभासंपन्न असा होतो. संवेदनांशिवाय साहित्यनिर्मिती होतच नाही. कालिदास, भवभूती, माग, हर्ष, पाणिनी, अश्वघोष,भार्गवी, भास, दंडी, जयदेव ते पं. जगन्नाथांपर्यंतचा हा समृद्ध वारसा आहे. आजही कालिदास हवाय. त्याच्या प्रतिभेने पाश्चात्य कवीसुद्धा प्रभावित झाले, याकडे देखणे यांनी लक्षवेधले.