शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कालिदासाच्या तोडीचा कवी पुन्हा जन्माला आला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:16 IST

‘मला कवी कालिदास पांडुरंगाच्या वारीच्या वाटेवर दिसतात. कालिदासाची सौंदर्यदृष्टी आजच्या कवींना लाजवणारी आहे. कालिदासाच्या तोडीचा कवी पुन्हा जन्माला आला नाही’ असे उद्गार आज येथे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे (पुणे) यांनी गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी, स. भु. परिसर येथे काढले.

ठळक मुद्देरामचंद्र देखणे : वेद प्रतिष्ठानला वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘मला कवी कालिदास पांडुरंगाच्या वारीच्या वाटेवर दिसतात. कालिदासाची सौंदर्यदृष्टी आजच्या कवींना लाजवणारी आहे. कालिदासाच्या तोडीचा कवी पुन्हा जन्माला आला नाही’ असे उद्गार आज येथे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे (पुणे) यांनी गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी, स. भु. परिसर येथे काढले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, औरंगाबादच्या वतीने देण्यात आलेल्या स्वा. सै. कै. वि. वा. देसाई ( देशपांडे) स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ‘कवी कालिदास आणि परंपरा’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. बी. वराडे हे अध्यक्षस्थानी होते. यंदाचा हा पुरस्कार वेद प्रतिष्ठान, औरंगाबादला देण्यात आला. तो डॉ. अशोक देव यांनी स्वीकारला. ११ हजार रु. रोख व स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. गतवर्षी प्रा. डॉ. सुहास पाठक व त्यांच्या सहकाºयांनी‘शिक्षण हक्क कायदा आणि मराठवाडा’ हा संशोधन प्रकल्प डॉ. अश्विनी वैष्णव व त्यांच्या सहकाºयांनी ‘औरंगाबाद जिल्ह्यातील शालेय ग्रंथालय’ हा संशोधन प्रकल्प स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेस सादर केला. यानिमित्त या सर्वांचा आजच्या या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. प्रारंभी, संस्थेचे सचिव डॉ. शरद अदवंत व वृंदा देशपांडे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. मोहन फुले यांनी सूत्रसंचालन केले तर जगदीश जोशी यांनी शेवटी आभार मानले.वेद घरोघरी जावा, अशी अपेक्षा पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. देव यांनी व्यक्त केली.आपल्या भाषणात डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, आपल्यासाठी ज्ञानेश्वरीच वेद होय. संतसाहित्य हाच महाराष्ट्राचा पाचवा वेद असून, वेदांवरच भारतीय संस्कृती अवलंबून आहे. अव्यक्त ज्ञानाचा व्यक्त आविष्कार म्हणजे वेद होय. वेद वाङ्मय पुरोगामी विचारांवर व विज्ञानावर आधारित आहे. त्यात अंधश्रद्धा नाही.भाषा टिकविण्यासाठी संस्कृती टिकविण्याची गरज आहे. ९० टक्के साहित्य हे काव्यांनी व्यापलेले असते. कविता हा संवेदनांचा उत्सव होय. कवी या शब्दाचा अर्थ द्रष्टा, सर्वज्ञ, ज्ञाता, प्रतिभासंपन्न असा होतो. संवेदनांशिवाय साहित्यनिर्मिती होतच नाही. कालिदास, भवभूती, माग, हर्ष, पाणिनी, अश्वघोष,भार्गवी, भास, दंडी, जयदेव ते पं. जगन्नाथांपर्यंतचा हा समृद्ध वारसा आहे. आजही कालिदास हवाय. त्याच्या प्रतिभेने पाश्चात्य कवीसुद्धा प्रभावित झाले, याकडे देखणे यांनी लक्षवेधले.