शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

बस नाही धड, प्रवास जड

By admin | Updated: December 4, 2014 00:55 IST

सोमनाथ खताळ / राजेश खराडे, बीड ‘बसचा प्रवास, सुखाचा प्रवास’ असे अविर्भावात सांगणाऱ्या एसटीचा प्रवास सुखाचा नव्हे तर वेदना अन् दु:खाचा झाला आहे. फुटलेले आरसे, तुटलेल्या खिडक्या, नादुरुस्त वायपर,

सोमनाथ खताळ / राजेश खराडे, बीड‘बसचा प्रवास, सुखाचा प्रवास’ असे अविर्भावात सांगणाऱ्या एसटीचा प्रवास सुखाचा नव्हे तर वेदना अन् दु:खाचा झाला आहे. फुटलेले आरसे, तुटलेल्या खिडक्या, नादुरुस्त वायपर, निकामी हेडलाईट, फाटलेले सीटकव्हर अन् खिळखिळ्या बसगाड्या रस्त्यावरुन धावत आहेत. ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या स्टींगमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली. जिल्ह्यात एक हजाराहून अधिक बसगाड्या आहेत. त्यापैकी २५ बसगाड्यांची पाहणी केली तेंव्हा एसटीचा प्रवास किती खडतर आहे याची प्रचिती आली. ‘प्रवाशी हेच आमचे दैवत’ यासारखे अनेक ब्रीदवाक्य राज्य परिवहन महामंडळाने बनविलेले आहेत़ मात्र या ब्रीद वाक्यांची तेवढ्याच काटेकोरपणे अंमलबजावणी होते का? याची पाहणी करायला सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळ नाही़ अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षामुळेच बीड विभागात सध्या अनेक बस गाड्या भंगार अवस्थेत धावत आहेत़ यामुळे अपघातही होत असून बसचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे़ बसगाड्यांना व्यवस्थित ‘ब्रेक’ नाहीत, ‘गिअर’ पडत नाहीत, ‘इंजिन’ खराब झालेले आहे, धक्का दिल्यावरच बस चालू होते, अशी स्थिती आहे. या बसगाड्यांच्या दुरूस्तीसाठी निधी आलेला असतो, साहित्यही आलेले असते तरीही बसगाड्या खिळखिळ्या कशा ? असा सवाल उपस्थित होत आहे.कधी होणार दुरूस्तीजिल्ह्यातील सर्वच आगारातील बसगाड्या खराब झालेल्या आहेत़ त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे़ एवढी गंभीर परिस्थिती असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे पाहण्यासाठी वेळही मिळत नाही़ आता या गाड्या कधी दुरूस्त होणार आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास कधी मिळणार असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे़ब्रेकविनाच बसगाड्या सुसाटअनेक बसगाड्यांना मागचे ब्रेकच नाहीत. समोरच्या ब्रेकवरच त्यांना स्थानकातून प्रवाशांना घेवून जावे लागते. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही बसचालकही याला गांभीर्याने घेत नाहीत. अहवाल देण्यापलीकडे काहीही होत नाही. मागचे ब्रेक नसल्यामुळेच बसगाड्यांचे अपघात होत आहेत.अनेक बसगाड्यांचे साईड इंडिकेटर गायब झालेले होते तर काहींचे फुटलेले होते. ४अनेकांचे आरसेच गायब झाल्याने बसचालकांना मागील वाहने पाहण्यासाठी चक्क बाहेर डोकावून पहावे लागत आहे.