शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासंदर्भातील फौजदारी जनहित याचिकेवरील निकाल १८ ऑगस्टला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 17:01 IST

वर्तमानपत्रांमधील  बातम्यांची  स्वत:हून दाखल घेत खंडपीठाने त्या बातम्यांनाच  सुमोटो जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले होते.

ठळक मुद्देसंबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची शपथपत्रे दाखल सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांमध्ये सध्या समन्वय दिसून येतो.

औरंगाबाद : कोरोनासंदर्भातील फौजदारी जनहित याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी (दि.७) पूर्ण झाली. न्या. रवींद्र घुगे आणि न्या. एस.डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने निकालासाठी याचिका १८ आॅगस्टपर्यंत राखून ठेवली आहे.

कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांतील समन्वयाचा अभाव, रुग्णांची होणारी हेळसांड आणि रुग्णसाखळी तोडण्यात अपयशी ठरलेली यंत्रणा आदी बाबींविषयक वर्तमानपत्रांमधील  बातम्यांची  स्वत:हून दाखल घेत खंडपीठाने त्या बातम्यांनाच  सुमोटो जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले होते. ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांची अ‍ॅमिकस क्युरी (न्यायालयाचे मित्र) म्हणून नियुक्ती केली होती. 

शुक्रवारी या याचिकेवर  सुनावणी झाली असता सरकारी वकील डी. आर. काळे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, सर्व संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची शपथपत्रे दाखल झालेली आहेत.  प्रतिवाद्यांनी सविस्तर उत्तरेही दाखल केली  आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांमध्ये समन्वय निर्माण झाल्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यात यश येत आहे. 

ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांमध्ये सध्या समन्वय दिसून येतो. शासन स्तरावर घेतले जाणारे निर्णय आणि कोविडसंदर्भातील प्रगती सांगण्यासाठी प्रेस ब्रिफिंग करून नागरिकांना माहिती दिली जाते. मात्र, त्यात सातत्य हवे. अनेक नागरिक, संघटना आणि अशासकीय संस्थांनी मला प्रत्यक्ष भेटून, मेल, व्हॉट्सअ‍ॅप आणि फोनद्वारे माहिती दिली होती. घाटीतील चतुर्थश्रेणी कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. त्यांना नोकरीचे संरक्षण द्यावे. पीपीई कीट आणि सुरक्षेची साधने पुरवावीत. त्यांना नियमित पगार आणि सुट्या देण्याबाबत ठोस पावले उचलली जावीत. येत्या एक-दोन महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सेवक कमी पडतील. यासाठी खाजगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित करण्यास हरकत नाही, आदी मुद्दे देशमुख यांनी मांडले. लातूर मनपाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. होन, औरंगाबाद मनपाच्या वतीने अ‍ॅड. अंजली दुबे-वाजपेयी, नांदेड मनपाच्या वतीने अ‍ॅड. आर. के. इंगोले, अमळनेर न.प.च्या वतीने अ‍ॅड. गिरीश वाणी यांनी, तर हस्तक्षेपकातर्फे अ‍ॅड. भरत वर्मा काम पाहत आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद