शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

जायकवाडी प्रकल्पाचे 'नाथसागर' नामांतर होणार;जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 19:34 IST

Jayakwadi Dam : जायकवाडी प्रकल्पाच्या जलसाठ्यास नाथसागर हे नाव दिलेले असून प्रकल्पासही नाथसागर हेच नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी पैठणकरांची आहे.  

पैठण ( औरंगाबाद ) : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे ( Jayakwadi Dam ) नाव नाथसागर करण्यात येईल असे आश्वासन आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पैठणकरांना दिले. राष्ट्रवादी परिवार परिसंवाद बैठकीसाठी आज जयंत पाटील ( Jayant Patil ) पैठण येथे आले होते.  (Jayakwadi project will be renamed as 'Nathsagar) 

जायकवाडी प्रकल्पाच्या जलसाठ्यास नाथसागर हे नाव दिलेले असून प्रकल्पासही नाथसागर हेच नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी पैठणकरांची आहे.  पैठण येथील माहेश्वरी भक्त निवासात प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी परिवार परिसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संत एकनाथांच्या जन्म व कर्मभूमित असलेल्या जायकवाडी प्रकल्पाचे नाव नाथसागर करावे अशी पैठणकरांची मागणी यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका संपर्क प्रमुख दत्ता गोर्डे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कानावर घातली. तातडीने मागणी मान्य करत पाटील यांनी या बाबत आश्वासन दिले. दरम्यान, जायकवाडी प्रकल्प माजलगाव तालुक्यातील जायकोवाडी येथे मंजूर करण्यात आला होता. परंतु पैठणचे भूमिपुत्र माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी दूरदृष्टीने हा प्रकल्प पैठण येथे उभारण्याचा निर्णय घेऊन पैठण परिसरात जायकवाडी वसाहत उभी करून हा प्रकल्प उभा केला असे जुन्या पिढीतील दिनेश पारिख यांनी सांगितले. नाथसागर नाव देण्याचे आश्वासनावर पारीख आनंद व्यक्त केला. 

माणुसकीला सलाम ! लोकवर्गणीच्या पाठिंब्यातून ड्रायव्हरचा मुलगा झाला लंडनमध्ये पदवीधर

परिवार संवाद झालाच नाही.....परिसंवादासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली. यामुळे मंत्री जयंत पाटील, राजेश टोपे, प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, महेबूब शेख आदी पदाधिकारी विवंचनेत पडले. एवढ्या मोठ्या परिवाराचा संवाद कसा घ्यावा हा तर मेळावा झाला, लवकरच आपण मेळावा घेऊ असे जयंत पाटील यांनी दत्ता गोर्डे व तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ यांना सांगितले. केवळ दहा मिनीटे मार्गदर्शन करून पैठण येथून जयंत पाटील व त्यांचा ताफा घनसावंगीकडे रवाना झाला. यामुळे परिवार परिसंवाद झालाच नाही. दरम्यान यावेळी पत्रकारांना कार्यक्रमस्थळी प्रवेश नाकारण्यात आला.

निजामाच्या विचारांचे लोक निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादJayant Patilजयंत पाटील