शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी तुडुंब, आवक वाढल्याने १८ दरवाजे उघडले; तब्बल ९ हजार ४३२ क्युसेकने विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 16:05 IST

जायकवाडी धरणात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.

पैठण : येथील जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने सोमवारी दुपारी १२:३० आणि सायंकाळी ७ आणि मंगळवारी सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास उघडण्यात आले असून, त्यामधून ९ हजार ४३२ क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आवक वाढल्याने सोमवारी दिवसभरात एकूण १२ दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडण्यात आली होती. त्यानंतर आज, मंगळवारी सकाळी आणखी ६ दरवाजे अर्ध्या फूट उंचीने उघडून विसर्ग वाढविण्यात आला. धरणात होणारी आवक लक्षात घेत विसर्ग आणखी वाढविण्यात येण्याची शक्यता आहे.

जायकवाडी धरणात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. सोमवारी जायकवाडी धरणात वरच्या धरणातून १० हजार ७४६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीसाठा दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास ९७.६९ टक्क्यांवर पोहोचल्यानंतर प्रशासनाच्या वतीने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अभियंता दिगंबर रायबोले, पोलिस निरीक्षक संजय देशमुख, नामदेव खराद, शाखा अभियंता विजय काकडे, गणेश खरडकर, गणेश वाघमोडे यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून धरणाचे गेट क्रमांक १०, २७, १८, १९, १६ व २१ असे ६ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून ३ हजार १४४ क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 

आवक वाढल्याने एकूण १८ दरवाजे उघडलेसोमवारी पुन्हा धरणात पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी ७ वाजता धरणाचे १४, २३, १२, २५, ११ व २६ असे आणखी ६ असे एकूण १२ दरवाजे उघडून नदीपात्रातून एकूण ६ हजार ८८८ क्युसेकने पाण्याचा गोदापात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी सकाळी ११. ३० ते १२ वाजेदरम्यान धरणाचे १३, २४, १५, २२, १७ आणि २० असे एकूण १८ दरवाजे अर्ध्या फुट उंचीने उघडून ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. यानंतरही धरणात पाण्याची आवक वाढल्यास गोदावरी पात्रात विसर्ग वाढवण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव म्हणाले.

धरणाच्या खालील ६ बंधारे भरलेधरणाची पाणी पातळी १५२१.५८ फूट आहे. धरणातील एकूण पाणीसाठा २८५०.८८८ दलघमी असून, उजव्या कालव्यातून ६०० क्युसेकने पाण्याचा गेल्या काही दिवसांपासून विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीवर पैठण ते नांदेड दरम्यान १८ बंधारे आहेत. यापैकी सहाही बंधारे भरले असल्यामुळे या बंधाऱ्यांद्वारे हे पाणी सरळ नांदेडकडे निघाले आहे. १९७६ पासून आतापर्यंत जायकवाडी धरण १४ वेळेस शंभर टक्के भरले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी