शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

चिंताजनक! जायकवाडी धरण गाळात; साठवण क्षमता १०२ वरून ८७ टीएमसीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 18:31 IST

‘मेरी’च्या अहवालावर १२ वर्षांनंतरही कारवाई होईना; प्रशासनाची उदासीनता

- दादासाहेब गलांडेपैठण : येथील जायकवाडी धरणात गाळासह वाळू मोठ्या प्रमाणात आल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता १०२ टीएमसीवरून ८७ टीएमसीवर आल्याचा अहवाल नाशिकच्या ‘मेरी’ या संस्थेने २०१२ मध्ये दिला असताना या अहवालावर गेल्या १२ वर्षांमध्ये काहीही कारवाई झाली नसल्याची बाब समोर आली आहे.

जायकवाडी धरणाचे काम १९६५ मध्ये सुरू झाले. १९७६ मध्ये पूर्ण झाल्यानंतर येथे पाणी साठवण्यास सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, पैठण, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव व नेवासे तालुक्यातील मिळून ११८ गावांमधील ३४ हजार १०५ हेक्टर क्षेत्रात धरणाचा परिसर आहे. धरणाचा आकार हा बशीप्रमाणे आहे. या धरणाचा नाशिक येथील ‘मेरी’ (महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) या राज्य शासनाच्या संस्थेने रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून २०१२ मध्ये सर्व्हे केला होता. या सर्व्हेत धरणात १५ टीएमसी गाळ असल्याने धरणाची साठवण क्षमता १०२ टीएमसीवरून ८७ टीएमसीवर आल्याची बाब समोर आली होती. हा अहवाल ‘मेरी’ शासनाला सादर केला होता. त्यानुसार या धरणाची साठवण क्षमता पूर्ववत करण्यासाठी शासन स्तरावरून पावले उचलणे आवश्यक असताना काहीही कारवाई झालेली नाही. ‘मेरी’च्या सर्व्हेनंतर धरणातील गाळ १५ टीएमसीवरून आणखी वाढला आहे. सध्या धरणात फक्त ९.६३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातील गाळ काढणे सोपे आहे; परंतु शासकीय पातळीवरून अद्यापही याबाबत काहीही हालचाली दिसून येत नाहीत.

पक्षी अभयारण्यामुळे निर्णय शासन स्तरावरच१० ऑक्टोबर १९८६ रोजी हे जायकवाडी जलाशयाचे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे धरणातील गाळ उपसण्याचा निर्णय शासन स्तरावरूनच निर्णय घ्यावा लागेल, असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.

धरणातील गाळ, वाळू काढावीदरवर्षी पाण्यासोबत विविध घटक वाहत धरणात येतात. त्यामुळे धरणात आज रोजी ३० टक्के गाळ, वाळू जमा झाली असेल. धरणातील गाळ शेतकऱ्यांना द्यावा, तसेच वाळूचीही विक्री करावी. जेणेकरून शासनाला महसूल मिळेल आणि धरणाची साठवण क्षमता पूर्वीप्रमाणे वाढेल.- प्रा. संतोष गव्हाणे, पर्यावरण अभ्यासक

शेतकऱ्यांना विनामूल्य गाळ द्यावाजलसंपदा विभागाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना विनामूल्य गाळ दिल्यास शेकडो शेतकरी आपल्या शेतात धरणातील गाळ स्वखर्चाने नेतील. या गाळामुळे शेतकऱ्यांची नापीक जमीन सुपीक बनेल. तसेच जमिनीचा पोत सुधारून उत्पन्नात वाढ होईल.-दीपक मोरे, शेतकरी

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र