शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जायकवाडी धरणात पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 18:09 IST

जायकवाडी धरणातून दररोज होत आहे ०.२९ दलघमी उपसा

- दादासाहेब गलांडे पैठण : मराठवाड्याला येणाऱ्या काळात दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्नही निर्माण होणार असून, टँकर लॉबी पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

नाथसागरात वरच्या धरणातून हक्काचे पाणी आणताना न्यायालयीन लढा लढावा लागला आहे. आठ टीएमसी पाणी वरच्या धरणातून सोडण्यात आले; मात्र, जायकवाडी धरणात केवळ ५.६२ टीएमसी पाणी प्रत्यक्षात पोहोचले. मंगळवारी नाथसागर धरणाची पाणीपातळी ४३.७७ टक्के एवढी आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात ही पाणीपातळी ९३ टक्क्यांवर होती. यंदा मात्र पाणीसाठा अर्ध्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे पाण्याचे संकट येणाऱ्या काळात उभे राहणार आहे.

मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नाथसागर धरणाचे २७ दरवाजे अनेक वेळेस उघडून गोदापात्रात जवळजवळ २०९ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. मात्र, या वर्षी धरणाची परिस्थिती बिकट आहे. यंदा धरणाने पन्नाशीही गाठली नाही. नाथसागरातून अनेक एमआयडीसी, डीएमआयसीसह विविध शहरांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच छत्रपती संभाजीनगर शहरालाही याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नाथसागर धरणातून दररोज ०.२९ दलघमी पाण्याचा उपसा होत असतो. तसेच सिंचनासाठी उजवा कालवा व डावा कालवा यामधून दोन पाणी पाळ्या आणखी शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत. डाव्या कालव्यातून २५ दिवस पाणी सोडले जाईल. तर उजव्या कालव्यातून पंधरा दिवस पाणी सोडले जाईल, असे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

धरणाची परिस्थिती बिकटआज रोजी पाणीपातळी ४३ टक्के आहे. वरच्या धरणातून केवळ ५.६२ टीएमसीच पाणी आले. ५० टक्क्यांच्या खाली पाणीसाठा होण्याची ही चौथी वेळ असून, यापूर्वी २०१२, २०१४, २०१८ ला अशी परिस्थिती निर्माण झाली होती. धरणातील पाणीसाठा हा वर्षभर पिण्यासाठी पुरेल एवढाच उपलब्ध आहे. दोन पाणी पाळीनंतर सिंचनासाठी पाणी धरणातून दिले जाणार नाही. भविष्यात उद्योगाचा पाणीपुरवठाही कपात केला जाऊ शकतो.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद