शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

जायकवाडी धरणात पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 18:09 IST

जायकवाडी धरणातून दररोज होत आहे ०.२९ दलघमी उपसा

- दादासाहेब गलांडे पैठण : मराठवाड्याला येणाऱ्या काळात दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्नही निर्माण होणार असून, टँकर लॉबी पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

नाथसागरात वरच्या धरणातून हक्काचे पाणी आणताना न्यायालयीन लढा लढावा लागला आहे. आठ टीएमसी पाणी वरच्या धरणातून सोडण्यात आले; मात्र, जायकवाडी धरणात केवळ ५.६२ टीएमसी पाणी प्रत्यक्षात पोहोचले. मंगळवारी नाथसागर धरणाची पाणीपातळी ४३.७७ टक्के एवढी आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात ही पाणीपातळी ९३ टक्क्यांवर होती. यंदा मात्र पाणीसाठा अर्ध्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे पाण्याचे संकट येणाऱ्या काळात उभे राहणार आहे.

मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नाथसागर धरणाचे २७ दरवाजे अनेक वेळेस उघडून गोदापात्रात जवळजवळ २०९ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. मात्र, या वर्षी धरणाची परिस्थिती बिकट आहे. यंदा धरणाने पन्नाशीही गाठली नाही. नाथसागरातून अनेक एमआयडीसी, डीएमआयसीसह विविध शहरांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच छत्रपती संभाजीनगर शहरालाही याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नाथसागर धरणातून दररोज ०.२९ दलघमी पाण्याचा उपसा होत असतो. तसेच सिंचनासाठी उजवा कालवा व डावा कालवा यामधून दोन पाणी पाळ्या आणखी शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत. डाव्या कालव्यातून २५ दिवस पाणी सोडले जाईल. तर उजव्या कालव्यातून पंधरा दिवस पाणी सोडले जाईल, असे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

धरणाची परिस्थिती बिकटआज रोजी पाणीपातळी ४३ टक्के आहे. वरच्या धरणातून केवळ ५.६२ टीएमसीच पाणी आले. ५० टक्क्यांच्या खाली पाणीसाठा होण्याची ही चौथी वेळ असून, यापूर्वी २०१२, २०१४, २०१८ ला अशी परिस्थिती निर्माण झाली होती. धरणातील पाणीसाठा हा वर्षभर पिण्यासाठी पुरेल एवढाच उपलब्ध आहे. दोन पाणी पाळीनंतर सिंचनासाठी पाणी धरणातून दिले जाणार नाही. भविष्यात उद्योगाचा पाणीपुरवठाही कपात केला जाऊ शकतो.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद