शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जायकवाडी धरण मृतसाठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:19 IST

चिंता : उन्हाळाभर पाणी पुरविण्याची प्रशासनासमोर कसरत

पैठण : एकीकडे जागतिक जल दिन साजरा करण्यात येत असताना अगदी याच दिवशी दुसरीकडे जायकवाडी धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात गेली. जागतिक जलदिनी जायकवाडी धरणाचा उपयुक्त जलसाठा संपल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करा, असाच हा जुळून आलेला योगायोग सांगत तर नसावा. जायकवाडीचा मृतसाठा लक्षात घेता उन्हाळाभर पाणी पुरविण्यासाठी जायकवाडी प्रशासनास कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.जायकवाडी धरणाचा उपयुक्त जलसाठा संपून धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात गेली आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पाणीपातळी मृतसाठ्यात पोहोचली असून, सकाळी ७ नंतर मृतसाठ्यातून उपसा करण्यात येत आहे. मृतसाठ्यात ३० टक्के गाळ असल्याने उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता पाण्याच्या नियोजनाची कसरत जायकवाडी प्रशासनास पेलावी लागणार आहे.जायकवाडी धरणात यंदा ४७.५० टक्के जलसाठा (उर्ध्व भागातील धरणातून सोडलेले पाणी मिळून) झाला होता. या वर्षात जायकवाडीच्या लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थितीमुळे जायकवाडीतून औरंगाबाद, जालना, परभणी आदी जिल्ह्यांतील बंधाऱ्यांसाठी पाणी सोडावे लागले. परळी थर्मलसाठी अतिरिक्त पाणी सोडावे लागले, सिंचनासाठी नियमित रोटेशन देण्यात आले. त्यातच गेल्या ८ दिवसांपासून बाष्पीभवन प्रक्रियेत वाढ झाल्याने अपेक्षेपेक्षा लवकर यंदा जायकवाडीचा उपयुक्त जलसाठा संपुष्टात आला. डाव्या व उजव्या कालव्यातून सुरू असलेला विसर्ग २० मार्च रोजी बंद करण्यात आला, असे दगडी धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.मृतसाठा कसा पुरणार?जायकवाडीच्या मृतसाठ्यात ७३८ दलघमी एवढा जलसाठा असून, यात आज रोजी ३० टक्के गाळ आहे. यानुसार २२१ दलघमी पाणी गाळाने कमी झाले आहे. म्हणजे फक्त ५१६ दलघमी पाणी मृतसाठ्यात असून, यापैकी फक्त ३५० दलघमी पाण्याचा उपसा करता येतो. सिंचन, औद्योगिक वसाहत, पाणीपुरवठा, आपत्कालीन पुरवठा व तापमानात वाढ झाल्याने प्रतिदिन १ दलघमी होणारे बाष्पीभवन यामुळे जूनअखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी प्रशासनास कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात