शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

जायकवाडी धरण मृतसाठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:19 IST

चिंता : उन्हाळाभर पाणी पुरविण्याची प्रशासनासमोर कसरत

पैठण : एकीकडे जागतिक जल दिन साजरा करण्यात येत असताना अगदी याच दिवशी दुसरीकडे जायकवाडी धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात गेली. जागतिक जलदिनी जायकवाडी धरणाचा उपयुक्त जलसाठा संपल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करा, असाच हा जुळून आलेला योगायोग सांगत तर नसावा. जायकवाडीचा मृतसाठा लक्षात घेता उन्हाळाभर पाणी पुरविण्यासाठी जायकवाडी प्रशासनास कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.जायकवाडी धरणाचा उपयुक्त जलसाठा संपून धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात गेली आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पाणीपातळी मृतसाठ्यात पोहोचली असून, सकाळी ७ नंतर मृतसाठ्यातून उपसा करण्यात येत आहे. मृतसाठ्यात ३० टक्के गाळ असल्याने उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता पाण्याच्या नियोजनाची कसरत जायकवाडी प्रशासनास पेलावी लागणार आहे.जायकवाडी धरणात यंदा ४७.५० टक्के जलसाठा (उर्ध्व भागातील धरणातून सोडलेले पाणी मिळून) झाला होता. या वर्षात जायकवाडीच्या लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थितीमुळे जायकवाडीतून औरंगाबाद, जालना, परभणी आदी जिल्ह्यांतील बंधाऱ्यांसाठी पाणी सोडावे लागले. परळी थर्मलसाठी अतिरिक्त पाणी सोडावे लागले, सिंचनासाठी नियमित रोटेशन देण्यात आले. त्यातच गेल्या ८ दिवसांपासून बाष्पीभवन प्रक्रियेत वाढ झाल्याने अपेक्षेपेक्षा लवकर यंदा जायकवाडीचा उपयुक्त जलसाठा संपुष्टात आला. डाव्या व उजव्या कालव्यातून सुरू असलेला विसर्ग २० मार्च रोजी बंद करण्यात आला, असे दगडी धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.मृतसाठा कसा पुरणार?जायकवाडीच्या मृतसाठ्यात ७३८ दलघमी एवढा जलसाठा असून, यात आज रोजी ३० टक्के गाळ आहे. यानुसार २२१ दलघमी पाणी गाळाने कमी झाले आहे. म्हणजे फक्त ५१६ दलघमी पाणी मृतसाठ्यात असून, यापैकी फक्त ३५० दलघमी पाण्याचा उपसा करता येतो. सिंचन, औद्योगिक वसाहत, पाणीपुरवठा, आपत्कालीन पुरवठा व तापमानात वाढ झाल्याने प्रतिदिन १ दलघमी होणारे बाष्पीभवन यामुळे जूनअखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी प्रशासनास कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात