शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

जायकवाडी @७५ %; पाऊस, आवक वाढल्यास विसर्गाची शक्यता, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 18:55 IST

मंजूर आराखड्या पेक्षा जास्त जलसाठा होत असेल तर धरणातून विसर्ग करावा लागतो.

पैठण (औरंगाबाद) : धरणात जुलै महिण्यातच ७५% जलसाठा झाला असून पाणलोटक्षेत्रात सुरू असलेला पाऊस व येणारी आवक लक्षात घेता जायकवाडी धरणातून केव्हाही विसर्ग केला जाऊ शकतो. यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा सोमवारी सायंकाळी ४ वाजता. जायकवाडी प्रशासनाने दिला आहे. प्रशासनाचा इशारा धडकताच गोदाकाठच्या गावात खळबळ उडाली आहे. 

सोमवारी दुपारी २ वा जायकवाडी धरणाचा जलसाठा ७४% झाला होता. शिवाय धरणात ३६२०६ क्युसेक्स अशी आवक सुरू होती. सोमवारी पाणलोटक्षेत्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात येणारी आवक वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत धरणातून विसर्ग करावा लागू शकतो अशी शक्यता जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी वर्तवली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जलसाठा ७९% पार गेल्यास होणार विसर्ग.....जायकवाडी धरणात १५ जून ते १५ ऑक्टोबर दरम्यान कोणत्या तारखेला किती जलसाठा ठेवावा याचा परिचलन आराखडा मंजूर करण्यात आला आहे. मंजूर आराखड्या पेक्षा जास्त जलसाठा होत असेल तर धरणातून विसर्ग करावा लागतो. दरम्यान या प्रचलन आराखड्या नुसार १५ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान ७९.११ % पेक्षा जास्त जलसाठा धरणात ठेवता येत नाही. धरणात येणारी आवक लक्षात घेता मंगळवारी धरणाचा जलसाठा ७९% पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. यानंतर धरणात जीतकी आवक होईल तीतकाच विसर्ग करण्यात येईल अशी शक्यता धरणाचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातील दारणा ४०३४, कडवा ६४७, वालदेवी २४१, गंगापूर १३७७, आळंदी ४४७, भोजपूर ५४० व नांदूरमधमेश्वर वेअर मधून २८१७० क्युसेक्स क्षमतेने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू होता. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा ८३५, नीळवंडे ८०० व ओझरवेअर बंधाऱ्यातून २१२२ क्युसेक्स क्षमतेने प्रवरा नदीत विसर्ग करण्यात येत होता. सोमवारी जायकवाडी धरणात ३६२०६ क्युसेक्स आवक सुरू होती यात वाढ होणार असल्याने धरणातून विसर्ग करावा लागू शकतो असे अशोक चव्हाण व विजय काकडे यांनी सांगितले. 

गोदाकाठच्या गावात धावपळ..सोमवारी सायंकाळी धरणाचा जलसाठा  ७५% पेक्षा पुढे सरकला होता. पाणी पातळी १५१७ फूट ईतकी झाली होती. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी  आता फक्त पाच फूट पाण्याची आवक होणे गरजेचे आहे. धरणात उपयुक्त जलसाठा १६०५.७८५ दलघमी एवढा झाला आहे. जायकवाडी धरणातून विसर्ग केल्यानंतर पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या १४ गावांना फटका बसतो. प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिल्यानंतर या गावात मोठी धावपळ सुरू झाल्याचे दिसून आले. गोदावरी पात्रात सोडलेल्या मोटारी शेतकरी काढून घेत होते. पात्रालगत असलेले बिऱ्हाड हलविण्यात गावकरी व्यस्त होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊस