शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

जायकवाडी @७५ %; पाऊस, आवक वाढल्यास विसर्गाची शक्यता, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 18:55 IST

मंजूर आराखड्या पेक्षा जास्त जलसाठा होत असेल तर धरणातून विसर्ग करावा लागतो.

पैठण (औरंगाबाद) : धरणात जुलै महिण्यातच ७५% जलसाठा झाला असून पाणलोटक्षेत्रात सुरू असलेला पाऊस व येणारी आवक लक्षात घेता जायकवाडी धरणातून केव्हाही विसर्ग केला जाऊ शकतो. यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा सोमवारी सायंकाळी ४ वाजता. जायकवाडी प्रशासनाने दिला आहे. प्रशासनाचा इशारा धडकताच गोदाकाठच्या गावात खळबळ उडाली आहे. 

सोमवारी दुपारी २ वा जायकवाडी धरणाचा जलसाठा ७४% झाला होता. शिवाय धरणात ३६२०६ क्युसेक्स अशी आवक सुरू होती. सोमवारी पाणलोटक्षेत्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात येणारी आवक वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत धरणातून विसर्ग करावा लागू शकतो अशी शक्यता जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी वर्तवली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जलसाठा ७९% पार गेल्यास होणार विसर्ग.....जायकवाडी धरणात १५ जून ते १५ ऑक्टोबर दरम्यान कोणत्या तारखेला किती जलसाठा ठेवावा याचा परिचलन आराखडा मंजूर करण्यात आला आहे. मंजूर आराखड्या पेक्षा जास्त जलसाठा होत असेल तर धरणातून विसर्ग करावा लागतो. दरम्यान या प्रचलन आराखड्या नुसार १५ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान ७९.११ % पेक्षा जास्त जलसाठा धरणात ठेवता येत नाही. धरणात येणारी आवक लक्षात घेता मंगळवारी धरणाचा जलसाठा ७९% पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. यानंतर धरणात जीतकी आवक होईल तीतकाच विसर्ग करण्यात येईल अशी शक्यता धरणाचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातील दारणा ४०३४, कडवा ६४७, वालदेवी २४१, गंगापूर १३७७, आळंदी ४४७, भोजपूर ५४० व नांदूरमधमेश्वर वेअर मधून २८१७० क्युसेक्स क्षमतेने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू होता. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा ८३५, नीळवंडे ८०० व ओझरवेअर बंधाऱ्यातून २१२२ क्युसेक्स क्षमतेने प्रवरा नदीत विसर्ग करण्यात येत होता. सोमवारी जायकवाडी धरणात ३६२०६ क्युसेक्स आवक सुरू होती यात वाढ होणार असल्याने धरणातून विसर्ग करावा लागू शकतो असे अशोक चव्हाण व विजय काकडे यांनी सांगितले. 

गोदाकाठच्या गावात धावपळ..सोमवारी सायंकाळी धरणाचा जलसाठा  ७५% पेक्षा पुढे सरकला होता. पाणी पातळी १५१७ फूट ईतकी झाली होती. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी  आता फक्त पाच फूट पाण्याची आवक होणे गरजेचे आहे. धरणात उपयुक्त जलसाठा १६०५.७८५ दलघमी एवढा झाला आहे. जायकवाडी धरणातून विसर्ग केल्यानंतर पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या १४ गावांना फटका बसतो. प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिल्यानंतर या गावात मोठी धावपळ सुरू झाल्याचे दिसून आले. गोदावरी पात्रात सोडलेल्या मोटारी शेतकरी काढून घेत होते. पात्रालगत असलेले बिऱ्हाड हलविण्यात गावकरी व्यस्त होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊस