शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘यह जवाहरनगर पुलिस थाना जैसे का वैसा ही है’; पोलीस आयुक्तांनी १५ वर्षांपूर्वीची काढली आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 14:45 IST

ठाण्यातील सध्याची परिस्थिती पाहत न राहवून त्यांनी ठाण्याच्या दुर्दशेबद्दल मत व्यक्त केले. 

ठळक मुद्दे१५ वर्षांपूर्वी या ठाण्याची जशी अवस्था होती, तसेच विदारक चित्र आयुक्तांना पाहायला मिळाले.अचानक पोलीस आयुक्त आल्याने ठाण्यातील उपस्थित अधिकारी, कर्मचारी सावधान झाले.

औरंगाबाद : जवाहर पोलीस ठाण्यात पाय ठेवताच ‘ये  पुलिस थाना जैसे का वैसा ही है’, असे उद्गार १५ वर्षांनंतर शहरात आलेले नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी काढले. डॉ. गुप्ता यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता अचानक जवाहरनगर पोलीस ठाण्याला  भेट दिली. ठाण्यातील सध्याची परिस्थिती पाहत न राहवून त्यांनी ठाण्याच्या दुर्दशेबद्दल मत व्यक्त केले. 

पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे हे आधीच  ठाण्यात उपस्थित होते. सुमारे तासभर आयुक्त ठाण्यात होते. अचानक पोलीस आयुक्त आल्याने ठाण्यातील उपस्थित अधिकारी, कर्मचारी सावधान झाले. १५ वर्षांपूर्वी या ठाण्याची जशी अवस्था होती, तसेच विदारक चित्र आयुक्तांना पाहायला मिळाले. ठाण्याच्या बाहेर रस्त्यावर उभी असलेली वाहने. तक्रारदारांचा बाहेर असलेला घोळका आणि पोलीस उभे, तर काही बसलेले दिसले. ठाणे अंमलदाराच्या केबिनमध्ये टेबलसमोर अर्जदाराला बसण्यासाठी ठेवलेला बेंच. आतमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना बसायला पुरेशी जागा नसल्याने अपुऱ्या जागेत  केलेले पार्टिशन,  डीबी पथकाच्या रूममध्ये अधिकारी, कर्मचारी बसलेले होते. ठाणे अंमलदार ते पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये जाण्याचा अरुंद रस्ता  पाहून ‘ये पुलिस थाना जैसा का वैसा ही हैं’ असे उद्गार पोलीस आयुक्तांनी काढले.

सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे, डीबी पथकाचे उपनिरीक्षक भरत पाचोळे आणि  बंदोबस्तासाठी हजर असलेले पोलीस उपनिरीक्षक वाघ  आदी अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. कोरोना साथरोगाने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जागेअभावी सोशल डिस्टन्सिंंग राखणे शक्य होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वर्धन घोडे खून प्रकरणाचा तपास मॉडेल तपास म्हणून ओळखला जातो. ही घटना जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे  पोलीस आयुक्तांना समजले. वर्धन घोडे खून प्रकरणाची तपास फाईल मागविली. ठाणेदार पोलीस निरीक्षक संतोष पाटील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीनिमित्त बाहेर असल्याने त्यांना ही फाईल पाहता आली नाही. यावेळी त्यांनी संपूर्ण ठाणे पाहताना अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. 

१९९३ पासून पोलीस ठाणे किरायाच्या इमारतीत१९९३ पासून जवाहरनगर पोलीस ठाणे किरायाच्या इमारतीमध्ये सुरू आहे. शासकीय इमारतीत हे ठाणे व्हावे याकरिता आतापर्यंत एकाही अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला नाही. परिणामी, आज नव्या पोलीस आयुक्तांना १५ वर्षांनंतरही या ठाण्यात कोणताही बदल जाणवला नाही.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबाद