शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

‘यह जवाहरनगर पुलिस थाना जैसे का वैसा ही है’; पोलीस आयुक्तांनी १५ वर्षांपूर्वीची काढली आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 14:45 IST

ठाण्यातील सध्याची परिस्थिती पाहत न राहवून त्यांनी ठाण्याच्या दुर्दशेबद्दल मत व्यक्त केले. 

ठळक मुद्दे१५ वर्षांपूर्वी या ठाण्याची जशी अवस्था होती, तसेच विदारक चित्र आयुक्तांना पाहायला मिळाले.अचानक पोलीस आयुक्त आल्याने ठाण्यातील उपस्थित अधिकारी, कर्मचारी सावधान झाले.

औरंगाबाद : जवाहर पोलीस ठाण्यात पाय ठेवताच ‘ये  पुलिस थाना जैसे का वैसा ही है’, असे उद्गार १५ वर्षांनंतर शहरात आलेले नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी काढले. डॉ. गुप्ता यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता अचानक जवाहरनगर पोलीस ठाण्याला  भेट दिली. ठाण्यातील सध्याची परिस्थिती पाहत न राहवून त्यांनी ठाण्याच्या दुर्दशेबद्दल मत व्यक्त केले. 

पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे हे आधीच  ठाण्यात उपस्थित होते. सुमारे तासभर आयुक्त ठाण्यात होते. अचानक पोलीस आयुक्त आल्याने ठाण्यातील उपस्थित अधिकारी, कर्मचारी सावधान झाले. १५ वर्षांपूर्वी या ठाण्याची जशी अवस्था होती, तसेच विदारक चित्र आयुक्तांना पाहायला मिळाले. ठाण्याच्या बाहेर रस्त्यावर उभी असलेली वाहने. तक्रारदारांचा बाहेर असलेला घोळका आणि पोलीस उभे, तर काही बसलेले दिसले. ठाणे अंमलदाराच्या केबिनमध्ये टेबलसमोर अर्जदाराला बसण्यासाठी ठेवलेला बेंच. आतमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना बसायला पुरेशी जागा नसल्याने अपुऱ्या जागेत  केलेले पार्टिशन,  डीबी पथकाच्या रूममध्ये अधिकारी, कर्मचारी बसलेले होते. ठाणे अंमलदार ते पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये जाण्याचा अरुंद रस्ता  पाहून ‘ये पुलिस थाना जैसा का वैसा ही हैं’ असे उद्गार पोलीस आयुक्तांनी काढले.

सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे, डीबी पथकाचे उपनिरीक्षक भरत पाचोळे आणि  बंदोबस्तासाठी हजर असलेले पोलीस उपनिरीक्षक वाघ  आदी अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. कोरोना साथरोगाने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जागेअभावी सोशल डिस्टन्सिंंग राखणे शक्य होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वर्धन घोडे खून प्रकरणाचा तपास मॉडेल तपास म्हणून ओळखला जातो. ही घटना जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे  पोलीस आयुक्तांना समजले. वर्धन घोडे खून प्रकरणाची तपास फाईल मागविली. ठाणेदार पोलीस निरीक्षक संतोष पाटील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीनिमित्त बाहेर असल्याने त्यांना ही फाईल पाहता आली नाही. यावेळी त्यांनी संपूर्ण ठाणे पाहताना अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. 

१९९३ पासून पोलीस ठाणे किरायाच्या इमारतीत१९९३ पासून जवाहरनगर पोलीस ठाणे किरायाच्या इमारतीमध्ये सुरू आहे. शासकीय इमारतीत हे ठाणे व्हावे याकरिता आतापर्यंत एकाही अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला नाही. परिणामी, आज नव्या पोलीस आयुक्तांना १५ वर्षांनंतरही या ठाण्यात कोणताही बदल जाणवला नाही.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबाद