शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

औरंगाबादमधील जालना रोडवर १० तासांत धावतात २३ हजार चारचाकी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 7:35 PM

तासाला धावतात २ हजार वाहने

ठळक मुद्देव्यावसायिक इमारतींमध्येही पार्किंग गायबसार्वजनिक पार्किंगची व्यवस्थाच नाही

औरंगाबाद : शहरातील जालना रस्त्यावर तासाभरात तब्बल २ हजार ३४० चारचाकी वाहने धावतात. दिवसभरात १० तासांचा विचार केला, तर ही संख्या २३ हजारांवर जाते. मात्र, यातील निम्म्या चारचाकींसाठीही शहरात सावर्जनिक पार्किंगची सुविधा नाही.

व्यावसायिक इमारतींमध्येही पार्किंगसाठी जागा सोडण्यात आलेली नाही. पार्किंगच्या जागांवर सर्रास अवैध बांधकाम करण्यात आलेले आहे. परिणामी, किमान १० हजारांवर वाहने रस्त्यांवरच उभी क रण्याची वेळ येत आहे. त्यातून वाहतुकीचा बट्ट्याबोळ होत आहे.नोकरी, व्यवसाय, खरेदीनिमित्त नागरिक घराबाहेर पडतात. नियोजित स्थळी पोहोचल्यानंतर वाहन उभे कुठे करायचे, यासाठी पार्किंगची जागा शोधावी लागते. पार्किंगची सुविधाच नसल्याने मिळेल त्या जागेत वाहन उभे करून नागरिक मोकळे होतात. शहरातील जालना रोड, औरंगपुरा, गुलमंडी, क्रांतीचौक, रेल्वेस्टेशनसह प्रत्येक मार्गावर भररस्त्यावर वाहने उभी केली जात आहेत. शहरात वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

शहरातील जालना रोडसह बहुतांश रस्त्यांवरील व्यापारी संकुलांमध्ये पार्किंगच्या जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. अनेक हॉटेल, कार्यालये, रुग्णालयांमध्ये पार्किंगच्या जागेत अवैधरीत्या बांधकामे करण्यात आली आहेत. पार्किंगऐवजी अन्य सुविधेसाठी जागांचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना थेट रस्त्यावर वाहन उभे करावी लागतात. रस्त्यांवरच वाहन उभे केले जात असल्याने वारंवार वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होते. सायंकाळी मुख्य बाजारपेठेत  पायी चालणेही अवघड होते. 

...अशी केली पाहणीलोकमत प्रतिनिधीने शहरातील आकाशवाणी चौकात दुपारी ३ वाजेच्या सुमारास सेव्हन हिलकडून मोंढ्याकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनांच्या संख्येचा आढावा घेतला. तेव्हा तासाभरात २ हजार ३४० चारचाकी वाहने जात असल्याचे निदर्शनास आले. ४या आकडेवारीनुसार सकाळी १० ते रात्री ८ वाजेदरम्यान या ठिकाणाहून किमान २३ हजार चारचाकी रवाना होतात. यातील ५० टक्के म्हणजे १० हजार वाहने जरी सार्वजनिक ठिकाणी थांबत असल्याचे गृहीत धरल्यास पार्किं गसाठी २० एकर जागा लागेल. प्रत्यक्षात काही वाहनांपुरतीच पार्किंगची सुविधा आहे. त्यामुळे वाहने रस्त्यावरच उभी होत असल्याची परिस्थिती आहे. 

याठिकाणी पार्किंग व्यवस्थामहापालिकेने काही वर्षांपूर्वी ‘पे अ‍ॅण्ड पार्क ’ची व्यवस्था केली होती; परंतु त्या जागाही आता गायब झाल्या आहेत. गुलमंडी, पैठणगेट, सिद्धार्थ उद्यान येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. पी-१, पी-२ अशी व्यवस्था काही रस्त्यांवर करण्यात आलेली आहे. मात्र, वाहनांच्या संख्येचा विचार करताना शहरात सार्वजनिक ठिकाणी पार्किंगची सुविधाच नाही.  त्यामुळे पार्किंगसाठी जागा शोधण्याची वेळ वाहनधारकांवर येते.

पार्किंग धोरणाचा कागदोपत्री खेळ१९९१ आणि २००२ या दोन शहर विकास आराखड्यात २० पेक्षा अधिक जागांवर पार्किंगसाठी आरक्षण टाकलेले आहे. मात्र, यातील एकाही जागेवर भूसंपादन झालेले नाही.  न्यायालयाच्या आदेशानंतरही पार्किंग धोरणाचा फक्त कागदोपत्री खेळ सुरू आहे. महापालिकेच्या अनास्थेमुळे शहरातील रस्त्यास्त्यांवर वाहनांची पार्किंग होत असल्याची परिस्थिती आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिसfour wheelerफोर व्हीलर