शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जलजीवन मिशनची कामे ठप्प! दहा कंत्राटदारांना आता दररोज २ हजार रुपयांचा दंड

By विजय सरवदे | Updated: November 3, 2023 17:10 IST

‘सीईओं’नी टोचले ४३ कंत्राटदारांचे कान; सीईओ मीना यांनी आतापर्यंत या कंत्राटदारांना सूचना व नोटिसा बजावल्या होत्या.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत १,१६१ योजनांची कामे सुरू आहेत. मात्र, यापैकी ४३ कंत्राटदारांच्या कामांमध्ये वर्षभरापासून प्रगतीच नाही. या कंत्राटदारांची शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली. यापैकी १० कंत्राटदारांना कामांमध्ये गती घेत नाही, तोपर्यंत दररोज २ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी घेतला आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ या संकल्पनेतून केंद्र सरकारने २०२४ पर्यंत ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत ग्रामीण कुटुंबातील प्रतिव्यक्ती ५५ लीटर पाणी देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने १,१६१ योजनांची कामे वाटप केली असून मागील वर्षभरापासून त्यात येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन मार्ग काढला जात आहे. मात्र, तीन महिन्यांपूर्वी काही कामांमध्ये सरपंच- कंत्राटदारांमध्ये बेबनाव असल्याने कामे थांबली होती. त्यामुळे ‘सीईओ’ मीना यांनी संबंधित कंत्राटार, सरपंच, ग्रामसेवक यांची सुनावणी घेतली व कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या दोन सरपंचांविरुद्ध पोलिसांत गुन्हाही दाखल केला. त्याचवेळी संथगतीने कामे करणाऱ्या कंत्राटदारांना पहिल्यांदा दररोज २०० रुपये दंड आकारला. त्यानंतरही कामांत सुधारणा न झाल्यामुळे दंडाच्या रकमेत वाढ करून रोज ५०० रुपये दंड आकारण्यात आला. अजूनही यापैकी १० कंत्राटदारांच्या कामांत सुधारणा झाली नसल्याची बाब समोर आल्यामुळे शुक्रवारी त्यांना रोज २ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. दंडाची ही रक्कम त्यांच्या सुरक्षा रकमेतून अथवा बिलातून कपात करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांना देण्यात आल्या आहेत.

तीन कामांची फेरनिवादासीईओ मीना यांनी आतापर्यंत या कंत्राटदारांना सूचना व नोटिसा बजावल्या होत्या. दंडही आकारण्यात आला होता. मात्र, ४३ पैकी ३ कंत्राटदारांनी अद्यापही कामे सुरू केली नाहीत. या तीन कंत्राटदारांची कामे रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. या बैठकीत उर्वरित कंत्राटदार व ग्रामसेवकांना तातडीने कामांत गती आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदWaterपाणी