शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

त्रयस्थ संस्थेच्या तपासणीत जल जीवन मिशन ‘पास’; तांत्रिक परीक्षणात ५७२ पैकी ३३० कामे उत्कृष्ट

By विजय सरवदे | Updated: November 10, 2023 17:58 IST

जिल्ह्यातील पूर्णत्वास आलेल्या ५७२ कामांपैकी ३३२ गावांना पाणीपुरवठाही सुरू करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे गुणवत्तापूर्वक आणि जलदगतीने व्हावीत, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना हे सातत्याने अपडेट घेत आहेत. दरम्यान, या योजनेंतर्गत १ हजार ११६ कामांपैकी आजपर्यंत ५७२ कामे पूर्णत्वास आली असून, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या त्रयस्थ संस्थेने नुकत्याच केलेल्या तांत्रिक परीक्षणात ३३० कामे उत्कृष्ट, तर ३० कामे समाधानकारक असल्याचा अभिप्राय दिला आहे.

केंद्र सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलजीवन मिशन हाती घेतले आहे. ज्या गावांना सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, अशी गावे जलजीवन मिशनच्या आराखड्यात प्राधान्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. या मिशन अंतर्गत जिल्ह्यातील १२४१ गावांसाठी ११६१ योजनांची कामे हाती घेण्यात आली असून, यासाठी ६७७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

दरम्यान, जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत हाती घेण्यात आलेली सर्व कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५७२ कामे पूर्णत्वास आली असून, या कार्यक्रमांतर्गत कामांचा गुणात्मक दर्जा तपासण्यासाठी राज्य शासनाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या त्रयस्थ संस्थेची नेमणूक केली आहे. या संस्थेने ५०१ कामांना भेटी दिल्या. यापैकी ३३० कामे उत्कृष्ट, ३० कामे समाधानकारक असल्याचा अभिप्राय दिला आहे, तर काही कामांमध्ये त्रुटी निघाल्या आहेत. आणखी ५३६ कामांच्या दर्जाचे परीक्षण लवकरच होईल, असे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी सांगितले.

३३२ गावांना पाणीपुरवठा सुरूजिल्ह्यातील पूर्णत्वास आलेल्या ५७२ कामांपैकी ३३२ गावांना पाणीपुरवठाही सुरू करण्यात आला आहे. सध्या १४८ योजना १ ते २५ टक्के, २६२ कामे २६ ते ५० टक्के, १७९ कामे ५१ ते ७५ टक्क्यांपर्यंत प्रगतिपथावर आहेत. ३८९ कामे ७६ ते ९९ टक्क्यांपर्यंत अर्थात पूर्णत्वाकडे आली असून, १८३ कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदWaterपाणी