शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

त्रयस्थ संस्थेच्या तपासणीत जल जीवन मिशन ‘पास’; तांत्रिक परीक्षणात ५७२ पैकी ३३० कामे उत्कृष्ट

By विजय सरवदे | Updated: November 10, 2023 17:58 IST

जिल्ह्यातील पूर्णत्वास आलेल्या ५७२ कामांपैकी ३३२ गावांना पाणीपुरवठाही सुरू करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे गुणवत्तापूर्वक आणि जलदगतीने व्हावीत, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना हे सातत्याने अपडेट घेत आहेत. दरम्यान, या योजनेंतर्गत १ हजार ११६ कामांपैकी आजपर्यंत ५७२ कामे पूर्णत्वास आली असून, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या त्रयस्थ संस्थेने नुकत्याच केलेल्या तांत्रिक परीक्षणात ३३० कामे उत्कृष्ट, तर ३० कामे समाधानकारक असल्याचा अभिप्राय दिला आहे.

केंद्र सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलजीवन मिशन हाती घेतले आहे. ज्या गावांना सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, अशी गावे जलजीवन मिशनच्या आराखड्यात प्राधान्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. या मिशन अंतर्गत जिल्ह्यातील १२४१ गावांसाठी ११६१ योजनांची कामे हाती घेण्यात आली असून, यासाठी ६७७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

दरम्यान, जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत हाती घेण्यात आलेली सर्व कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५७२ कामे पूर्णत्वास आली असून, या कार्यक्रमांतर्गत कामांचा गुणात्मक दर्जा तपासण्यासाठी राज्य शासनाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या त्रयस्थ संस्थेची नेमणूक केली आहे. या संस्थेने ५०१ कामांना भेटी दिल्या. यापैकी ३३० कामे उत्कृष्ट, ३० कामे समाधानकारक असल्याचा अभिप्राय दिला आहे, तर काही कामांमध्ये त्रुटी निघाल्या आहेत. आणखी ५३६ कामांच्या दर्जाचे परीक्षण लवकरच होईल, असे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी सांगितले.

३३२ गावांना पाणीपुरवठा सुरूजिल्ह्यातील पूर्णत्वास आलेल्या ५७२ कामांपैकी ३३२ गावांना पाणीपुरवठाही सुरू करण्यात आला आहे. सध्या १४८ योजना १ ते २५ टक्के, २६२ कामे २६ ते ५० टक्के, १७९ कामे ५१ ते ७५ टक्क्यांपर्यंत प्रगतिपथावर आहेत. ३८९ कामे ७६ ते ९९ टक्क्यांपर्यंत अर्थात पूर्णत्वाकडे आली असून, १८३ कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदWaterपाणी