शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

त्रयस्थ संस्थेच्या तपासणीत जल जीवन मिशन ‘पास’; तांत्रिक परीक्षणात ५७२ पैकी ३३० कामे उत्कृष्ट

By विजय सरवदे | Updated: November 10, 2023 17:58 IST

जिल्ह्यातील पूर्णत्वास आलेल्या ५७२ कामांपैकी ३३२ गावांना पाणीपुरवठाही सुरू करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे गुणवत्तापूर्वक आणि जलदगतीने व्हावीत, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना हे सातत्याने अपडेट घेत आहेत. दरम्यान, या योजनेंतर्गत १ हजार ११६ कामांपैकी आजपर्यंत ५७२ कामे पूर्णत्वास आली असून, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या त्रयस्थ संस्थेने नुकत्याच केलेल्या तांत्रिक परीक्षणात ३३० कामे उत्कृष्ट, तर ३० कामे समाधानकारक असल्याचा अभिप्राय दिला आहे.

केंद्र सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलजीवन मिशन हाती घेतले आहे. ज्या गावांना सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, अशी गावे जलजीवन मिशनच्या आराखड्यात प्राधान्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. या मिशन अंतर्गत जिल्ह्यातील १२४१ गावांसाठी ११६१ योजनांची कामे हाती घेण्यात आली असून, यासाठी ६७७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

दरम्यान, जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत हाती घेण्यात आलेली सर्व कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५७२ कामे पूर्णत्वास आली असून, या कार्यक्रमांतर्गत कामांचा गुणात्मक दर्जा तपासण्यासाठी राज्य शासनाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या त्रयस्थ संस्थेची नेमणूक केली आहे. या संस्थेने ५०१ कामांना भेटी दिल्या. यापैकी ३३० कामे उत्कृष्ट, ३० कामे समाधानकारक असल्याचा अभिप्राय दिला आहे, तर काही कामांमध्ये त्रुटी निघाल्या आहेत. आणखी ५३६ कामांच्या दर्जाचे परीक्षण लवकरच होईल, असे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी सांगितले.

३३२ गावांना पाणीपुरवठा सुरूजिल्ह्यातील पूर्णत्वास आलेल्या ५७२ कामांपैकी ३३२ गावांना पाणीपुरवठाही सुरू करण्यात आला आहे. सध्या १४८ योजना १ ते २५ टक्के, २६२ कामे २६ ते ५० टक्के, १७९ कामे ५१ ते ७५ टक्क्यांपर्यंत प्रगतिपथावर आहेत. ३८९ कामे ७६ ते ९९ टक्क्यांपर्यंत अर्थात पूर्णत्वाकडे आली असून, १८३ कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदWaterपाणी