शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जायकवाडी धरणात 67 टक्के पाणीसाठा; ३१ हजार क्युसेकने आवक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 21:25 IST

धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त ६.३३ फूट पाण्याची गरज आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणात आज अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग सुरू असल्याने ३१०३८ क्युसेक्स आवक सुरू होती. सायंकाळी ७ वा धरणाचा जलसाठा ६७.१६ टक्के झाला होता. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त ६.३३ फूट पाण्याची गरज आहे. धरणात आवक कमी झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत आज गेल्या दोन दिवसाच्या मानाने संथगतीने वाढ झाली.

नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर वेअर मधून गोदावरी पात्रात आज २९५९४ क्युसेक व अहमदनगर जिल्ह्यातील ओझर वेअर मधून ९७६९ क्युसेक विसर्ग सुरू होता. हे पाणी जायकवाडी धरणात ३१०३८ क्युसेक क्षमतेने दाखल होत होते.

१५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी सायंकाळी ७ वा १५१५.४७  फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा  २१९६.२५९दलघमी( ७७.५५ टीएमसी)  झाला होता. यापैकी जीवंत जलसाठा १५४८.१५० दलघमी ( ५१.४८ टीएमसी) इतका झाला आहे.

चणकवाडी बंधाऱ्याचे दरवाजे काढण्यास प्रारंभ......जायकवाडी धरणाचा जलसाठा ७०% च्या आसपास आल्याने नजीकच्या काळात मोठा पाऊस झाला किंवा नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्यास धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. या दृष्टीने पैठण शहरालगत असलेल्या चनकवाडी बंधाऱ्याचे दरवाजे काढून घ्यावे लागतात.

आज कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, आर ई चक्रे, अनिकेत हासबनीस, सुमित भताने आदीच्या पथकाने या बंधाऱ्याचे दरवाजे काढण्याची कार्यवाही सुरू केली. या बंधाऱ्यास एकूण ३८ दरवाजे असून एक दरवाजा काढण्यास साधारणपणे एक ते दीड तासाचा कालावधी लागतो. येत्या दोन दिवसात गेट काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे कार्यकारी अभियंता काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण