शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

जायकवाडी धरणात 67 टक्के पाणीसाठा; ३१ हजार क्युसेकने आवक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 21:25 IST

धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त ६.३३ फूट पाण्याची गरज आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणात आज अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग सुरू असल्याने ३१०३८ क्युसेक्स आवक सुरू होती. सायंकाळी ७ वा धरणाचा जलसाठा ६७.१६ टक्के झाला होता. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त ६.३३ फूट पाण्याची गरज आहे. धरणात आवक कमी झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत आज गेल्या दोन दिवसाच्या मानाने संथगतीने वाढ झाली.

नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर वेअर मधून गोदावरी पात्रात आज २९५९४ क्युसेक व अहमदनगर जिल्ह्यातील ओझर वेअर मधून ९७६९ क्युसेक विसर्ग सुरू होता. हे पाणी जायकवाडी धरणात ३१०३८ क्युसेक क्षमतेने दाखल होत होते.

१५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी सायंकाळी ७ वा १५१५.४७  फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा  २१९६.२५९दलघमी( ७७.५५ टीएमसी)  झाला होता. यापैकी जीवंत जलसाठा १५४८.१५० दलघमी ( ५१.४८ टीएमसी) इतका झाला आहे.

चणकवाडी बंधाऱ्याचे दरवाजे काढण्यास प्रारंभ......जायकवाडी धरणाचा जलसाठा ७०% च्या आसपास आल्याने नजीकच्या काळात मोठा पाऊस झाला किंवा नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्यास धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. या दृष्टीने पैठण शहरालगत असलेल्या चनकवाडी बंधाऱ्याचे दरवाजे काढून घ्यावे लागतात.

आज कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, आर ई चक्रे, अनिकेत हासबनीस, सुमित भताने आदीच्या पथकाने या बंधाऱ्याचे दरवाजे काढण्याची कार्यवाही सुरू केली. या बंधाऱ्यास एकूण ३८ दरवाजे असून एक दरवाजा काढण्यास साधारणपणे एक ते दीड तासाचा कालावधी लागतो. येत्या दोन दिवसात गेट काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे कार्यकारी अभियंता काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण