शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

जायकवाडी @ १००% : आवक वाढल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 20:41 IST

 पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यास परतीच्या पावसाने गेल्या २४ तासात तडाखा दिल्याने तेथील धरण समुहातून मोठ्याप्रमाणात आज सकाळ पासून विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

औरंगाबाद : पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यास परतीच्या पावसाने गेल्या २४ तासात तडाखा दिल्याने तेथील धरण समुहातून मोठ्याप्रमाणात आज सकाळ पासून विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. आज रोजी जायकवाडी धरण १००% भरलेले असल्याने वरील धरणातून येणारी आवक लक्षात घेता आज सायंकाळी ६ वा धरणाचे १० दरवाजे अर्धाफुटाने वर उचलून गोदावरी पात्रात ५२९० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या विसर्गात रात्रीतून वाढ होण्याची शक्यता धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आज दिवसभर धरणात ९२०० क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती.

वरील धरणातून सोडण्यात आलेले पाणी २६ तासाच्या आत धरणात पोहचणार असल्याने धरणात हे पाणी समावून घेण्यासाठी धरणातील पाणी सोडून पॉकेट तयार करण्यात येत आहे या मुळे जायकवाडीतून नियंत्रित विसर्ग करता येणार आहे असे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.

आज सायंकाळी ६.०० वा.धरणाचे द्वार  क्र.१०,१२,१४,१६,१८,१९,२१,२३,२५, व २७ असे एकूण  १० द्वार प्रत्येकी ६ इचांने उचलुन ५२९० क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रातही गेल्या तीन दिवसापासून पाऊस सुरू असल्याने धरणात ९२०० क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे. 

नाशिक जिल्ह्यात मुसळधार...

नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासात मुसळधार सुरू असून करंजवन ५५ मि मी, गंगापूर ५२ मि मी, दारणा २२ मि मी, ओझरखेड २५ मिमी, पालखेड ३० मि मी, वाघाड ४० मि मी, पुणेगाव २६ मि मी, तीसगांव २१ मि मी, कच्छपी ५६ मि मी, गौतमी ५३ मि मी, भावली २२ मि मी, ईगतपुरी ७४ मि मी, त्र्यंबकेश्वर ३४ मि मी, विंचूर २३मि मी, घोटी २३ मि मी,  नाशिक १९ मि मी, श्रीरामपूर ३१ मि मी, कन्नड ३१ मि मी, येवला ३५ मि मी, फुंदेवाडी ४० मि मी, शिर्डी २८ मि मी, अशा जबरदस्त पावसाची नोंद झाली यामुळे तेथील धरणातून विसर्ग करण्यात येत आहे.

नाशिक धरणसमुहातील विसर्ग :-

नाशिक जिल्ह्यातील धरणसमुहापैकी दारणा २५०० क्युसेक्स, गंगापूर १७९३ क्युसेक्स, पालखेड ४३७क्युसेक्स, असा मिळुन नांदुर मधमेश्वर वेअर मधुन १०७७९ क्युसेक्स विसर्ग गोदावरीत करण्यात येत आहे. याच प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा ८१५ क्युसेक्स व ओझरवेअर मधुन प्रवरा पात्रात १०९४ क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे हे पाणी गतीने जायकवाडी कडे झेपावले आहे. मंगळवारी दुपारनंतर हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होण्याची शक्यता आहे.

जायकवाडी @ १००%

जायकवाड़ी धरणाची पाणी पातळी 1522.00 फुट झाली असून

 एकूण पाणी साठा:- 2909.041 दलघमी झाला आहे या पैकी

जीवंत पाणी साठा:- 2170.935 दलघमी असून धरणाची टक्केवारी:- 100 % झाली आहे.

तर विसर्ग वाढणार........

जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, कोपरगाव, येवला, शिर्डी, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, शेवगाव आदी भागात पाऊस सुरू असून हे पाणी तात्काळ धरणात दाखल होते या भागात पाऊस वाढल्यास किंवा नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्ग वाढविल्यास जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवावा लागेल असे कार्यकारी अभियंता चारूदत्त बनसोड यांनी सांगितले.

टॅग्स :Damधरण