शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

विजेचे खांब आड आले तरी चालेल, रस्ता बांधा; पीडब्ल्यूडी, महावितरणचा नाही ताळमेळ

By विकास राऊत | Updated: October 5, 2023 19:46 IST

महावितरणचे खांब रस्त्याच्या मधाेमध ठेवून दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरण उरकण्याचा अजब सल्ला बांधकाम विभागाने कंत्राटदाराला दिला.

छत्रपती संभाजीनगर : पश्चिम मतदारसंघाचे आ. संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील शरणापूर ते साजापूर- करोडीकडे जाणाऱ्या सहा कि.मी. रस्त्याला दशकापासून लागलेली घरघर मे २०२३ मध्ये सुटली. आठ वर्षांत तीनदा निधी देऊनही रस्त्याचे काम सुरू होण्यास मुहूर्त लागत नव्हता. अनेक राजकीय शुक्लकाष्ठातून सुटल्यानंतर काम सुरू झाले, मात्र त्या कामाचाही बट्ट्याबोळ सा.बां. विभाग आणि महावितरणने केला.

महावितरणचे खांब रस्त्याच्या मधाेमध ठेवून दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरण उरकण्याचा अजब सल्ला बांधकाम विभागाने कंत्राटदाराला दिला. कंत्राटदारानेही मागचा-पुढचा काहीही विचार न करता कामाचा धडाका लावला आहे. कंत्राटदाराच्या यंत्रणेला बसून ठेवल्यास नुकसान होऊ नये, म्हणून बांधकाम विभागाने काम पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले तर महावितरण कंपनीने खांब काढण्याची जबाबदारी बांधकाम विभागाचीच आहे, असे सांगून हात वर केले. या टोलवाटोलवीत खांब कोण काढणार हे अनुत्तरित आहे.

...तर २८ कोटी जातील खड्ड्यात५० फूट रस्ता सिमेंट- काँक्रिटीकरणातून होत आहे. रस्त्यात येणारे महावितरणचे ३० हून अधिक खांब न काढताच दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरण उरकण्यात येत आहे. महावितरण खांब काढेल, तेव्हा खड्डा खोदून काढेल. तेव्हा रस्त्याची पूर्ण चाळणी होईल. २८ कोटींच्या या रस्त्यात येणारे खांब बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी काढून देण्यासाठी प्रयत्न न केल्यामुळे हा प्रकार घडत आहे. चौपदरी रस्ता असताना विजेच्या खांबांमुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे.

सहा कोटींवरून २८ कोटींवर गेले काम...२०१५ साली फक्त सहा कोटींमध्ये या रस्त्याचे काम झाले असते; परंतु, त्यावेळी काम रखडले. २०२१ साली भूमिपूजन झालेल्या कामांमध्ये या रस्त्याचा समावेश होता. के.ए. कन्स्ट्रक्शनने चार पूल बांधून १५ कोटींचे काम अर्धवट सोडल्याने बांधकाम विभागाने निविदा रद्द केली. २०२२ मध्ये नव्याने २८ कोटींवर रस्त्याचे काम गेले. मुंबईतील जे.पी. कन्स्ट्रक्शन्सने रस्त्याचे काम घेतले असून प्रकाश पाटील उपकंत्राटदार आहेत.

पीडब्ल्यूडी आणि महावितरणचा एकमेकांवर निशाणा...पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांना थेट प्रश्न...प्रश्न : रस्त्यातील खांब न काढता काम का सुरू आहे?उत्तर : महावितरणला १५ वेळेस पत्र देऊनही त्यांनी काही केले नाही.प्रश्न : महावितरणने रस्ता खोदून खांब काढले तर काय?उत्तर : खालपर्यंत काँक्रीट केले आहे, खांब कापून काढावे लागतील.प्रश्न : या सगळ्या प्रकाराला कोण जबाबदार?उत्तर : महावितरण.

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण पवार यांना थेट प्रश्नप्रश्न : महावितरण रस्त्यातील खांब का काढत नाही?उत्तर : ते खांब पीडब्ल्यूडीने कंत्राटदार नेमून काढावेत.प्रश्न : महावितरणची यात काय भूमिका?उत्तर : कामाच्या बजेटमध्ये १० टक्के तरतूद असून पीडब्ल्यूडीने कंत्राटदार नेमावा.प्रश्न : खांब न काढल्यास काय होणार?उत्तर : अपघात होतील, काम सुरू होण्यापूर्वीच पीडब्ल्यूडीने हे खांब काढायला हवे होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणroad safetyरस्ते सुरक्षा