शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

विजेचे खांब आड आले तरी चालेल, रस्ता बांधा; पीडब्ल्यूडी, महावितरणचा नाही ताळमेळ

By विकास राऊत | Updated: October 5, 2023 19:46 IST

महावितरणचे खांब रस्त्याच्या मधाेमध ठेवून दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरण उरकण्याचा अजब सल्ला बांधकाम विभागाने कंत्राटदाराला दिला.

छत्रपती संभाजीनगर : पश्चिम मतदारसंघाचे आ. संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील शरणापूर ते साजापूर- करोडीकडे जाणाऱ्या सहा कि.मी. रस्त्याला दशकापासून लागलेली घरघर मे २०२३ मध्ये सुटली. आठ वर्षांत तीनदा निधी देऊनही रस्त्याचे काम सुरू होण्यास मुहूर्त लागत नव्हता. अनेक राजकीय शुक्लकाष्ठातून सुटल्यानंतर काम सुरू झाले, मात्र त्या कामाचाही बट्ट्याबोळ सा.बां. विभाग आणि महावितरणने केला.

महावितरणचे खांब रस्त्याच्या मधाेमध ठेवून दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरण उरकण्याचा अजब सल्ला बांधकाम विभागाने कंत्राटदाराला दिला. कंत्राटदारानेही मागचा-पुढचा काहीही विचार न करता कामाचा धडाका लावला आहे. कंत्राटदाराच्या यंत्रणेला बसून ठेवल्यास नुकसान होऊ नये, म्हणून बांधकाम विभागाने काम पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले तर महावितरण कंपनीने खांब काढण्याची जबाबदारी बांधकाम विभागाचीच आहे, असे सांगून हात वर केले. या टोलवाटोलवीत खांब कोण काढणार हे अनुत्तरित आहे.

...तर २८ कोटी जातील खड्ड्यात५० फूट रस्ता सिमेंट- काँक्रिटीकरणातून होत आहे. रस्त्यात येणारे महावितरणचे ३० हून अधिक खांब न काढताच दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरण उरकण्यात येत आहे. महावितरण खांब काढेल, तेव्हा खड्डा खोदून काढेल. तेव्हा रस्त्याची पूर्ण चाळणी होईल. २८ कोटींच्या या रस्त्यात येणारे खांब बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी काढून देण्यासाठी प्रयत्न न केल्यामुळे हा प्रकार घडत आहे. चौपदरी रस्ता असताना विजेच्या खांबांमुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे.

सहा कोटींवरून २८ कोटींवर गेले काम...२०१५ साली फक्त सहा कोटींमध्ये या रस्त्याचे काम झाले असते; परंतु, त्यावेळी काम रखडले. २०२१ साली भूमिपूजन झालेल्या कामांमध्ये या रस्त्याचा समावेश होता. के.ए. कन्स्ट्रक्शनने चार पूल बांधून १५ कोटींचे काम अर्धवट सोडल्याने बांधकाम विभागाने निविदा रद्द केली. २०२२ मध्ये नव्याने २८ कोटींवर रस्त्याचे काम गेले. मुंबईतील जे.पी. कन्स्ट्रक्शन्सने रस्त्याचे काम घेतले असून प्रकाश पाटील उपकंत्राटदार आहेत.

पीडब्ल्यूडी आणि महावितरणचा एकमेकांवर निशाणा...पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांना थेट प्रश्न...प्रश्न : रस्त्यातील खांब न काढता काम का सुरू आहे?उत्तर : महावितरणला १५ वेळेस पत्र देऊनही त्यांनी काही केले नाही.प्रश्न : महावितरणने रस्ता खोदून खांब काढले तर काय?उत्तर : खालपर्यंत काँक्रीट केले आहे, खांब कापून काढावे लागतील.प्रश्न : या सगळ्या प्रकाराला कोण जबाबदार?उत्तर : महावितरण.

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण पवार यांना थेट प्रश्नप्रश्न : महावितरण रस्त्यातील खांब का काढत नाही?उत्तर : ते खांब पीडब्ल्यूडीने कंत्राटदार नेमून काढावेत.प्रश्न : महावितरणची यात काय भूमिका?उत्तर : कामाच्या बजेटमध्ये १० टक्के तरतूद असून पीडब्ल्यूडीने कंत्राटदार नेमावा.प्रश्न : खांब न काढल्यास काय होणार?उत्तर : अपघात होतील, काम सुरू होण्यापूर्वीच पीडब्ल्यूडीने हे खांब काढायला हवे होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणroad safetyरस्ते सुरक्षा