शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

गाडी रुळावर येण्यास वेळ लागणार; नवनियुक्त आयुक्त निपुण विनायक यांनी केला कामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:58 IST

महापालिकेची गाडी रुळावर येण्यासाठी थोडा वेळ निश्चितच लागणार असल्याचे मत नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद : उंचीवर गेल्यानंतर मला भीती वाटत होती. ही भीती घालविण्यासाठी मी पॅराग्लाइडिंग करायला लागलो. औरंगाबाद महापालिका आयुक्त म्हणून काम करण्याचे आव्हानही असेच मोठे आहे. एका दिवसात महापालिकेचे चित्र बदलणार नाही. नागरिकांमध्ये मनपाबद्दल विश्वास निर्माण करणे, प्राधान्यक्रमाने कचरा, पाणी या प्रश्नांचा निपटारा करणे आवश्यक आहे. महापालिकेची गाडी रुळावर येण्यासाठी थोडा वेळ निश्चितच लागणार असल्याचे मत नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी व्यक्त केले.

मंगळवारी सायंकाळी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच बुधवारी सकाळी ८ वाजेपासून त्यांनी कामकाजाला सुरुवात केली. सायंकाळी पत्रकारांसोबत मनमोकळेपणे गप्पा मारताना त्यांनी नमूद केले की, चंदीगड हे माझे मूळ गाव, एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यावर २००१ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालो. दिल्लीत मागील पाच वर्षांपासून काम करीत होतो. त्यापूर्वी मराठवाड्यात नांदेड महापालिका, जालना येथेही काम केले आहे. औरंगाबाद महापालिकेचा मी सध्या बारकाईने अभ्यास करतोय. साधारण आठ ते दहा दिवसांचा अवधी लागेल. आजच वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत बसून आढावा घेतला. कोणत्याही कामासाठी नागरिकांना महापालिकेत येण्याची गरज नाही. वॉर्ड अधिकाऱ्यांनी स्वत: आयुक्त म्हणून काम करावे, अशा सूचना दिल्या आहेत.

महापालिकेत आव्हाने खूप आहेत. प्रशासनाला स्वत:मध्ये व्यावसायिकपणा आणावा लागेल. अधिकाऱ्यांची टीम तयारी करावी लागणार आहे. प्रत्येक समस्येसाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांसोबत पार्टनरशिप करावी लागेल. लोकसहभाग वाढणेही तेवढेच महत्त्वाचे वाटते. नागरिक चांगल्या कामासाठी एक पाऊल पुढे आल्यास महापालिका प्रशासन नऊ पावले पुढे जाईल. लोकांना सांगण्यापेक्षा स्वत: आधी करून दाखविण्यावर आपला अधिक विश्वास आहे. शहराची बलस्थाने कोणती हे लक्षात घेऊन काम करण्यात येईल. कचऱ्याचे शहर ही प्रतिमा पुसून काढण्यात येईल. प्रशासन आणि नागरिक, अशी एक चेन तयार करण्यात येणार आहे.

‘ओल्ड चार्म अ‍ॅण्ड ब्युटी’५२ दरवाजांचे हे शहर आहे. पर्यटन क्षेत्रात काम करण्याची बरीच संधी आहे. शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे निपुण विनायक यांनी सांगितले. शहर कसे स्वच्छ व सुंदर करायचे हे ठरविण्याचा अधिकारही नागरिकांनाच देण्यात येणार आहे. श्वानांची नसबंदी, ई-गव्हर्नन्स, एक खिडकी योजना आदी अनेक क्षेत्रांत काम करण्यात येईल.

पाण्याचे आॅडिट करणारशहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाण्याचे आॅडिट झालेले नाही. प्राधान्याने आॅडिट करण्यात येणार आहे. लिकेज खूप आहेत. अनधिकृत नळही खूप आहेत. मनपाचे उत्पन्न आणि खर्च याकडेही कटाक्षाने लक्ष देण्याची गरज असून, निधी कुठे वापरावा हेसुद्धा ठरविले जाणार आहे. मालमत्तांचे मूल्यांकन झालेले नाही.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नWaterपाणी