शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

भाजपनेच 'बीआरएस'ला महाराष्ट्रात उतरवलं; संजय राऊतांचा सनसनाटी आरोप

By बापू सोळुंके | Updated: June 8, 2023 19:14 IST

''कर्नाटकात मोदी, शहा यांनी रोड शो केले, त्यांना कोण अडवतोय मात्र जे कर्नाटकात झाले तेच महाराष्ट्रात होईल''

छत्रपती संभाजीनगर: भारतीय जनता पक्षानेच भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाला महाराष्ट्रात आणले आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. भाजपने मनसेचा वापर केला, शिंदे गटाचा करीत आहे आणि तसाचा वापर करण्यासाठी त्यांनी केसीआर यांना महाराष्ट्रात आणल्याचे चित्र दिसत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

शिवसेना शाखा स्थापनेच्या ३९ वा वर्धापनदिनानिमित्त आयोजित पक्षाच्या मेळाव्यासाठी खा. राऊत छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आहेत. बुधवारी सकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, पाच राज्यात निवडणुका होत आहे, भाजप एक राज्य जिंकणार नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा मुंबईत येतात, महाराष्ट्रात येऊ द्या, त्यांचा पराभव अटळ आहे. कर्नाटकात मोदी, शहा यांनी रोड शो केले, त्यांना कोण अडवतोय मात्र जे कर्नाटकात झाले तेच महाराष्ट्रात होईल, असा दावाही त्यांनी केला. भाजपने आता बीआरएसला महाराष्ट्रात उतरवल्याचे चित्र दिसत ाहे. भाजपने मनसेचा वापर केला, आता शिंदे गटाचा करीत आहेत. तोडाफोडीवर भाजपचे लक्ष असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा परिस्थितीत आपली लढाई कोणासेाबत आहे, हे केसीआर ने ठरवावं.

फडणवीस सर्वात कमोजर गृहमंत्रीराज्य सरकारवर टांगती तलवार असतानाही सत्तेवर बसलेले आहात. हे सरकार तीन महिन्यात जाणार आहे. राजकारणासाठी तुम्हाला औरंगजेब लागतो. तुम्ही दंगली घडवतात.  देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते फेल आहे. गुंडांच्या मुसक्या आवळण्याऐवजी विरोधकांना त्रास देण्यासाठी गृहखात्याचा वापर केला जात आहे.  कमजोर गृहमंत्री म्हणून इतिहासात त्यांची नोंद राहिल अशी टीका राऊत यांनी केली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAurangabadऔरंगाबादBJPभाजपा