शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी कंपनी मालकाची

By बापू सोळुंके | Updated: January 2, 2024 14:14 IST

औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे उपसंचालक धीरज खिरोडकर यांच्याशी बातचीत

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसीतील सनशाईन इंटरप्रायजेस कंपनीला शनिवारी रात्री लागलेल्या आगीत सहा कामगारांना जीव गमवावा लागला. सर्व मृत कामगार दिवसा कंपनीत काम करीत आणि रात्री कंपनीच्याच खोलीत राहात असत. कायद्यानुसार कोणालाही कारखान्यात राहता येत नाही. शिवाय कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी कंपनी मालक आणि व्यवस्थापनाची असल्याचा दावा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य उपसंचालक धीरज खिराेडकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला. ‘लोकमत’ने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अशी उत्तरे दिली.

प्रश्न- आपल्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे आहेत?उत्तर- माझी पोस्टिंग छत्रपती संभाजीनगर विभागात असली तरी नांदेड विभागाचा अतिरिक्त पदभारही असल्याने संपूर्ण मराठवाडा माझे कार्यक्षेत्र आहे.

प्रश्न- सनशाईन इंटरप्रायजेस कंपनीची आपल्या कार्यालयाकडे नोंदणी आहे का? आपण या घटनेपूर्वी या कंपनीची तपासणी केली होती का?उत्तर- फॅक्टरी ॲक्टनुसार ज्या कंपनीत २० अथवा त्याहून अधिक कामगार एका पाळीत काम करतात अथवा स्फोटक, ज्वलनशील पदार्थ आणि रसायनांचा वापर उत्पादनासाठी होतो, अशा दहा कामगारांच्या कंपनीची आमच्या कार्यालयाकडे नोंद होते. सनशाईन इंटरप्रायजेस या कंपनीत २० पेक्षा कमी कामगार असल्याची प्राथमिक माहिती आहे, शिवाय कंपनी मालकाने आमच्या कार्यालयाकडे नोंदणीसाठी अर्ज केलेला नाही. यामुळे या कंपनीला आम्ही घटनेपूर्वी कधीच भेट दिली नाही.

प्रश्न- कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर असते ?उत्तर- कंपनीच्या गेटच्या आतमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीविताची काळजी घेण्याची जबाबदारी कंपनी व्यवस्थापन आणि मालकाची असते. यामुळे कालच्या घटनेला सर्वस्वी कंपनीमालक आणि संबंधित जबाबदार आहेत.

प्रश्न- आपल्या कार्यालयाकडून कंपन्यांची तपासणी कधी केली जाते?उत्तर- सन-२०१६ नंतर अस्तित्वात आलेल्या केंद्रीय निरीक्षण प्रणालींकडून दरमहा कोणत्या कंपनीची किती तारखेला तपासणी करायची आहे, याचे शेड्युल औद्योगिक सुरक्षा अधिकाऱ्यांना प्राप्त होते. या शेड्युलनुसार अधिकारी संबंधित कंपनीला भेट देऊन कार्यवाही करीत असतात.

प्रश्न-एमआयडीसीमध्ये सनशाईन इंटरप्रायजेससारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तुमच्या विभागाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत?उत्तर- आमचे कार्यालय उद्योजकांची संघटना असलेल्या मासिआ, सीएमआयए सारख्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून सर्व सदस्यांनी त्यांच्या कारखान्याचे सुरक्षा ऑडिट करून घेण्याचे आवाहन करतो. शिवाय सुरक्षेबाबत उद्योजकांमध्ये जनजागृती करीत असतो.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfireआग