शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अक्कल दाढ अन् हुशारीचा संबंध आहे का? या दाढीविषयी गैरसमजच अधिक

By संतोष हिरेमठ | Updated: November 2, 2023 19:39 IST

अक्कल दाढ येणे, ही सर्वसाधारण गोष्ट आहे.

छत्रपती संभाजीनगर : लहान मुलांना जे शेवटचे चार दात येण्यास सुरुवात होते, त्यांना ‘अक्कल दाढ’ असे म्हटले जाते. हे दात कायमस्वरूपी असतात. अक्कल दाढ असे म्हटले जात असले तरी त्यांचा अक्कल, हुशारी आणि बुद्धीशी काहीही संबंध नसतो. उलट चांगले मौखिक आरोग्य असणाऱ्या लोकांनाही त्यांचा त्रास होतो. त्यामुळे त्या काढण्याचीही वेळ ओढवते, असे तज्ज्ञांनी म्हटले.

अक्कल दाढ केव्हा व कशामुळे येते? अक्कल दाढ येणे, ही सर्वसाधारण गोष्ट आहे. साधारणपणे वयाच्या अठराव्या वर्षी अक्कल दाढ येते. काही लोकांना ती सरळ म्हणजे सर्वसामान्य येते. मात्र, काहींना अपूर्ण येते, तर काही जणांना वाकडी येते. अशावेळी त्रास होतो.

अक्कल दाढीविषयी गैरसमजदंत उपचाराच्या भीतीसोबतच अक्कल दाढ काढल्यानंतर व्यक्तीला कायमचे अंधत्व येते, दात कापणे किंवा ते स्वच्छ करण्यामुळे इतर दातांना इजा पोहोचते, असे गैरसमज आजही लोकांमध्ये आहेत.

दात काढला तर दृष्टी कमी होते का?हा गैरसमज यामुळे पसरला आहे की, पूर्वी लोक वय झाल्यानंतर दात काढायचे. त्या वयात नजर कमी झालेली असतेच. यावरूनच असा गैरसमज झालेला आहे की, दात काढल्यावर नजर कमजोर होते. मात्र, दातांचा आणि नजरेचा काही संबंध नसतो.

दात काढल्यानंतर काय काळजी घ्याल? दात, दाढ काढल्यानंतर पाण्याने गुळण्या करू नये. जोरात थुंकू नये. थंड आणि पातळ खावे. ज्यूस पिताना स्ट्रॉ वापरू नये. दंतरोग तज्ज्ञांनी दिलेली औषधे नियमितपणे घ्यावी.

अक्कल दाढ येणे सर्वसाधारणअक्कल दाढ हे नाव यामुळे पडले की, या दाढी साधारणपणे वयाच्या १८व्या वर्षी येत असतात. त्या वयात अक्कल येते, असे पूर्वीचे लोक म्हणायचे. मात्र, त्यामुळे अक्कल दाढ आणि हुशारीचा काही संबंध नसतो. अक्कल दाढ येणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे.-डॉ. इंदिरा रोजेकर, दंतरोग तज्ज्ञ.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य