शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

ब्रह्मगव्हाण योजनेत भ्रष्टाचाराचे 'सिंचन' ; मंत्र्याच्या नातेवाईकासाठी ‘नसती’ उठाठेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 16:46 IST

दोन कोटी रुपयांचा दंड माफ करण्याच्या हालचाली

ठळक मुद्देयोजनेचे २०१७ पासून काम ठप्पनिविदा न काढताच लावले धोरण

- विकास राऊत 

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन या महत्त्वाकांक्षी योजनेत भ्रष्टाचार करण्याची अनेक धुरिणांची ‘महत्त्वाकांक्षा’ फळाला येत असून, यामध्ये शासनाला मोठ्या प्रमाणात गंडविण्याचा प्रकार सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

२०१० मध्ये योजनेच्या टप्पा क्रमांक २ चे काम रेंगाळत ठेवल्याप्रकरणी अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीला लावलेला सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा दंड माफ करण्याच्या हालचालींना वरिष्ठ पातळीवर वेग आला आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या नातेवाईकासाठी ही उठाठेव असून, योजनेचे कंत्राट नातेवाईकाला सबलेट करून घेण्यात आले आहे. त्या मोबदल्यात दंड माफ करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. शासनाचा दंड न भरताच ऑगस्ट महिन्यात अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनी, रवीकिरण कन्स्ट्रक्शनकडे असलेले योजनेचे काम स्वप्नील गोरे यांच्या साहस इंजिनिअर्स अ‍ॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा.लि.कडे सबलेट केले आहे.

या योजनेचे मूळ कंत्राट रद्द करण्यासाठी राजकीय, बिगर राजकीय संघटनांकडून अनेक मागण्या झाल्या. त्यानुसार लघु पाटबंधारे क्रमांक १ च्या तत्कालीन अभियंत्यांनीदेखील शहानिशा करून चौकशी अहवाल तयार केला. २०१० साली अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीला योजनेचे ५५ कोटींमध्ये काम देण्यात आले. २० टक्के अधिक दराने हे काम दिले होते. वाढीव किमतीनुसार सध्या हे काम ११० कोटींच्या आसपास गेले आहे. यातील १८ कोटींची रक्कम अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीला अदा केली आहे. २०११ साली किरण वाडी यांच्या रवीकिरण कन्स्ट्रक्शन्सला ३० टक्के रकमेत हे कंत्राट सबलेट करण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये याच योजनेतील काम स्वप्नील गोरे (शिवसेनामंत्र्यांचे नातेवाईक) यांच्या साहस इंजिनिअर्स या कंपनीला २९ टक्के रकमेत सबलेट केले.

दरम्यान,  २०१७ पासून योजनेचे काम ठप्प पडल्याने दररोल २५ हजारांचा दंड अंबरवाडीकर कन्स्ट्रक्शन्सला लावला आहे. त्याची रक्कम सव्वादोन कोटी वसूल करावी, तसेच सध्याच्या डीएसआर (डिस्ट्रिक्ट शेड्युल्ड रेट)प्रमाणे वाढीव २ कोटींचा दर अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीला निविदेनुसार अदा न करण्याबाबत जलसंपदातील कार्यकारी, अधीक्षक अभियंत्यांनी वारंवार रेकॉर्डनिहाय वरिष्ठांना दिलेल्या पत्रात नमूद केलेले आहे. 

कार्यकारी अभियंत्यांची माहिती अशीयोजनेचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी सांगितले की, योजना खूप मोठी आहे. त्यातील ही एक निविदा आहे. कंत्राट सबलेट करण्यात आले आहे. राहिली गोष्ट अंबरवाडीकर कन्स्ट्रक्शन्सकडून दंड वसूल करण्याबाबत, तर यात मुख्य अभियंता स्तरावर चौकशी समिती नेमण्याचा निर्णय होत आहे. समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही होईल. 

फेब्रुवारी २०२० मध्ये दिले होते पत्र योजनेतील १२ प्रकारची कामे पूर्ण करून देण्याबाबत अंबरवाडीकर कन्स्ट्रक्शन्सला कार्यकारी अभियंता पातळीवर पत्र देण्यात आले होते. सदरील कामे तातडीने पूर्ण केली नाहीत, तर निविदा रद्द करण्याचा इशारा पत्रातून देण्यात आला होता; परंतु राजकीय दबाव आणल्याने कंत्राटदार कंपनीने रेंगाळलेली कामे तशीच ठेवली. 

१3 ऑक्टोबर रोजी झाली बैठकब्रह्मगव्हाण योजनेतील कालवा क्र. १ आणि २ ची कामे अपूर्ण असल्यामुळे १3 ऑक्टोबर रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत विस्तारित मंत्रालय ६०७ क्रमांकाच्या दालनात बैठक झाली. ७०२ कोटी रुपये योजनेची सुधारित किंमत आहे. दोन टप्प्यांत १८ हजार ७८७ हेक्टर सिंचन क्षमता यातून आहे. बैठकीला रोहयोमंत्री संदीपान भुमरे, अभियंते कपोले, शिंदे, आव्हाड, गोडसे, सिरसे आदींची उपस्थिती होती. नवीन गावांची पाहणी आणि केकत जळगावपर्यंत काम सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

टॅग्स :fundsनिधीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAurangabadऔरंगाबाद