शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

चौका-चौकात कारंजे, व्हर्टिकल गार्डन; शहर सौंदर्यात भर टाकण्यासाठी महापालिकेची ठोस पावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 14:36 IST

महापालिकेला १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून होणार कामे

औरंगाबाद : शहराच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरात चौका-चौकात पाण्याचे कारंजे, व्हर्टिकल गार्डन, उद्यानात कारंजे उभारण्यात येणार आहेत. या कामांवर जवळपास साडेपाच कोटी रुपये खर्च केले जाणार असून, या कामांच्या निविदा अंतिम करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.

सध्या महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे. शहरातील अंतर्गत १११ रस्त्यांची कामे लवकरच सुरू केली जाणार आहेत. त्याकरिता स्मार्ट सिटीतून ३१७ कोटी रुपयांचा निधी खर्च होत आहे. त्यासोबतच रस्त्यावरील दुभाजक, वृक्ष लागवड, साफसफाई ही कामेसुद्धा हाती घेण्यात आली आहेत. महापालिकेला १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून शहरात ठिकठिकाणी व्हर्टिकल गार्डन तयार केल्या जाणार असून, उद्याने आणि चौकांमध्ये कारंजे उभारून त्यांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. उद्यान विभागाकडून व्हर्टिकल गार्डन, कारंजे यासाठी निविदा अंतिम करण्यात आल्या आहेत.

पाच ठिकाणी व्हर्टिकल गार्डननाल्यांमध्ये कचरा टाकू नये म्हणून लोखंडी जाळी लावण्यात आली आहे. या जाळीवरच व्हर्टिकल गार्डन तयार करण्याची संकल्पना प्रशासक पाण्डेय यांनी अस्तित्वात आणली. मध्यवर्ती बसस्थानकासमोर व्हर्टिकल गार्डन बनविण्यात आल्या असून, त्याच धर्तीवर बाबा पेट्रोल पंपाच्या महावीर चौक उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी तसेच कर्णपुरा यात्रेकडून जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी, नागेश्वरवाडी नाल्यावर, औरंगपुरा भाजी मंडई, सिडकोतील वसंतराव नाईक उड्डाणपुलाखाली चौकात आणि समोरील भागात व्हर्टिकल गार्डन तयार केली जाणार आहे. व्हर्टिकल गार्डनसाठी ८५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

आठ चौकांत कारंजेदमडी महल चौक, जुना मोंढा निजामकालीन कारंजे, सिडकोतील पिरॅमिड चौक, दिल्लीगेटच्या समोर (पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन), कलाग्रामसमोरील रस्त्यावर, महावीर चौक, सिडकोतील वसंतराव नाईक उड्डाणपुलाखाली, शहानूरमियाँ दर्गा चौक या कामांवर २.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

उद्यानातील कारंजे दुरुस्तीमहापालिकेच्या विविध उद्यानांमध्येही कारंजे आहेत. परंतु, ते चालू स्थितीत नसल्यामुळे त्यांची दुरुस्ती करून घ्यावी लागणार आहे. त्यामध्ये सिद्धार्थ उद्यान, स्वामी विवेकानंद उद्यान, सलीम अली सरोवरासमोरील, ज्योतीनगर उद्यानात कारंजे दुरुस्तीवर १.९९ कोटी रुपये खर्च होतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका