शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

चौका-चौकात कारंजे, व्हर्टिकल गार्डन; शहर सौंदर्यात भर टाकण्यासाठी महापालिकेची ठोस पावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 14:36 IST

महापालिकेला १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून होणार कामे

औरंगाबाद : शहराच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरात चौका-चौकात पाण्याचे कारंजे, व्हर्टिकल गार्डन, उद्यानात कारंजे उभारण्यात येणार आहेत. या कामांवर जवळपास साडेपाच कोटी रुपये खर्च केले जाणार असून, या कामांच्या निविदा अंतिम करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.

सध्या महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे. शहरातील अंतर्गत १११ रस्त्यांची कामे लवकरच सुरू केली जाणार आहेत. त्याकरिता स्मार्ट सिटीतून ३१७ कोटी रुपयांचा निधी खर्च होत आहे. त्यासोबतच रस्त्यावरील दुभाजक, वृक्ष लागवड, साफसफाई ही कामेसुद्धा हाती घेण्यात आली आहेत. महापालिकेला १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून शहरात ठिकठिकाणी व्हर्टिकल गार्डन तयार केल्या जाणार असून, उद्याने आणि चौकांमध्ये कारंजे उभारून त्यांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. उद्यान विभागाकडून व्हर्टिकल गार्डन, कारंजे यासाठी निविदा अंतिम करण्यात आल्या आहेत.

पाच ठिकाणी व्हर्टिकल गार्डननाल्यांमध्ये कचरा टाकू नये म्हणून लोखंडी जाळी लावण्यात आली आहे. या जाळीवरच व्हर्टिकल गार्डन तयार करण्याची संकल्पना प्रशासक पाण्डेय यांनी अस्तित्वात आणली. मध्यवर्ती बसस्थानकासमोर व्हर्टिकल गार्डन बनविण्यात आल्या असून, त्याच धर्तीवर बाबा पेट्रोल पंपाच्या महावीर चौक उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी तसेच कर्णपुरा यात्रेकडून जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी, नागेश्वरवाडी नाल्यावर, औरंगपुरा भाजी मंडई, सिडकोतील वसंतराव नाईक उड्डाणपुलाखाली चौकात आणि समोरील भागात व्हर्टिकल गार्डन तयार केली जाणार आहे. व्हर्टिकल गार्डनसाठी ८५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

आठ चौकांत कारंजेदमडी महल चौक, जुना मोंढा निजामकालीन कारंजे, सिडकोतील पिरॅमिड चौक, दिल्लीगेटच्या समोर (पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन), कलाग्रामसमोरील रस्त्यावर, महावीर चौक, सिडकोतील वसंतराव नाईक उड्डाणपुलाखाली, शहानूरमियाँ दर्गा चौक या कामांवर २.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

उद्यानातील कारंजे दुरुस्तीमहापालिकेच्या विविध उद्यानांमध्येही कारंजे आहेत. परंतु, ते चालू स्थितीत नसल्यामुळे त्यांची दुरुस्ती करून घ्यावी लागणार आहे. त्यामध्ये सिद्धार्थ उद्यान, स्वामी विवेकानंद उद्यान, सलीम अली सरोवरासमोरील, ज्योतीनगर उद्यानात कारंजे दुरुस्तीवर १.९९ कोटी रुपये खर्च होतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका