शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
7
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
8
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
9
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
10
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
11
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
12
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
13
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
14
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
15
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
16
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
17
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
18
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
19
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
20
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सव्वालाख शेतकऱ्यांना व्याज सवलत

By admin | Updated: June 27, 2014 00:10 IST

बीड: शेतीसाठी पीककर्ज घेऊन वेळेवर भरणाऱ्या तब्बल १ लाख ३६ हजार ६५४ शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळाला आहे.

बीड: शेतीसाठी पीककर्ज घेऊन वेळेवर भरणाऱ्या तब्बल १ लाख ३६ हजार ६५४ शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळाला आहे. यापोटी तब्बल १४ कोटी रुपयांचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. बियाणे खरेदी, मशागत तसेच पेरणी आदी शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बॅँक, खाजगी बॅँक तसेच सहकारी बॅँकांकडून पीककर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येऊ नये यासाठी खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात पीककर्ज देण्यात येते. एक लाखापर्यंत पीककर्ज बिनव्याजी देण्यात येते. शेतकऱ्यांना सुरुवातीला कर्जाची रक्कम भरावी लागते, मात्र नंतर व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना परत केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत शुन्य टक्के तर तीन लाखांपर्यंत अवघे १ ते ३ टक्के दराने कर्ज मिळते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक, महाराष्ट्र ग्रामीण बॅँक व राष्ट्रीयकृत बॅँकांमध्ये ज्या शेतकऱ्याने मुदतीत कर्जफेड केली, त्यांना या सवलतीची फायदा मिळाला आहे. यामध्ये डीसीसीच ९१ हजार ९४६, महाराष्ट्र ग्रा. बॅँकेच्या १६ हजार ८९१, राष्ट्रीयकृत बॅँकेतून २७ हजार ८१७ शेतकऱ्यांना या व्याज सवलत योजनेचा लाभ मिळाला आहे.या शेतकऱ्यांना तब्बल १४ कोटी रुपये व्याज सवलत योजनेंतर्गत मिळालेले आहेत. यातील जिल्हा नियोजन समितीतून ८ कोटी तर राज्य शासनाकडून ६ कोटी रुपये मिळाले असल्याचे उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले. अनेकदा शेतकरी बॅँकेकडून घेतलेले कर्ज फेडण्यास टाळाटाळ करतात, यामुळे शेतकऱ्याचेच नुकसान होते. जे शेतकरी वेळेत कर्जफेड करताता त्यांना या योजनेंतर्गत लाभ मिळत असल्याचे उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले. आणखी नऊ कोटींची तरतूदया योजने संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम म्हणून १४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या याजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होत असून ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांसाठी आणखी नऊ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. (प्रतिनिधी)