शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’वरून प्रवासासाठी औरंगाबादकरांसाठी पाच ठिकाणी इंटरचेंज; जाणून घ्या कुठून घेणार वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 16:57 IST

सध्या औरंगाबाद किंवा जालना जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी अहमदनगर मार्गे किंवा नाशिक मार्गे जावे लागते.

ठळक मुद्देनागपूर-मुंबई मार्गे औरंगाबाद प्रवास अधिक वेगवान होणार पहिल्या टप्प्यात शिर्डीपर्यंत प्रवास करता येईल

औरंगाबाद : मुंबई अथवा नागपूरपर्यंत कमी वेळेत व आरामदायी प्रवासासाठी समृद्धी महामार्ग हा औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. औरंगाबाद शहर व लगतच्या परिसरातील नागरिकांना या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी तीन ठिकाणी, तर गंगापूर व वैजापूर तालुक्यांतील नागरिकांसाठी दोन ठिकाणी, असे जिल्ह्यात पाच ‘इंटरचेंज’ तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे.

सध्या औरंगाबाद किंवा जालना जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी अहमदनगर मार्गे किंवा नाशिक मार्गे जावे लागते. या दोन्ही मार्गाने मुंबईला पोहोचण्यासाठी किमान ६ ते ७ तासांचा अवधी लागतो. मात्र, यापुढे समृद्धी महामार्गावरून मुंबईला अवघ्या चार तासांतच पोहोचता येईल. औरंगाबादहून नागपूरला पोहोचण्यासाठी आता किमान ९ ते १० तास लागतात. समृद्धी महामार्गावरून ६ ते ७ तासांत नागपूरला पोहोचणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आपली वाहने समृद्धी महामार्गावर कोठून ही नेता येणार नाहीत. त्यासाठी शेंद्रा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या पाच ठिकाणी महामार्गावर चढण्यासाठी अथवा खाली उतरण्यासाठी ‘इंटरचेंज’ तयार केले जात आहेत. या पाचही ‘इंटरचेंज’च्या ठिकाणी टोलनाका उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यात पाच टोलनाके असले, तरी एकाच ठिकाणी फास्टॅगच्या माध्यमातून वाहनधारकांना टोल भरावा लागणार आहे.

दुसरीकडे, औरंगाबाद जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग गेला असून, तो जमिनीपासून उंचावर आहे. या महामार्गालगतची गावे किंवा अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या गावांना जोडणारे रस्ते, ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग, राज्य अथवा राष्ट्रीय मार्ग आदींसाठी जिल्ह्यात १२० ठिकाणी ‘अंडरपास’ (महामार्गाखालून गेलेला रस्ता) व फक्त दोनच ठिकाणी ओव्हरपास तयार करण्यात आले आहेत.

‘समृद्धी’चा वापर कोणाला कोठून करता येईल- नागपूरकडे जाण्यासाठी सिडको, चिकलठाणा व शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील वाहनधारकांना शेंद्रालगत जयपूर इंटरचेंजवरून जाता येईल. याच इंटरचेंजवरून चिकलठाणा व शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील वाहनधारकांना मुंबईकडे जाणे सोपे होईल.- सिडको व लगतच्या परिसरातील वाहनधारकांना सावंगी येथील इंटरचेंज हा मुंबईकडे जाण्यासाठी सोईस्कर राहील.- जुने औरंगाबाद शहर, रेल्वे स्टेशन, छावणी, पडेगाव या परिसरातील वाहनधारकांना मुंबईला जाण्यासाठी माळीवाडा इंटरचेंज परवडणारा आहे.- गंगापूर व तालुक्यातील वाहनधारकांना हडस पिंपळगाव, तर वैजापूर व तालुक्यातील वाहनधारकांना जांबरगाव इंटरचेंज सोईस्कर राहणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गtourismपर्यटन