शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’वरून प्रवासासाठी औरंगाबादकरांसाठी पाच ठिकाणी इंटरचेंज; जाणून घ्या कुठून घेणार वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 16:57 IST

सध्या औरंगाबाद किंवा जालना जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी अहमदनगर मार्गे किंवा नाशिक मार्गे जावे लागते.

ठळक मुद्देनागपूर-मुंबई मार्गे औरंगाबाद प्रवास अधिक वेगवान होणार पहिल्या टप्प्यात शिर्डीपर्यंत प्रवास करता येईल

औरंगाबाद : मुंबई अथवा नागपूरपर्यंत कमी वेळेत व आरामदायी प्रवासासाठी समृद्धी महामार्ग हा औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. औरंगाबाद शहर व लगतच्या परिसरातील नागरिकांना या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी तीन ठिकाणी, तर गंगापूर व वैजापूर तालुक्यांतील नागरिकांसाठी दोन ठिकाणी, असे जिल्ह्यात पाच ‘इंटरचेंज’ तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे.

सध्या औरंगाबाद किंवा जालना जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी अहमदनगर मार्गे किंवा नाशिक मार्गे जावे लागते. या दोन्ही मार्गाने मुंबईला पोहोचण्यासाठी किमान ६ ते ७ तासांचा अवधी लागतो. मात्र, यापुढे समृद्धी महामार्गावरून मुंबईला अवघ्या चार तासांतच पोहोचता येईल. औरंगाबादहून नागपूरला पोहोचण्यासाठी आता किमान ९ ते १० तास लागतात. समृद्धी महामार्गावरून ६ ते ७ तासांत नागपूरला पोहोचणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आपली वाहने समृद्धी महामार्गावर कोठून ही नेता येणार नाहीत. त्यासाठी शेंद्रा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या पाच ठिकाणी महामार्गावर चढण्यासाठी अथवा खाली उतरण्यासाठी ‘इंटरचेंज’ तयार केले जात आहेत. या पाचही ‘इंटरचेंज’च्या ठिकाणी टोलनाका उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यात पाच टोलनाके असले, तरी एकाच ठिकाणी फास्टॅगच्या माध्यमातून वाहनधारकांना टोल भरावा लागणार आहे.

दुसरीकडे, औरंगाबाद जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग गेला असून, तो जमिनीपासून उंचावर आहे. या महामार्गालगतची गावे किंवा अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या गावांना जोडणारे रस्ते, ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग, राज्य अथवा राष्ट्रीय मार्ग आदींसाठी जिल्ह्यात १२० ठिकाणी ‘अंडरपास’ (महामार्गाखालून गेलेला रस्ता) व फक्त दोनच ठिकाणी ओव्हरपास तयार करण्यात आले आहेत.

‘समृद्धी’चा वापर कोणाला कोठून करता येईल- नागपूरकडे जाण्यासाठी सिडको, चिकलठाणा व शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील वाहनधारकांना शेंद्रालगत जयपूर इंटरचेंजवरून जाता येईल. याच इंटरचेंजवरून चिकलठाणा व शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील वाहनधारकांना मुंबईकडे जाणे सोपे होईल.- सिडको व लगतच्या परिसरातील वाहनधारकांना सावंगी येथील इंटरचेंज हा मुंबईकडे जाण्यासाठी सोईस्कर राहील.- जुने औरंगाबाद शहर, रेल्वे स्टेशन, छावणी, पडेगाव या परिसरातील वाहनधारकांना मुंबईला जाण्यासाठी माळीवाडा इंटरचेंज परवडणारा आहे.- गंगापूर व तालुक्यातील वाहनधारकांना हडस पिंपळगाव, तर वैजापूर व तालुक्यातील वाहनधारकांना जांबरगाव इंटरचेंज सोईस्कर राहणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गtourismपर्यटन