शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’वरून प्रवासासाठी औरंगाबादकरांसाठी पाच ठिकाणी इंटरचेंज; जाणून घ्या कुठून घेणार वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 16:57 IST

सध्या औरंगाबाद किंवा जालना जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी अहमदनगर मार्गे किंवा नाशिक मार्गे जावे लागते.

ठळक मुद्देनागपूर-मुंबई मार्गे औरंगाबाद प्रवास अधिक वेगवान होणार पहिल्या टप्प्यात शिर्डीपर्यंत प्रवास करता येईल

औरंगाबाद : मुंबई अथवा नागपूरपर्यंत कमी वेळेत व आरामदायी प्रवासासाठी समृद्धी महामार्ग हा औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. औरंगाबाद शहर व लगतच्या परिसरातील नागरिकांना या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी तीन ठिकाणी, तर गंगापूर व वैजापूर तालुक्यांतील नागरिकांसाठी दोन ठिकाणी, असे जिल्ह्यात पाच ‘इंटरचेंज’ तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे.

सध्या औरंगाबाद किंवा जालना जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी अहमदनगर मार्गे किंवा नाशिक मार्गे जावे लागते. या दोन्ही मार्गाने मुंबईला पोहोचण्यासाठी किमान ६ ते ७ तासांचा अवधी लागतो. मात्र, यापुढे समृद्धी महामार्गावरून मुंबईला अवघ्या चार तासांतच पोहोचता येईल. औरंगाबादहून नागपूरला पोहोचण्यासाठी आता किमान ९ ते १० तास लागतात. समृद्धी महामार्गावरून ६ ते ७ तासांत नागपूरला पोहोचणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आपली वाहने समृद्धी महामार्गावर कोठून ही नेता येणार नाहीत. त्यासाठी शेंद्रा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या पाच ठिकाणी महामार्गावर चढण्यासाठी अथवा खाली उतरण्यासाठी ‘इंटरचेंज’ तयार केले जात आहेत. या पाचही ‘इंटरचेंज’च्या ठिकाणी टोलनाका उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यात पाच टोलनाके असले, तरी एकाच ठिकाणी फास्टॅगच्या माध्यमातून वाहनधारकांना टोल भरावा लागणार आहे.

दुसरीकडे, औरंगाबाद जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग गेला असून, तो जमिनीपासून उंचावर आहे. या महामार्गालगतची गावे किंवा अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या गावांना जोडणारे रस्ते, ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग, राज्य अथवा राष्ट्रीय मार्ग आदींसाठी जिल्ह्यात १२० ठिकाणी ‘अंडरपास’ (महामार्गाखालून गेलेला रस्ता) व फक्त दोनच ठिकाणी ओव्हरपास तयार करण्यात आले आहेत.

‘समृद्धी’चा वापर कोणाला कोठून करता येईल- नागपूरकडे जाण्यासाठी सिडको, चिकलठाणा व शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील वाहनधारकांना शेंद्रालगत जयपूर इंटरचेंजवरून जाता येईल. याच इंटरचेंजवरून चिकलठाणा व शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील वाहनधारकांना मुंबईकडे जाणे सोपे होईल.- सिडको व लगतच्या परिसरातील वाहनधारकांना सावंगी येथील इंटरचेंज हा मुंबईकडे जाण्यासाठी सोईस्कर राहील.- जुने औरंगाबाद शहर, रेल्वे स्टेशन, छावणी, पडेगाव या परिसरातील वाहनधारकांना मुंबईला जाण्यासाठी माळीवाडा इंटरचेंज परवडणारा आहे.- गंगापूर व तालुक्यातील वाहनधारकांना हडस पिंपळगाव, तर वैजापूर व तालुक्यातील वाहनधारकांना जांबरगाव इंटरचेंज सोईस्कर राहणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गtourismपर्यटन