शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘इसिस’पासून प्रेरणा घेऊन मोठ्या जीवितहानीचा कट रचणाऱ्या मुलाची रवानगी विशेष सुधारगृहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 12:51 IST

बालन्याय मंडळाचे आदेश, एटीएसने २०१९ मध्ये पकडले होते संशयित दहशतवादी

औरंगाबाद : इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेपासून प्रेरित होऊन शहरातील जलकुंभात अथवा धार्मिक कार्यक्रमातील प्रसाद, जेवणावळीत विष कालवून मोठ्या प्रमाणात जीवितहानी करण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पकडलेल्या टोळीतील एका अल्पवयीन मुलावरील आरोप बालन्याय मंडळासमोर सिद्ध झाले. न्यायमंडळाने या मुलाला तीन वर्षे विशेष निरीक्षणगृहात ठेवण्याचे आदेश दिले.

इसिस’च्या विचाराने प्रेरित होऊन मुंब्रा आणि औरंगाबादेतील काही जणांनी २०१९ मध्ये उम्मत ए मोहम्मदिया या नावाचा ग्रुप तयार केला होता. या माध्यमातून त्यांनी विशिष्ट धर्मीयांच्या धार्मिक कार्यक्रमाचा प्रसाद, जेवण अथवा शहरातील जलकुंभाच्या पाण्यामध्ये विष मिसळून मोठी जीवितहानी करण्याचा कट रचल्याची गुप्त माहिती मिळाल्याने औरंगाबाद एटीएस पथकाने शहरातील आणि मुंब्रा येथील ९ तरुणांना अटक केली होती. स्फोटक पदार्थाचा वापर करून मुंबई, ठाणे आणि औरंगाबादेत दहशतवादी हल्ला करण्यासाठी त्यांनी या शहराची रेकीही केल्याचे तपासात समोर आले होते.

याप्रकरणी एटीएसने आरोपी मोहसीन सिराजउद्दीन खान, मजहर अब्दुल रशीद शेख, मोहम्मद तकी सिराजउद्दीन खान, मोहम्मद मुशाहिद उल इस्लाम अब्दुल माजीद, मोहम्मद सर्फराज अब्दुल हक उस्मानी, जमान नवाब खुटेउपाड, सलमान सिराजउद्दीन खान, फहाद मोहम्मद इस्तेयाक अन्सारी आणि तल्हा हासिफ पोतरीक यांच्याविरोधात एनआयएच्या विशेष न्यायालयात खटला दाखल केला होता. एटीएसने पकडलेल्या आरोपींपैकी एकजण अल्पवयीन होता. त्याच्याविरोधात एटीएसने बाल न्यायमंडळासमोर खटला भरला होता. सुनावणीत तो दोषी ठरल्याने न्यायमंडळाने त्याला तीन वर्षे विशेष निरीक्षणगृहात ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती एटीएसचे पोलीस निरीक्षक नितीन कंडारे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीISISइसिसAurangabadऔरंगाबाद