शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद येथील दंगलींची चौकशी बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:01 IST

तीन महिन्यांपूर्वी मिटमिटा येथे झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी लटकल्यानंतर ११ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशीही बारगळल्याचे समोर आले

ठळक मुद्देमिटमिट्यासह शहरात वणवा : शहरवासी होरपळले असताना गृह विभाग मात्र असंवेदनशील

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तीन महिन्यांपूर्वी मिटमिटा येथे झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी लटकल्यानंतर ११ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशीही बारगळल्याचे समोर आले. या दोन्ही दंगलींची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींना दिले होते. दोन्ही दंगलीत शहर होरपळले असताना मुख्यमंत्री आणि गृहखाते मात्र या दंगलींबाबत असंवेदनशील असल्याचे दिसते.जानेवारी ते मे महिन्यांदरम्यान शहरात लहान-मोठ्या चार दंगली झाल्या. यातील सर्वात भीषण अशी दंगल ११ आणि १२ मे रोजी जुन्या शहरात झाली. या दंगलीत दोन जणांचा बळी गेला, तर शेकडो जण जखमी झाले. शिवाय दहा कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. या दंगलीप्रकरणी सुमारे तीन ते चार हजार लोकांविरोधात पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. दोन समुदायांतील दंगलीने शहरातील सामाजिक सलोख्याला धक्काच बसला. या दंगलीची चौकशी राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांच्या मार्फत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.बुधवारी दंगलीला २६ दिवस पूर्ण झाले; मात्र दंगलीची चौकशी करणारी पोलीस महासंचालकांची उच्चस्तरीय चौकशी समिती अद्याप शहरात आली नाही.७ मार्च रोजी मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोध करण्यासाठी दगड हातात घेऊन रस्त्यावर आलेले नागरिक आणि त्यांना हुसकावण्यासाठी गेलेल्या पोलिसांत जोरदार धुमश्चक्री झाली होती. या घटनेचेही तीव्र पडसाद विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले होते. मात्र या दंगलीची चौकशी करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र ही चौकशी आता बारगळल्यातच जमा आहे.दोन्ही दंगलीत शहरातील नागरिक होरपळले असताना आणि नागरिकांचा जीव गेला असतानाही सरकार आणि गृहखाते मात्र असंवेदनशील असल्याचे दिसत आहे.मुख्यमंत्र्यांच्या घोषणांची अंमलबजावणी कधीलोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी अतिरिक्त गृहसचिव, पोलीस महासंचालक यांच्यामार्फत करण्याची घोषणा केली. रजेवर गेलेले तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना पुन्हा औरंगाबादेत रुजू होऊ न देता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. या घटनेला आज तीन महिने पूर्ण होत असले तरी मिटमिटा दंगलीची चौकशी करणारी समिती शहरात आली नाही. मिटमिट्यापाठोपाठ आता गत महिन्यात जुन्या शहरातील दंगलीची चौकशीही बारगळल्याचे चित्र दिसू लागले आहे.