शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
4
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
5
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
6
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
7
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
8
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
9
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
10
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
11
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
12
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
13
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
14
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
15
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
16
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
17
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
18
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
19
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
20
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 

औरंगाबाद येथील दंगलींची चौकशी बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:01 IST

तीन महिन्यांपूर्वी मिटमिटा येथे झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी लटकल्यानंतर ११ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशीही बारगळल्याचे समोर आले

ठळक मुद्देमिटमिट्यासह शहरात वणवा : शहरवासी होरपळले असताना गृह विभाग मात्र असंवेदनशील

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तीन महिन्यांपूर्वी मिटमिटा येथे झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी लटकल्यानंतर ११ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशीही बारगळल्याचे समोर आले. या दोन्ही दंगलींची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींना दिले होते. दोन्ही दंगलीत शहर होरपळले असताना मुख्यमंत्री आणि गृहखाते मात्र या दंगलींबाबत असंवेदनशील असल्याचे दिसते.जानेवारी ते मे महिन्यांदरम्यान शहरात लहान-मोठ्या चार दंगली झाल्या. यातील सर्वात भीषण अशी दंगल ११ आणि १२ मे रोजी जुन्या शहरात झाली. या दंगलीत दोन जणांचा बळी गेला, तर शेकडो जण जखमी झाले. शिवाय दहा कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. या दंगलीप्रकरणी सुमारे तीन ते चार हजार लोकांविरोधात पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. दोन समुदायांतील दंगलीने शहरातील सामाजिक सलोख्याला धक्काच बसला. या दंगलीची चौकशी राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांच्या मार्फत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.बुधवारी दंगलीला २६ दिवस पूर्ण झाले; मात्र दंगलीची चौकशी करणारी पोलीस महासंचालकांची उच्चस्तरीय चौकशी समिती अद्याप शहरात आली नाही.७ मार्च रोजी मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोध करण्यासाठी दगड हातात घेऊन रस्त्यावर आलेले नागरिक आणि त्यांना हुसकावण्यासाठी गेलेल्या पोलिसांत जोरदार धुमश्चक्री झाली होती. या घटनेचेही तीव्र पडसाद विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले होते. मात्र या दंगलीची चौकशी करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र ही चौकशी आता बारगळल्यातच जमा आहे.दोन्ही दंगलीत शहरातील नागरिक होरपळले असताना आणि नागरिकांचा जीव गेला असतानाही सरकार आणि गृहखाते मात्र असंवेदनशील असल्याचे दिसत आहे.मुख्यमंत्र्यांच्या घोषणांची अंमलबजावणी कधीलोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी अतिरिक्त गृहसचिव, पोलीस महासंचालक यांच्यामार्फत करण्याची घोषणा केली. रजेवर गेलेले तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना पुन्हा औरंगाबादेत रुजू होऊ न देता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. या घटनेला आज तीन महिने पूर्ण होत असले तरी मिटमिटा दंगलीची चौकशी करणारी समिती शहरात आली नाही. मिटमिट्यापाठोपाठ आता गत महिन्यात जुन्या शहरातील दंगलीची चौकशीही बारगळल्याचे चित्र दिसू लागले आहे.