शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

लाच घेतलेल्या कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 19:01 IST

अप्पर पोलीस महासंचालक आशुतोष डुंबरे यांचे निर्देश 

औरंगाबाद : शिपाई, कारकून मोठ्या रकमेची लाच घेताना पकडला जातो. तेव्हा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात बोलावून त्याची कसून चौकशी करावी, असे निर्देश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक आशुतोष डुंबरे यांनी दिले. 

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांची अप्पर महासंचालक डुंबरे यांनी गुरुवारी एसीबीच्या औरंगाबादेतील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सापळा रचून एक लाखापेक्षा अधिक रकमेची लाच घेताना शिपाई, लिपिकाला पकडतात. शिपाई अथवा कारकून हा बऱ्याचदा वरिष्ठांसाठी लाच घेत असतो. त्याच्या वरिष्ठाने प्रत्यक्ष लाच मागितली नसेल. मात्र, त्याच्या सांगण्यानुसारच तो एवढी मोठी रक्कम मागण्याचे धाडस करीत असतो. अशावेळी लाच घेताना पकडलेल्या कर्मचाऱ्याच्या बॉसला एसीबीच्या कार्यालयात बोलावून त्याची कसून चौकशी केली जावी आणि या चौकशीचा अहवाल त्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठांना खातेनिहाय चौकशीसाठी पाठवणे गरजेचे आहे. असे झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा सर्व सरकारी अधिकारी, कर्मचारी धसका घेतील आणि सामान्य जनतेचे काम करण्यासाठी लाच मागण्याची हिंमत अधिकारी, कर्मचारी करणार नाही.  

लाचेच्या प्रकरणांत शिक्षेचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. याविषयी विचारले असता ते म्हणाले की, शिक्षेचे प्रमाण कमी आहे, हे खरे आहे. न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केलेल्या केसचा राज्यपातळीवर अभ्यास करण्यात आला. आरोपींची मुक्तता होण्यास कारणीभूत ठरलेले १२० हून अधिक मुद्यांची यादी तयार करण्यात आली. आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वी ते दोषारोपपत्र पोलीस उपअधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्याकडून तपासून घेणे बंधनकारक करण्यात आले. किरकोळ मुद्यांवर केस सुटता कामा नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी औरंगाबाद परिक्षेत्राचे अधीक्षक अरविंद चावरिया, त्याचप्रमाणे अप्पर अधीक्षक अनिता जमादार उपस्थित होत्या.

नासका कांदा असू शकतोबऱ्याचदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बाहेरील जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे तक्रार करून लाचखोरांना पकडून देण्याचे प्रकार होतात. याविषयी विचारले असता अप्पर महासंचालक म्हणाले की, एखाद्या युनिट अथवा टीममध्ये नासका कांदा असतो. यामुळे तक्रारदारांना सापळा यशस्वी होईल अथवा नाही, याबाबत शंका येते आणि अन्य जिल्ह्याच्या ठिकाणी ते तक्रार करतात.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस