शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

व्यवस्थेचे निष्पाप बळी ; हादरले आसमंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 12:17 AM

थेरबन (ता. भोकर) येथील प्रेमीयुगुल पुजा दासरे-वर्षेवार (वय २२) व गोविंद कºहाळे (२५) यांचे प्रेम जुळले. पूजाचा दोष इतकाच की, तिने निर्मळ प्रेम केले. जात पाहिली नाही. तिने माणसातली माणुसकी पाहिली. गोविंदनेही तेच केले. दोघांनी सुखी जीवनाचा मार्ग निवडला. ते दोघे विजातीय होते व आर्थिक स्थितीने कमकुवत होते.

थेरबन (ता. भोकर) येथील प्रेमीयुगुल पुजा दासरे-वर्षेवार (वय २२) व गोविंद कºहाळे (२५) यांचे प्रेम जुळले. पूजाचा दोष इतकाच की, तिने निर्मळ प्रेम केले. जात पाहिली नाही. तिने माणसातली माणुसकी पाहिली. गोविंदनेही तेच केले. दोघांनी सुखी जीवनाचा मार्ग निवडला. ते दोघे विजातीय होते व आर्थिक स्थितीने कमकुवत होते. नसता ते केव्हाच खुनशी निर्दयी दुनियेच्या नजरेआड झाले असते, याच संधीचा फायदा घेऊन भाऊ दिगंबर दासरे याने डाव साधला. चुलतभाऊ मोहन दासरेच्या मदतीने २३ जुलै रोजी बहिणीस तुझ्या मर्जीप्रमाणे लग्न लाऊन देतो, असे म्हणून विश्वासात घेतले. भोळ्या भाबड्या बहिणीने भावावर विश्वास ठेवला. ज्या भावाच्या हाताला जन्मभर राखी बांधली त्याच हाताने बहिणीचा गळा चिरला. शेवट इथेच संपला नाहीतर निर्ढावलेल्या हाताने बहिणीच्या प्रियकराचाही गळा चिरला. दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले. क्षणात सर्व काही संपले. पुन्हा एकदा एका प्रेमी युगुलाचा अंत झाला. जातीयता हा समाजव्यवस्थेला लागलेला कलंक. त्याने परत डोके वर काढले. जातीयतेचे बंध तोडून नवसमाज निर्मितीसाठी ज्यांनी रक्ताचे पाणी केले त्यांच्या कार्याची नुसती आठवण केल्या गेली; पण प्रत्यक्षात आजही असे प्रकार विचार करायला लावणारे घडत आहेत. ‘जात नाही ती जात’ असे म्हणणाºयांचे खरे ठरले व या उदाहरणावरून स्पष्ट झाले आणि जातीयतेचा बीमोड करणारे कार्य चर्चेत आले. अशीच विचार करायला लावणारी घटना तालुक्यात ५ दिवसानंतर घडली. त्याही घटनेने मानवतेचा अंत पाहिला. मागील खरीप हंगामात शेतकºयांना पीक विम्याचा लाभ बºयापैकी मिळाला. आर्थिक संकटात या योजनेने शेतकºयांना तारले, म्हणून यावर्षीच्या खरीप हंगामातसुद्धा शासनाने खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजना कार्यान्वित केली. त्यानुसार १ ते ३१ जुलैच्या कालावधीत विमा भरणे निश्चित होते, परंतु शासनाने निर्धारित केलेल्या कार्यक्रमात एक नव्हे, अनेक अडचणी आल्या. नियोजनाचा अभाव, तांत्रिक बिघाड, मनुष्यबळ यासारख्या कितीतरी अडचणींमुळे शेतकºयांना पीक विमा भरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. यातच तालुक्यातील दिवशी (बु) चा अल्पभूधारक शेतकरी रामा पोतरे हा किनी येथे बँकेसमोर झालेल्या गर्दीत रेटारेटीमुळे हृदयविकाराने मृत्यू पावला. या एका शेतकºयाच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. विधानसभेत विषय चर्चेला गेला. शासनाने मदत जाहीर केली. रामाचे वृद्ध आईवडील, पत्नी, दोन जुळी ९ वर्षांची लेकरं यांचे शासकीय मदतीवर भागेल काय? एवढ्यावर प्रश्न संपला असे नाही, तर त्या मृत शेतकºयाचा दोष काय? ज्यास अवेळी मरण आले, त्याच्या कुटुंबाने पाहिलेल्या स्वप्नांचे काय?