शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

महागाईला आळा बसावा!

By admin | Updated: May 17, 2014 01:12 IST

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर होत असतानाच महिला दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ताजा निकाल बघत होत्या व घराघरांत प्रतिक्रियाही व्यक्त होत होत्या.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर होत असतानाच महिला दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ताजा निकाल बघत होत्या व घराघरांत प्रतिक्रियाही व्यक्त होत होत्या. ‘अब अच्छे दिन दूर नहीं, इंडियाचा कायापालट होणार, भारताचा विकास गुजरातसारखा व्हायला वेळ लागणार नाही, मोदी सरकार आल्यावर महागाई थोड्या-फार प्रमाणात का होईना कमी होईल,’ अशा प्रतिक्रिया, भावना व अपेक्षा महिला व्यक्त करीत होत्या. ‘अब की बार मोदी सरकार’ ही प्रचार सभांमधील घोषणा खरी ठरल्याचा घराघरांत आनंद व्यक्त होत होता. पेढे, लाडू वाटून व फटाके वाजवून या निकालाचे स्वागत होत असल्याचे दिसले. चांगले दिवस येणार मोदी सरकारमुळे देशाचा कायापालट होईल. महागाई कमी होईल अशी आशा आहे. मॉडेल गुजरात समोर असल्याने गुजरातसारखेच दिवस महाराष्ट्राला बघायला मिळतील, असे वाटते. -सुनंदा लालसरे अपेक्षापूर्ती करावी मोदींना निवडून देण्यामागे नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती या सरकारने कमी करून दिलासा द्यावा. पेट्रोल, डिझेल यांचे दर कमी व्हावेत, अशा अनेक अपेक्षांनी भाजपाला मतदारांनी पसंती दिली आहे. या अपेक्षांची पूर्तता आता मोदींनी करावी. -शैलेजा जाधव महिलांना सुरक्षा हवी गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उभे झाले आहेत. त्यांना एकटीने वावरणे जोखमीचे बनले आहे. महिलांना सुरक्षित वाटेल, अशी उपाययोजना नव्या सरकारने करावी, अशी अपेक्षा आहे. -दीप्ती जोशी सामान्यांचा विचार व्हावा सामान्य मतदारांनी एवढी वर्षे काँग्रेस सरकारचा अनुभव घेतला आहे. त्याचबरोबर गुजरातमध्ये झालेल्या विकास कामांविषयी माहिती घेतली आहे. ते बघून मोदी सरकारच्या येण्याने फक्त सरकारमध्येच नाही तर संपूर्ण भारतात बदल अपेक्षित आहे. सामान्य माणसाच्या हिताचा सर्वतोपरी विचार व्हावा. -श्रुती वाघमारे मत कामी आले आमचे मत वाया गेले नाही. आम्ही खूप अपेक्षेने सरकार बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्या अपेक्षा आता मोदी सरकारकडून पूर्ण व्हाव्यात. मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना समाधानाने जगता यावे. -मनीषा पाटील चित्र बदलण्याची आशा सलग दहा वर्षे काँग्रेस सरकारचा अनुभव घेतला. अपेक्षित सुधारणा होऊ शकल्या नाहीत; परंतु आता चित्र बदलेल, अशी आशा आहे. महागाई कमी करणे, गॅस सिलिंडरवर अनुदान, शिक्षणाचा खर्च सुसह्य होणे तसेच महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील विचार नक्कीच केला जाईल. त्यामुळे जनतेचा हा कौल नवी दिशा देईल, असे वाटते. -लक्ष्मी साखरे प्रश्न सोडविले जावेत वाढती महागाई, महिलांची सुरक्षा, गॅस, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी काही उपाय लवकरात लवकर योजले जावेत, अशी अपेक्षा आहे. -जिजाबाई पाटील